पान:'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व शशीताई राजगोपालन (Shashitai Rajgopalan).pdf/37

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तिथलं कार्यालय पण उत्साहानं सळसळतं.

 शशीताईंनी तेव्हा माझं कौतुकही केलं की मी एक चांगली मैत्रीण आहे, तेव्हा मला खूप आनंद वाटला. आपण ज्यांना आदर्श मानतो ती व्यक्ती आपल्याला तिची मैत्रीण म्हणते आणि अशा व्यक्तीकडून कौतुक म्हणजे माझ्यासाठी आणखी उत्साह वाढवणारा प्रसंग होता.

 आता एक प्रश्न येऊ शकतो की शशीताईंनी तर सहकार क्षेत्रामार्फत हे काम केलं आणि मी जी सुरुवात केली ती बचत गट / सेल्फ हेल्प ग्रुप / स्वयंसहाय्य समूह माध्यमांतून. हे दोन्ही एकच आहेत का ते वेगळे आहेत ? स्वयंसहाय्य गटामध्ये सहकार्याची मूलभूत तत्त्वे आहेतच. नुसता एक गट हा एक स्वावलंबी रचना होऊ शकत नाही. त्याच्यासाठी त्याला पूरक अशा रचनेची म्हणजे संघाची आवश्यकता असते. तरच या सगळ्या कामावर देखरेख करण, कोणाला नेमण परवडू शकणार आहे, कुठल्याही पद्धतीनं इतर सेवा उपलब्ध करून घ्यायची असेल तर संघटित रचनेचा आकार हा मोठा हवा.

 नाबार्डच्या स्वयंसहाय्य गट कार्यक्रमांमध्ये संघ रचनेसंबंधी धोरण असते तर हे काम देशभरात बऱ्याच पटीनं पुढे गेलं असतं. नाबार्डने सहकारी क्षेत्राचा अनुभव घेतला होता, विशेषतः जिथे सरकारी राजकीय हस्तक्षेप होतो आणि या संस्था फारशा चांगल्या पद्धतीने चालत नाहीत म्हणून नाबार्डने पुढाकार घेतला नाही.

 प्रदान संस्थेची टीम चैतन्य प्रेरित ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघांना भेट देण्यासाठी आली होती. त्यांना आश्चर्य वाटलं की, प्रत्येक बारीकसारीक गोष्टीकडे लक्ष दिलेलं आहे. जसं की संघाचं इतिवृत्त होतं आणि ते सगळया गटांपर्यंत पोचलेलं आहे. गटाचं लेखापरीक्षण नियमितपणं केलेलं आहे. पदाधिकारी त्यांची जबाबदारी समजतात. मागे वळून पाहताना माझ्या लक्षात येतं की जेव्हा ह्या कामाची सुरवात झाली, तेव्हा प्रत्येकाचा सहभाग घेणे, गट विभाग, संघाचे नियम करणं हे आग्रहपूर्वक केले जाई. तेव्हा सहा महिने वेळ लागला होता. तेव्हा जाणवले की नक्कीच सी.डी.एफ., शशीताई, रामा रेड्डी यांच्या कामाचा परिणाम व प्रभाव माझ्यावर झाला आहे.

 आपण ज्यांना आदर्श मानतो अशा व्यक्तींचा आपल्याला स्नेह मिळणं ही

३७
'चैतन्य'चे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व - शशीताई राजगोपालन