पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/16

हे पान प्रमाणित केलेले आहे.

 काही माणसं नोकरीमध्ये घेतली म्हणजे त्याने सबंध समाजाचा फायदा होतो का? एका अर्थाने होतो. प्रथम श्रेणीमध्ये आठ टक्के नोकरदार अनुसूचित जाती जमातीतून आले हे खरं. कदाचित काही कुटुंबांनाच या राखीव जागांचा फायदा मिळू लागला हेही खरं; पण त्याबरोबर, सगळ्या देशातला मध्यम वर्ग जो एकाच जातीतला होता त्यात निदान थोडी विविधता तर आली! पूर्वी सर्वच मध्यम वर्ग हा सवर्णांचा होता. आज आर्थिकदृष्ट्या मध्यम वर्ग हा केवळ सवर्णांचा न राहता त्या वर्गांमध्ये आणखी काही जातीजमातींची माणसं आली. हासुद्धा फायदा अगदी काही नाकारण्यासारखा नाही. यापलीकडे, आता इतर मागासलेल्या जातींनासुद्धा याच तहेची सवलत जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे साहजिकच,४० वर्षांमध्ये जो प्रयोग यशस्वी झाला नाही, साडेसत्तावीस टक्क्यांकरिता यशस्वी झाला नाही तो ५० टक्क्यांकरिता कसा यशस्वी होईल असा युक्तिवाद केला जात आहे.

 मनुष्य स्वतःचा स्वार्थ कशात आहे ते पाहतो आणि त्या स्वार्थाचं तत्त्वज्ञान करायला लागतो. या अनुसूचित जातीजमाती आणि इतर मागासवर्गीय जाती यांच्याकरिता ठेवायच्या राखीव जागा यासंबंधीसुद्धा जो तो आपापल्या स्वार्थाप्रमाणे तत्त्वज्ञान तयार करतो आहे. अरुण शौरीसारख्या संपादकांनी एक मुद्दा मांडला आहे तो असा की शेवटी गुणवत्तेला काही वाव आहे की नाही? जी काही माणसं शासनामध्ये नेमली जायची ती गुणवत्तेच्या आधारानं नेमली जायची का जातीच्याआधारवर नेमली जायची? या प्रश्नांना काय उत्तर आहेत? गुणवत्ता म्हणजे काय? समजा, एखाद्या मुलाने वनस्पतिशास्त्र किंवा भूगोल विषय घेऊन पदवी परीक्षा दिल्यानंतर जर त्याला एखाद्या खात्यामध्ये नेमलं. भूगोल जो त्याने शिकलेला असतो किंवा वनस्पतिशास्त्र जे शिकलेलं असतं त्या विषयांच्या ज्ञानाचा त्याला काही फारसा उपयोग होतो असं नाही; पण शिकता शिकता विचार करण्याचा आणि निर्णय करण्याच्या प्रक्रिया त्यानं ज्या आत्मसात केलेल्या असतात त्यांचा उपयोग त्याला या नोकरीत होतो. काय शिकला आहे यापेक्षा शिकता शिकता त्याच्या बुद्धीचा जो विकास झाला तो महत्त्वाचा आहे; पण गुण कशावर मिळतात? काही प्रमाणात बुद्धीवर मिळतात हे खरे; पण परीक्षेमध्ये मिळणारे गुण हे पुष्कळदा घोकंपट्टी केलेल्या उत्तरांवरच मिळतात. मग नोकरीकरता निवड करताना गुणवत्ता म्हणजे त्या परीक्षेत मिळालेले गुण हे काही तितके महत्त्वाचे नाही. त्याच्या पलीकडे दुसरा मुद्दा येतो, की सवर्णांचे ९२ टक्के गुण आणि मागासवर्गियांचे ४५ टक्के गुण यांची तुलना खरंच जर

भारतासाठी । १६