पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/163

हे पान प्रमाणित केलेले आहे.


पुतळ्यांचे माणसांवर राज्य


 मुंबईच्या एका उपनगरातील बहुसंख्य दलित वस्तीत उभारलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या गळ्यात चपलांचा हार घातला गेलेला जुलैच्या अकरा तारखेस पहाटे काही इलित कार्यकर्त्यांच्या नजरेस आला या कृत्यास जाबदार कोण हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्नही केला नाही; सरळ जवळच्या पोलीस चौकीवर हल्ला केला. येणाऱ्या जाणाऱ्या बाहनांवर तुफान दगडफेक केली, आगी लावल्या. पोलिसांनी केलेल्या गाळीबारात दहाजण ठार झाले. मृतांपैकी काही निव्वळ बघे होते, किंवा केवळ योगायोगाने त्या गर्दीत सापडले होते. मग मुंबई बंद करण्यात आली. महाराष्ट्रातील मोठी शहरे बंद झाली. मग 'महाराष्ट्र बंद' ही झाला. आता हे लोण गुजराथमध्येही पोहोचले आहे. जागोजागी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवर डांब, शेण आतणे असे प्रकार घडत आहेत. अनेक ठिकाणी दंगली उसळल्या आहेत.
 अशा दंगली ही काही नवी गोष्ट नाही. महाराष्ट्राला त्यांची. सवय आहे आणि देशातही हे भीषण नाटक अनेकवेळा घडलेले आहे. १४ ऑगस्ट १९९५ रोजी मराठवाड्यात बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा एक प्रकार घडला आणि दंगलही भडकली. तेव्हापासून महाराष्ट्रात पुतळ्यांनी घडवलेल्या दंगलीचा हा दहावा प्रकार आहे. रस्त्यात कोणी गाय कापून टाकलेली सापडली, मशिदीजवळ डुक्कर टाकलेले आढळले किंवा एका धर्मियांची मिरवणूक वाजत गाजत दुसऱ्या धर्मियांच्या मोहल्ल्यातून जाऊ लागली की, लोक लाठ्या घेऊन सरसावतात, सुरामारी होते. बंदुकाही वापरल्या जातात; टोळ्याटोळ्यांनी लोक फिरतात, घरांवर हल्ले करतात, माणसे बाहेर ओढून मारली जातात, बायकांवर अत्याचार होतात, असे हजारो वेळा घडते.

 या वेळच्या दंगलीत वेगळेपणा दोन प्रकारचा. दंगलीचे निमित्त गायीसारखा

भारतासाठी । १६३