पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/237

हे पान प्रमाणित केलेले आहे.

विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री

 टिोंच्या खालोखाल संस्कृतातील एक वैदिक प्रार्थना. नुसते 'शांतिः शांतिः शांतिः' असे नेहमीप्रमाणे न म्हणता आकाश, अंतरिक्ष, पृथ्वी, पाणी, औषधी वनस्पती इत्यादी इत्यादी अशी मोठी यादी जोडली आहे आणि या सर्वांना 'शांती असो' अशी ही प्रार्थना.  'तंत्रज्ञान दिवस' साजरा करायचा तर त्यासाठी 'तमसो मा ज्योतिर्गमय,' अशी गतिशील प्रार्थना अधिक उचित झाली असती. शासकीय तंत्रज्ञानाच्या नेतृत्वाला प्रगतीपेक्षा शांतीची आस अधिक असावी. जाहिरातीतील वेगवेगळ्या मथळ्यांत तंत्रज्ञान कसे असले पाहिजे यासंबंधी काही घोषणावाक्ये आहेत. उदाहरणार्थ,

 'तंत्रज्ञान शोषणविरहित असले पाहिजे'

 'तंत्रज्ञान पर्यावरणसुष्ट असले पाहिजे'

 'पर्यावरण नवनवोन्मेषशाली असले पाहिजे'

 'पर्यावरण सर्वार्थाने उचित पाहिजे.'

 सारी एकूण प्रसिद्धी पाहिली की, हा सारा खटाटोप तंत्रज्ञानाचे सामर्थ्य आणि माहात्म्य सांगण्याकरिता आहे की त्याला जेरबंद करण्याकरिता आहे यासंबंधी मनात संभ्रम तयार व्हावा.

 सारे जग जैविक तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रात प्रवेश करते आहे. चीन, ब्राझीलसारख्या देशांतही काही पिकांखालील निम्म्यावर जमीन जैविक बियाण्यांखाली गेली आहे. या तंत्रज्ञानाच्या आधाराने तयार झालेल्या स्वस्त वरचढ मालाशी स्पर्धा करणे भारतीय शेतकऱ्यांना अशक्यप्राय झाले आहे याचा या प्रसिद्धीत कोठे उल्लेखही नाही.

 अनेकांच्या मनांत 'तंत्रज्ञान' हा अभद्र शब्द झाला आहे. ठेंगू लोकांच्या देशात गलिव्हर खलाशी शिरल्यावर या अजस्र माणसाला शक्यतो निष्प्रभ कसे करता येईल याची चिंता साऱ्या ठेगूंना पडली तद्वत, काय वेगवेगळ्या प्रकारांनी खटपट करावी म्हणजे आपल्या संकल्पनांची इस्त्री बिघडणार नाही याचीच प्रमुख चिंता तंत्रज्ञानविरोधी भारतीयांना वाटत आहे. जबाबदार नेत्यांची वर दिलेली अवतरणे हीच बुद्धी दाखवितात.

 तंत्रज्ञानाचा असा दुस्वास का?

 प्रतिभेच्या स्पर्शाला वंचित राहिलेल्या सामान्य जनांना आणि धडाडीविषयी दडस असलेल्या जनसामान्यांना प्रतिभेचा उन्मेष आणि पराक्रम यांच्याविषयी

भारतासाठी । २३७