पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/282

हे पान प्रमाणित केलेले आहे.

तऱ्हेने वागतात. बिळात शिरलेल्या अगदी सापालासुद्धा त्या मुंग्या चावून चावून खलास करून टाकतात. मुंबईत घर आणि ऑफिस या रस्त्यावर बाँबहल्ला झाला तर मुंबईवर मुंग्यांच्या आचारसंहितेप्रमाणे वागतात.

 अशी वेळ न येवो, पण दुर्दैवाने त्यांच्या घरावर जर का आंतकवाद्यांचे हल्ले झाले तर मुंग्यांच्या निर्धाराने ते आक्रमकांना बेजार करून हाकून देतील अशी शक्यता फारशी वाटत नाही. पूर्वी मुंबईत दंगे झाले आहेत. मुंबईच्या गोदीतील प्रचंड बाँबस्फोट ज्यांना आठवत असेल त्यांना हेही आठवत असेल की त्यावेळी मुंबईकर मोठ्या संख्येने मुंबई सोडून आपल्या गावांकडे निघून जाण्याच्या धावपळीत होते. मुंबईकरांनी मुंग्यांच्या उद्यमशीलतेची एक पद्धत अंगी बाणवली आहे, पण मुंग्यांमध्येही असलेली कडव्या प्रतिकाराची प्रेरणा त्यांना झेपेल असे काही वाटत नाही.

 १९९३ साली मुंबईत बाँबस्फोट झाले त्यावेळी ज्या संघटनांनी प्रतिशोध घेण्याचा प्रयत्न केला त्या संघटना यावेळी घरगुती भांडणे मिटविण्यात इतक्या गढून गेल्या होत्या की १९९३ चा इतिहास पुन्हा एकदा गिरवण्याचा विचारसुद्धा त्यांच्या मनात आला नाही.

 मुंग्यांच्या बरोबरीने उद्यमशीलतेबाबत कौतुक होते ते मधमाश्यांचे. याखेरीज, मधमाश्यांच्याच वर्गातील गांधीलमाश्यांचा उल्लेख कोणी उद्यमशीलतेकरिता करीत नाहीत; पण, मधमाश्यांच्या मधाच्या पोळ्यावर कोणी नजर ठेवली आणि त्या पोळ्याला नुसता खडाजरी मारला तर आपली नेहमीची उद्यमशीलता सोडून सगळ्या मधमाश्या ज्याने कोणी एवढे धाडस दाखवले असेल त्याच्यावर तुटून पडून त्याला अगदी रक्तबंबाळ करून टाकतात. एकदा का मधमाश्यांचे पोळे असे उठले की आजूबाजूला निव्वळ बघ्याच्या भूमिकेत असलेल्या लोकांनासुद्धा त्यांचा प्रसाद मिळाल्याखेरीज राहत नाही. गांधीलमाश्या नेमका काय उद्योग करतात हे स्पष्ट नाही; पण, त्यांचीही पोळी असतात आणि त्या पोळ्यांना कोणी धक्का लावल्यास किंवा धक्का लावेल असा त्यांना संशय आल्यास गांधीलमाश्यातर प्रचंड त्वेषाने अतिक्रमणकाऱ्यावर तुटून पडतात.

 मुंगी आणि मधमाश्या - दोन्ही प्राणी उद्योगप्रिय. मुंगी निदान बाहरेच्या जगात अहिंसेने वागते पण, घरावर हल्ला झाल्यास निकराने प्रतिकार करते. मधमाश्यां उद्योगी खऱ्या, पण त्यांची वागणूक ही इस्राईलमधल्या नागरिकांप्रमाणे आहे. युद्ध नसेल तेव्हा प्रचंड परिश्रमाने शेती फुलवणारे, कारखानदारी वाढवणारे इस्रायली नागरिक युद्धप्रसंगी सैनिक बनतात आणि शत्रूवर तुटून पडून आठ-

भारतासाठी । २८२