पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/284

हे पान प्रमाणित केलेले आहे.

वाटायला नको.

 १९४५-४६ सालामध्ये, फाळणीपूर्व काळात मी चांगला जाणता विद्यार्थी होतो. त्यावेळचे वातावरण आठवून पुन्हा एकदा देशावर फाळणीचे ढग फिरू लागले आहेत अशी जाणीव मला होत आहे.

 सगळ्या हिंदुस्थानात कोठेही आतंकवादी प्रकार घडला आणि त्या प्रत्येक ठिकाणी सापडलेला गुन्हेगार हा एका विशिष्ट जमातीचाच असला तरीसुद्धा त्या सर्व जमातीला नावे ठेवणे योग्य होणार नाही हे तर्कशास्त्राला धरून आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतर ९९ शिखांनी मिठाई वाटली तरीसुद्धा १००व्या शिखाला मारण्याचा अधिकार कोणालाही पोहोचत नाही अशी भूमिका मी स्वतः मांडलेली होती; पण त्यानंतर दिल्लीतील शिखांचे शिरकाण होऊनही शिखांमध्ये सबंध देशाविषयीची द्वेषभावना पराकोटीला गेलेली मी पाहिलेली नाही.

 ढहंदुस्थान हे एक मधमाश्यांचे पोळे आहे असे समजले तर ते एकसंध राहिले नसून ६० वर्षांपूर्वी काही मधमाश्यांनी आपापल्या मधाच्या साठ्यासकट वेगळे होऊन नवे पोळे तयार केले आणि उरलेल्या पोळ्यातही काही अस्वस्थ मधमाश्यांनी वेगळे उपपोळे तयार केले आहे. या मधमाश्यांना आपल्या पोळ्यातील बाकीच्या मधमाश्यांची भाषा बोलायची इच्छा नाही, त्यांची लिपीही वापरायची नाही, स्वतःच्या धर्मग्रंथाखेरीज कोणतेही ज्ञान त्यांना मंजूर नाही आणि त्यांच्या धर्मसमजुतींना जराही हात लागलेला त्यांना सहन होत नाही. अशा तऱ्हेने स्वतःला कोंडून घेतल्यामुळे मधमाश्यांना या एकूण पोळ्यामध्ये एक अलगाववाद तयार झाला आहे. हा अलगाववाद बहुसंख्याकांच्या किरकोळ कडवेपणामुळे झाला आहे असे म्हणणे म्हणजे पुन्हा 'चोराच्या उलट्या बोंबा' असेच म्हटले पाहिजे. हा अलगाववाद अल्पसंख्यांक जमातीच्या कडव्या हट्टीपणामुळे तयार झाला आहे. त्यांनी जर का ज्ञानाकडे आणि प्रकाशाकडे अशा तऱ्हेने पाठ फिरवण्याचे ठरवले तर त्यामुळे त्यांचा तोटाच होईल आणि त्यांना त्याचा दोष दुसऱ्या समाजावर लादता येणार नाही. जे काही नवीन ज्ञान मिळेल त्या ज्ञानाचा उपयोग आपल्या समाजाच्या विकासाकरिता, उद्धाराकरिता करण्याचे सोडून विस्फोटके आणि विद्ध्वंसाची हत्यारे तयार करण्यातच केला तर सारे जग त्यांच्याकडे संशयाने पाहू लागेल, याबद्दल जगाला दोष देता येणार नाही.

 या सर्व अल्पसंख्यांक समाजाची एक ऐतिहासिक ख्याती अशी आहे की त्यांना लोकशाहीच्या तंत्राने चालता येत नाही. आज जगात त्यांच्या समाजाचे एकही राष्ट्र असे नाही की ज्यामध्ये लोकशाही सुखाने नांदते आहे. याउलट,

भारतासाठी । २८४