पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/289

हे पान प्रमाणित केलेले आहे.

ते जर घरी नसतील तर खुंटीवर पागोटे दिसत नाही किंवा कोपऱ्यात काठी दिसत नाही अशा तऱ्हेचा उल्लेख करत असत. आजकालच्या गठ्ठा मतांचे राजकारण करू पाहणाऱ्यांना अशाच प्रकारे मुसलमानांचे नाव घेण्याचीसुद्धा धास्ती वाटत आहे.

 देशातील आजची परिस्थिती पाहिली तर १९४७ सालचे पाकिस्तान दंग्यांच्या रक्तपाताने झाले, तर या पुढील फाळणी आतंकवादाच्या दडपणाखाली मतांच्या गठ्ठ्यांचे राजकारण करणाऱ्या राज्यकर्त्यांची कमजोर बाजू ओळखून निवडणुकीच्या मतपेटीतून सुद्धा होईल अशी शक्यता वाटू लागली आहे.

 १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हिंदुस्थानवर पहिला हल्ला झाला तो जम्मू आणि काश्मिरसाठी. जम्मू आणि काश्मिरचा प्रश्न आजही सुटलेला नाही. पंडित नेहरूंनी सरदार पटेलांचा सल्ला न मानता सगळे प्रकरण संयुक्त राष्ट्रसंघात नेले आणि तेंव्हापासून त्या प्रश्नाचा विक्राळ ढग हिंदुस्थानचे सगळे भवितव्य बरबाद करीत आहे.

 हिंदुस्थानवर दुसरा हल्ला झाला तो चीनचा. चीनच्या फौजा ईशान्य सरहद्दीवर आल्या तसे भारतीय फौजेला पळता भुई थोडी झाली. सगळा देश चीनच्या विरोधात एक झाला पण त्या वेळीही कम्युनिस्टांतील काही 'चेअरमन माओ, आमचा चेअरमन' अश्या घोषणा करीत फिरत होते. १९४२ सालच्या 'चले जाओ' आंदोलनात इंग्लंडची तरफदारी करणारांची ही औलाद १९६२ साली पुन्हा एकदा देशाच्या स्वातंत्र्याच्या उघड उघड विरुद्ध भूमिका घेऊ लागली. सुदैवाने, तात्पुरते चीनचे सैन्य मागे घेतले गेले आणि त्यानंतर भारतीय लष्कराची जमवाजमव पुन्हा एकदा सुरू झाली.

 आज परिस्थिती अशी आहे की जगामध्ये कोठेही साम्यवाद राहिला नसला तरी नव्याने साम्यवाद येण्याचा संभव असणारा देश म्हणजे भारत आणि त्यासाठी काही रक्तमय क्रांतीचा अवलंब करण्याची गरज नाही. तंत्र इस्लामवाद्यांचेच आहे. भारतातील १४ राज्यांमध्ये नक्षलवाद्यांचे राज्य चालू आहे. त्यांनासुद्धा कह्यात आणण्याची शासनाची मानसिकता नाही. आणि, त्यामुळे नक्षलवाद्यांचा धुमाकूळ उत्तरेतील जवळजवळ सगळ्या राज्यांत चालू आहे.

 प्रत्यक्ष आतंकवादाच्या घटनांना जबाबदार असणाऱ्या इस्लामवाद्यांनाही पकडल्यानंतर त्यांना तुरुंगांमध्ये पंचतारांकित हॉटेलांसारखी व्यवस्था करून दिली जाते. दुबईला वारंवार जाणाऱ्या काही मुसलमानांची चौकशी करण्याचा प्रयत्न जरी पोलिस दलाने केला तर त्याबद्दलही तथाकथित सेक्यूलर लोक

भारतासाठी । २८९