पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/291

हे पान प्रमाणित केलेले आहे.


स्वातंत्र्याचा हिरक महोत्सवाची पार्श्वभूमी


 भारतीय स्वातंत्र्याचा सुवर्ण महोत्सव १९९७ साली साजरा झाला त्यावेळी 'स्वातंत्र्यानंतर ५० वर्षांत काय कमावले, काय गमावले?' याचे व्यापक विश्लेषण शेतकरी संघटनेने भरवलेल्या जनसंसदेत (अमरावती, डिसेंबर १९९८) करण्यात आले. या जनसंसदेत भाग घेण्यासाठी पूर्व-अभ्यास म्हणून 'स्वातंत्र्य का नासले?' ही पुस्तिकाही काढण्यात आली होती. या पुस्तिकेत


 १. स्वातंत्र्याच्या ५० वर्षानंतर स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणाऱ्या शहीदांना समाधान नाही, स्वातंत्र्यसैनिकांना नाही, आम जनतेलाही नाही, याउलट 'भारताला स्वातंत्र्य देऊ नका, स्वातंत्र्य दिल्यास हे लोक एकमेकांच्या उरावर बसतील' हे चर्चिलचे भाकित खरं ठरलेले दिसते अशी मांडणी केली होती.

 २. हा दोष कोणाचा? स्वातंत्र्यानंतर ज्यांनी देशाचे सुकाणू हाती घेतले ती सारीच माणसे - जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आदरणीय, मग स्वातंत्र्य का नासावे? महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली स्वराज्याचे आंदोलन म्हणजे तर शुद्ध दिव्यतेचा अविष्कार. मग, अशा शुद्ध बीजापोटी इतकी जहरीली फळे कशी आली? याची चर्चा करण्यात आली आहे.

 ३. भारत-पाकिस्तान अशी राजकीय फाळणी होऊन स्वातंत्र्य मिळाले. परंतु, महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या भाकिताप्रमाणे पेशवाई परतली आणि राजकीय भारताची आणखी एक फाळणी झाली. गांधी विचारातील गावे, शेती व ग्रामोद्योग मागे हटले आणि शहरे, कारखानदारी आणि सरकारी क्षेत्र सर्व प्रभावी ठरले. शेतीचे शोषण सुरू राहिले, वाढले आणि त्यातूनच शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा आणि शेतीचा मागासलेपणा पुढे आला.

 पुढील वर्षी म्हणजे २००७ साली भारताच्या स्वातंत्र्याला ६० वर्षे पुरी

भारतासाठी । २९१