पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/295

हे पान प्रमाणित केलेले आहे.

सामोरे जाण्यासाठी देशातील सर्व लोकांना आठवड्यातून एकदा उपवास करण्याचे आवाहन खुद्द पंतप्रधानांनी केले. जनतेने त्याचे स्वागतही केले. सगळे राष्ट्र एकसंध होऊन युद्धाला सामोरे जाण्यास तयार झाले. शास्त्रींची प्रसिद्ध 'जय जवान, जय किसान' ही घोषणा त्याच काळातली.

 पाकिस्तानशी युद्ध सुरू झाल्यावर अमेरिका गव्हाचा पुरवठा बंद करेल, त्यासाठी तयारी म्हणून त्या बटुमूर्ति पंतप्रधानाने नेहरूंच्या विचारधारेला मूठमाती देत हरित क्रांतीसाठी दरवाजे उघडले. एक जहाज भरून नव्या वाणाचे बियाणे हिंदुस्थानात आले आणि एका हंगामामध्ये पंजाबातील शेतकऱ्यांनी अन्नधान्याच्या तुटवड्याचे युग संपवले. शेतकऱ्यांनी उत्पादकता दहा दहा, वीस वीस पटींनी वाढवली. या नव्या चमत्काराचे त्यांना कौतुक वाटले; पण हे कौतुक फार काळ टिकणार नाही, नव्या समृद्धीत वाटा मिळण्याची शेतकऱ्यांना खात्री वाटली पाहिजे या हेतूने लाल बहादूर शास्त्रींच्या काळात कृषि मूल्य आयोग (अझउ) स्थापन झाला. पहिल्या काळात या आयोगाने केलेल्या शिफारशी आणि किमतीबद्दलचे सरकारी निर्णय शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगले लाभदायक होते. त्यामुळे, १९६५ ते ७० या काळात हरित क्रांतीच्या प्रदेशात पिके उदंड आली. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांच्या हाती पैसाही बऱ्यापैकी खेळू लागला. जपानी शेतकऱ्याप्रमाणे पंजाबी शेतकऱ्यांनीही छोटे छोटे उद्योगधंदे सुरू करून एका नव्या औद्योगिक क्रांतीची सुरुवात केली. नेहरूप्रणालीत सार्वजनिक उद्योगधंद्यांसाठी प्रचंड गुंतवणूक मिळूनही बिहार औद्योगिकदृष्ट्या मागास राहिला आणि कोणतीही सरकारी औद्योगिक गुंतवणूक नसतांना पंजाब पुढे आला. लाल बहादूर शास्त्रींचे निधन अनैसर्गिक होते याला काही पुरावा नाही; पण, त्यांच्या मृत्यूने भारताच्या इतिहासाला जी विपरीत कलाटणी मिळाली ती पहाता कोण्या भारतद्वेष्ट्या किंवा सत्तालोलुप ताकदींचा त्यांच्या मृत्यूमागे हात असावा ही शक्यता नाकारता येत नाही.

 शास्त्री गेले, इंदिरा गांधी पंतप्रधानपदावर आरूढ झाल्या. स्वातंत्र्यासाठी घरातल्या घरात वानरसेना उभारणे एवढाच त्यांचा जनसंपर्क आणि वर्षभराच्या माहितीखात्याच्या मंत्रीपदाचा अनुभव एवढ्या भांडवलावर त्यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतली. शेतीचा अनुभव तर तीन पिढ्यांत नाही. शक्य असते तर त्यांनी हरित क्रांतीही पलटवली असती आणि पंडित नेहरूंची तंत्रज्ञानविरोधी प्रणाली पुन्हा एकदा प्रस्थापित केली असती; पण, त्यांचे पाय अजून रोवले गेले नव्हते. त्यामुळे, हरित क्रांती उलवथवण्यासाठी त्यांनी कराटेनीति वापरली आणि शेतकऱ्यांना हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानात असलेले स्वारस्य नष्ट करण्यासाठी त्यांना शेतीमालाचा

भारतासाठी । २९५