या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० भाषाशास्त्र. होऊन, असंख्य वाचितरंग उद्भवतात; व त्यायोगाने, आकाशाचा नित्य गुण जो शब्द, त्याचा प्रादुर्भाव होण्याला सहजींच अवकाश मिळतो. अर्थात्, कारणामुळे कार्य घडत असल्याने, जावतुकालपर्यत कारणाला अवकाश नाही, तावत्कालपर्यंत कार्य देखील घडून येत नाही. आणि म्हणूनच, शब्द किंवा ध्वान हा जरी आकाशाचा नित्य : गुण आहे, तरी निमित्ताभावात् तो सदैव प्रच्छन्नावस्थेत, व अतएव अव्यक्त असतो; आणि कारण उद्भवल्यावर तो आपोआप तत्क्षणीच व्यक्त होतो. असो. आघातासारख्या निमित्त कारणांनी शब्द किंवा ध्वनि व्यक्त झाल्यावर, वायूत वीचितरंग उठतात, व त्याचा प्रवाह कर्णेन्द्रियावर जाऊन एकदम थडकतो. त्यामुळे, ध्वनि आणि श्रोत्रंद्रिय यांचा संयोग होऊन, मज्जातंतूला तत्काल धक्का पोहोचतो, व मन जागृत झाल्याने, ते आत्म्यालाही लागलीच प्रबोधित करते. पुढे, आत्मा हा शरीरस्थ राजाच असल्यामुळे, तो आपल्या इच्छेप्रमाणे वाचेचे आणि इतर सर्व इंद्रियांचे व्यापार चालवितो, व असंख्य घडामोडी करतो. आतां, मन किंवा आत्मा जागृत असतांना, इन्द्रियांचे । १ ह्या इन्द्रियांत, पांच ज्ञानेन्द्रियें व पांच कर्मेन्द्रियें, यांचा समावेश होतो. १ कान, २ डोळे, ३ नाक, जीभ, व ५ त्वचा, हीं पंच ज्ञानेन्द्रिये असून, १ गुद, २ उपस्थ, ३ हात, पाय, व ५ वाचा, ही पंच कर्मेन्द्रियांत मोडतात. । श्रोत्रंत्वक् चक्षुषी जिव्हा नासिका चैव पंचमी । पायूपस्थं हस्तपादं वाक्चैव दशमी स्मृता ॥९०॥ मन हे ज्ञानेन्द्रियांपैकीच आहे, अशीही कित्येक कल्पना करतात. | ( मनुस्मृति. अ० २.)।