या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ , भाषाशास्त्र शिवाय, सूर्याप्रमाणेच एकसमयावच्छेकरून शब्द हा सर्वत्र असतो; आणि फक्त वर्णात फेरबदल झाल्यानेच वर्णविकृति होत नाहीं; हे उघड आहे. त्याचप्रमाणे, शब्द किंवा ध्वनि लहान मोठा नसून, त्याला अवयवही नाहींत. मात्र, त्याचे अणुत्व किंवा भैहत्व कणकाशाच्या विसृत व संकुचितावस्थेवर अवलंबून असते; व ह्मणूनच त्याची वृद्धि अगर क्षीणता संभवत नाही. ह्या सर्व कारणांवरून, शब्द हा नित्य असल्याचे उघड होत. । ह्यासंबंधाने आणखी एक गोष्ट विशष रीतीनें लक्षांत ठेवावयास पाहिजे आहे. ती ही कीं, शब्दोच्चार होतांच शब्दध्वनि नाहीसा होते, व लयास जाते. त्यावरून, केवळ शब्दोच्चाराने किंवा शब्दश्रवणानेच कोणताही कार्यभाग होत नाही. तर, जेव्हां ज्ञान उत्पन्न होते, तेव्हांच त्याच्यायोगाने काय घडते. ह्यावरून शब्दध्वनीला पार्थत्व आहे, असे उघड दिसते. अर्थात् , जरी उच्चारलेला ध्वनि नाहीसा होतो, तरी त्यापासून झालेले ज्ञान नित्यच आहे, असा भावार्थ होय. त्याचप्रमाणे, शंकराचार्यांनी देखील शब्दाचे नित्यत्व शब्दाच्या नित्य- मोठ्या जोराने आणि सयुक्तिक रीत्वाविषयी शंकराचा- तीने प्रतिपादन केले आहे. बादराययचे मत. णाच्या ब्रह्म ( शारीरिक अथवा वे : १ आदित्यवद्यौगपद्यम् ॥१५॥ (अ० १. पा० १, पू०मी०). २ वर्णान्तरमविकारः ॥ १६ ॥ (अ० १. पा० १. पू०मी.). ३ नादवृद्धिपरा ॥ १७ ॥ ( अ० १. पा० १. पू० मी० ). नित्यस्तुस्याद्दर्शनस्य परार्थत्वात् ॥ १८॥ ( अ० १. पा. १. सु. १८ पू. मी. )