पान:मराठी शब्दांचे उद्घाटन.djvu/90

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



८८     मराठी शब्दांचे उद्घाटन.

कोंकणपट्टीचें नांव पुष्कळ गोष्टींची माहिती देते. परशुरामानें क्षत्रियांचा बीमोड करून भूमीचे दान कश्यप ऋषीस दिलें, व दान दिलेल्या देशांत राहणे योग्य नाही असे जाणून परशुरामाने समुद्रापासून सह्याद्रीच्या पायथ्याचा पश्चिमकडचा प्रदेश मागून घेतला, आणि तेथे तो तपश्चर्या करीत राहिला. ह्यावरून ह्या प्रदेशास परशुरामक्षेत्र हे नांव पडलें, परंतु परशुरामाने स्वतः ह्या प्रांतास जें नांव दिले ते " शूर्पारक " हे होते. ही पौराणिक कथा परशुरामक्षेत्र ह्या नांवांत दृष्टीस पडते, ह्या पौराणिक कथेचे महत्त्व बाजूला ठेवले तरी भूशास्त्रदृष्ट्या ही मनोरंजक माहिती मिळते की, कोंकणपट्टीचा प्रदेश धरणीकंपादि कारणांनीं वर उचलला जाऊन कोरडा झालेला आहे, व तोही फार प्राचीन काळी कोरडा झालेला आहे, असे नव्हे.

 साळशी हे नांव एका चमत्कारिक प्रस्तावाची आठवण करून देते. रत्नागिरी जिल्ह्यांत देवगड तालुक्यांत साळशी म्हणून एक गांव आहे. तेथील अमलदाराने सर्व आळशी लोकांस जेवायास फुकट घातले जाईल अशी दंवडी पिटविली. आयतें जेवायास मिळते तर संधि कोण दवडणार ? एक आला, दुसरा आला, तिसरा आला, या प्रमाणे हजारों लोक जमले; व जो येई तो “मी आळशी आहे " असे म्हणे. ह्या खुशालचंदांची संख्या वाढत चालली. यथेच्छ भोजन करणे, व झोंपा ताणणे हे जर श्रमावांचून मिळू लागलें तर असा कोण मायेचा पूत आहे की जो ती संधि दवडील? अशा रीतीने सरकारास अधिक अधिक त्रास होऊ लागला. तेव्हा खरे आळशी ठरविण्यासाठी त्या अम्मलदाराने एक खाशा युक्ति काढली. त्याने एके दिवशी रात्रीं सर्व आळशी