या पानाचे मुद्रितशोधन करतांना काही समस्या उद्भवल्या आहेत

कामात इतकी बुडाली होती, की हे अपराधीपणाचं शल्य तिला फार वेळ बोचत राहू शकत नसे.
 राम तिला विचारायचा, " तू आनंदात आहेस ना, ज्योती ?"
 " अर्थात. तुला दिसत नाही का ? "
 " तुला इथे कंटाळा येईल म्हणून मला काळजी वाटते. इथे तशी करमणुकीची साधनं काहीच नाहीत. आणि संगत सोबत फक्त अडाणी कामगारांची.”
 "मला आवडते अडाणी कामगारांची सोबत.”
 " तुला तुझ्या नातेवाईकांची किंवा मित्रमंडळींची आठवण होत असली तर त्यांना इथे रहायला बोलाव ना कधीमधी."
 पण खरं म्हणजे तिला कुणाचीच आणि कशाचीच आठवण होत नव्हती. फारच थोड्या अवधीत ती आपल्या नव्या आयुष्यात पूर्णपणे रमली होती, आणि हे असं होणं अगदी योग्य आहे, असं तिला मनापासून वाटत होतं. रामनं बोलून दाखवल्यावर तिनं एकदा आपल्या भावाला आणि बहिणीला रहायला बोलावल. तिनं अभिमानानं त्यांना सगळं दाखवलं आणि तिचं वैभव पाहून तेही दिपून गेले. खरं म्हणजे त्या काळात अजून त्यांचा बियाणाचा धंदा फारसा तेजीत नव्हता. पण साधंसुधं असलं तरी मोठंसं घर, शेती, गाईगुरं, इतके सगळे कामावरचे लोक हे संजय आणि निशाच्या दृष्टीने वैभवच होतं. पहिले काही दिवस गेल्यावर मात्र ती पुन्हा नेहमीप्रमाणे कामाला लागली आणि मग त्या दोघांना कंटाळा आला. शिवाय रामने त्यांच्याकडे जवळ जवळ संपूर्ण दुर्लक्षच केलं. ज्योतीची अपेक्षा होती की, तो त्यांच्याबरोबर गप्पा मारील, त्यांच्या अभ्यासाबद्दल काही विचारील, इकडे तिकड हिडवील, धाकटया भावंडांशी करावी तशी थोडी चेष्टामस्करा करील. पण त्यानं हयातलं काहीच केलं नाही. म्हणजे तसा तो त्यांच्याशी तुटकपणे वागला असं नाही. ते आल्याआल्या त्याच चांगलं तोंडभर हसून स्वागत केलं. पण नंतर मात्र त्यांची फारशी दखलच घेतली नाही. ज्योतीला जरा दुखावल्यासारखं वाटल.
 " पुन्हा कुणाला बोलवू नको का आपल्याकडे ?

४४ : साथ