(१०८) या एकंदर विवेचनावरून त्रिस्तपूर्व सुमारे साडेपांच हजार वर्षांपूर्वी म्हणजे हल्लीच्या पूर्वी साडेसात हजार वर्षांमागें मेसापोटोमियांत आर्यवर्णीय सुमेरीलोक वसत असून जगताला दिपविण्यासारखी त्यांची संस्कृति होती व ते समेरीलोक व वैदिक आर्यलोक सर्वांशी अभिन्न होते, इतके पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या व संशोधकांच्याच तोंडानें कबूल झाले आहे. अर्थात् वेदांचा आद्य काल ठरविण्याची यापूर्वीच्या मॅक्स- म्युलरादि अर्वाचीनांची सर्व प्रमाणे येथे लटपटली आहेत, व त्यामुळे तो काळ सुमेरी संस्कृतीच्याहि पूर्वीपर्यंत मागे ढकलणें अवश्य प्राप्त झाले आहे. इतक्या प्राचीन काळी हे दोनहि समाज अगदी एकत्र व एकजीव असल्याशिवाय त्यांच्यांतील अनेक- विध सांस्कृतिक साम्यांची उपपत्ति लागणे शक्य नाही. तथापि इतक्या केवळ अनु- मानावरहि अवलंबून न राहता वैदिक व सुमेरी वाङ्मयांत या उभयसमाजाच्या पूर्व- कालीन एकत्र वस्तीचे दर्शक उत्तरध्रवप्रदेशीय परिस्थितीचे द्योतक अशा प्रमाणांचे स्पष्ट उल्लेखहि सांपडतात. त्याअर्थी या लेखांकांत सिद्ध करण्यास घेतलेले प्रमेय बहु- तांशी सिद्ध झाले आहे, असेंच साचें एकमत होईल, अशी आशा वाटते. तथापि या लेखमालेचे धागेदोरे विवेचनाच्या भरांत इतक्या भिन्न शास्त्रांत जाऊन अडकले आहेत की ते एकत्र उपसंहृत केल्याशिवाय व त्यांच्या साह्याने विणलेला सिद्धांतपट एकरूप असा दाखविल्याशिवाय वाचकांना निश्चिततेचे समाधान वाटणार नाही. आणखी शेवटचा एक लेख लिहून या विषयाचा उपसंहार करूं व त्यावरून निघणारा अखेरचा सिद्धांत वाचकांपुढे स्पष्टपणे मांडून त्यांची रजा घेऊ. असा विचार केला आहे.
पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/११२
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही