पान:हिंदी-सुमेरी संस्कुती.pdf/४०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२९ त्वष्टयाने इंद्राचा सुंदर स्थ घडविला, तसंच इंद्राला नेण्यासाठी त्या रथाला जोडण्यासाठी घोडे निर्माण केले. तो रथ आकाशाला जाऊन पोचेल असा होता व त्यांतील बसण्याची जागा सुवणांची केलेली होती. लढाईत त्या रथांत वसणाराला जयच मिले तो स्थहि सोन्याचा होता. घोड्याचे लगाम सूयाच्या किरणाप्रमाणे होते. त्या घोड्यांचे डोळे सूर्याप्रमाणे तेजःपुंज होते, त्यांची आयाळ सोन्याची होती. एखादा श्येन पक्षी आपल्या पखांच्या साह्याने ज्याप्रमाणे अत्यंत जलद गमन करितो, त्याप्रमाणे तो रथ उन्मत्त घोड्यांच्या साह्याने इंद्राला नेतो. त्याच्या बरोबर वायू त्याच स्थावर असतात. अप: बृत्वा रजसो वुनमाशयत् ।। रजोऽवृत अशा पातालांत पाण्याला वेष्टन घालून तो महा सप ( वृत्र बसला होता) वृत्रण यदहिना विभदायुधा समस्थिथायुधये शंसमाविदे। विश्वे ते अत्र मरुतः सहत्मनावर्धन्नुन महिमानामिंद्रियम् ॥ नास्मै विद्युन्न तन्यतुःसिषेध नयां मिहमकिर दादानि च । इंद्रश्च यायुधाते अहिश्न । ज्या वेळी इंद्र व तो महासर्प ( वृत्र) एकमेकाशी लढू लागले. त्या वेळी तो सर्प विद्युलता व मोठी गर्जना यांच्या साह्याने स्वरक्षण करण्याचा प्रयत्न करतो. आहमोहानप आशयानम् । तमायामिर्मायिनं सक्षदिंद्रः ।। मायी म्हणजे मायेचा आश्रय करणा-या व पाण्यावर निजलेल्या त्या अहीला इंद्राने मायेने पराभूत केले. अथ द्यौश्चित्ते अपसानु वज्राद्वितानमद्भियसास्वस्य मन्योः । इंद्र व वृत्र यांचे युद्ध, इतके भयंकर व तुमुल झाले की, त्यामुळे आकाश, पृथ्वी व इतर सर्व विश्व हालून गेले. वश चित्तव मन्यव इंद्र वेविज्यते मिया। ज्या त्वचाने तें वन निर्माण केले तोहि त्याच्या आघाताने भौतिग्रस्त होऊन मूच्छित झाला. - अमीलां जहाति पुत्र देवाः ।। हे इंद्रा इतर देव तुला सोडून पळून गेले. विचिद्वृत्रस्य दोधतोवज्रेण शतपणा शिरोविभेद अणिना। बावृधानो मरुत्सखा विवत्र मैरयत । अयमिंद्रो मरुत्सखा वित्रस्याभिनत शिरः । इंद्राने आपल्या सहस्रधार असलेल्या वज्राने त्राचे मस्तक तोडून टाकले. मरुत्सखा ( वायूंचा मित्र ) अशा त्या इंद्राने वृत्राला आपल्या शस्त्राने तोड़न टाकले व त्याचें मस्तक छेदले.