पान:हिंदुस्थानचा साधनरूप इतिहास.pdf/98

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुलकेशीचे औदार्थ (२४) जेव्हां तो आपल्या असंख्य सैनिकांसह राज्य करीत होता, त्या वेळी विघ्याच्या आसपासचा प्रदेश, जो रेवा नदीच्या विविध वाळूचे तटांनी सुशोभित होता, त्यास कांहीं न करतां विध्यसमीपता प्राप्त झाली. आपल्या तेजाच्या मोठेपणानें तो जास्त शोभला. (२५) ज्याने तिन्ही शक्त्या विधियुक्त काबीज केल्या आहेत, आणि त्यामुळे जो इंद्रतुल्य दिसत आहे, ज्याच्या उच्च घराण्यातील जन्मामुळे व इतर उत्कृष्ट गुणांमुळे आणि ज्याच्या इच्छाशक्तीने ९९ हजार खेड असलेल्या तिन्ही महाराष्ट्रांवर आपलें आधिपत्य मिळविलें, .(३१) त्याने चोल, केरळ, पांड्य, इत्यादि नृपतींस वैभवास आणले व पल्लव सैन्यरूपी धुक्यास आपल्या सहस्ररश्मिवत् सूर्याच्या किरणांनी घालवून दिले. (३५) तेव्हा हे भव्य, मोठेपणाचे आगर, जिनेंद्र मंदिर तिन्ही समुद्रापर्यंत राज्य करणा-या सत्याश्रयाचे अत्यंत मर्जीतील अशा हुशार रविकीतीन बांधले.


पुलकेशाचे औदार्य [ युएन-त्संगाने पुलकेशीचे केलेले वर्णन 'भगवान बुद्धासाठीं' या.. पुस्तकांत १५३-१५४ वर आहे, ते येथे दिलेले आहे. पुस्तकाचा अधिक परिचय पृ. ६० वर पहाः]..::. ।। ‘हा राजा उदारमतवादी -असून दूरदर्शी आहे. त्याच्या औदार्याचे व दातृवाचे क्षेत्र फार मोठे आहे. त्याची प्रजा राजनिष्ठ असून त्याची तत्परतेने सेवा करणारी आहे. ख-या योद्धयाला शोभेल अशीच त्याची अभिरुचि व रंसिकता असून तो युद्धांत जयाला सर्वात अधिक महत्त्व देतो. या कारणास्तव त्याच्या राज्यांतील पायदळ व घोडदळ अति दक्ष व सद सुसज्जित असते. लष्करी शिस्तीची कडक़ अंमलबजावणी केली जाते. लढाईच्या प्रारंभीं हे सैनिक, उन्मत्त.होईपर्यंत मद्यप्राशन करतात व मग त्यांच्यापैकीं हातांत भाला घेतलेला एकेक 'शिपाई. शत्रूच्या दहा हजारू ५ सा.इ. .,