"दत्ताची आरती/ विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

१९:४६, १३ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

विधिहरिहर सुंदर दिगंबर झाले । अनुसयेचें सत्त्व पाहावया आले ॥ तेथें तीन बाळक करुनीं ठेवीले । दत्त दत्त ऎसे नाम पावले ॥ १ ॥

जय देव जय देव जय दत्तात्रेया । आरती ओवाळूं तुज देवत्रया ॥ धृ. ॥

त्रिदेवांच्या युवती परि मागों आल्या । त्यांसि म्हणे ओळखुनी न्या आपुल्या पतिला ॥ कोमल शब्दें करुनी करुणा भाकील्या । त्यांसी समजावीतां स्वस्थाना गेल्या ॥ जय. ॥ २ ॥

काशी स्नान करवीरक्षेत्रीं भोजन । मातापूरी शयन होते प्रतिदान ॥ ऎसें अघटित सिद्धमहिमान । दास म्हणे हें तों नव्हे सामान्य ॥ ३ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.