"दत्ताची आरती/ देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:०८, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

देहत्रय अवतारा तापत्रय हरिसी । अक्षय सुख अवदुंबर छाये विचरसी ॥ श्रीकृष्णातटिं रहुनि दासा उद्धरिसी । जढमूढां तारया अवतार धरिस ॥ १ ॥

जय जय श्रीदत्तात्रय औदुंबरवासी । मंगल आरति करितो मम भवभयनाशी ॥ धृ. ॥

काय तुझा महिमा वर्णावा आतां । मारिसि भूतसमंधा सक्रोधें लाता ॥ नानारोग दुरत्वय तव तीर्थ घेतां । पुनरपि श्रवण न ऎकति गदरिपुची वार्ता ॥ जय. ॥ २ ॥

तुझें क्षेत्र मनोहर या अवनीवरती । त्यातें पहातां वाटे स्वर्गासम धरती ॥ आनंदे द्विज भारत पारयण करिती । त्रिकाळ सप्रेमानें करिती आरती ॥ जय. ॥ ३ ॥

मी अधसागर तूं हो अगस्तिऋषि देवा । प्राशूनि वारी दे मज त्वत्पदिंचा ठेवा ॥ बाधों ना मज किमपि प्रापंचिक हेवा । दास म्हणे हे बाळक आपुल्या पदिं ठेवा ॥ जय. ॥ ४ ॥


<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.