"दत्ताची आरती/ आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:१५, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

आतां स्वामी सुखे निद्रा करा अवधूता, करा अवधूता । चिन्मय सुखधामा जाउनि पहुडा एकांता ॥ धृ. ॥

वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडीला, स्वामी चौक झाडीला ॥ तयावरी सुप्रेमाचा शिडकावा दिधला ॥ आतां. ॥ १ ॥

पायघड्या घातल्या सुंदर नवविधाभक्ती, स्वामी नवविधाभक्ती । ज्ञानाच्या समया उजळूनी लावियल्या ज्योती ॥ आतां ॥ २ ॥

आशातृष्णा कल्पनांचा सांडुनि गलबला, स्वामी सांडुनि गलबला । दया क्षमा शांती दासी उभ्या सेवेला ॥ आतां. ॥ ३॥

दैत्याचें कपाट लाउनी एकत्र केलें, स्वामी एकत्र केलें । दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडीले ॥ आतां. ॥ ४ ॥

भावार्थाचा मंचक ह्रुदयाकाशीं टांगीला, ह्रुदयाकाशी टांगीला । मनाची सुमनें जोडुनी केलें शेजेला ॥ आतां. ॥ ५ ॥

अलक्ष्य उन्मनि नाजूक दूशेला, स्वामी नाजुक दूशेला । निरंजनी सद्‌गुरू माझा निजी निजेला ॥ आतां. ॥ ६ ॥

<poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.