"दत्ताची आरती/ जयजयजी श्रीदत्तराज ही पंचारति मी तव चरणा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ... |
(काही फरक नाही)
|
२१:२०, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती
<poem>
जय देव जय देव जय अवधूता । अगम्यें लीला स्वामी त्रिभुवनि तुझि सत्ता ॥ धृ. ॥
तुझें दर्शन होतां जाती हीं पापें । स्पर्शनमात्रें विलया जाती भवदुरितें ॥ चरणी मस्तक ठेवुनि मनिं समजा पुरतें । वैकुंठीचे सुख नाही यापरतें ॥ जय. ॥ १ ॥
सुगंधकेशर भाळीं वर टोपीटीळा । कर्णि कुंडलें शोभति वक्ष:स्थळि माळ ॥ शरणांगत तुज होतां भय पडलें काळा । तुझे दास करिती सेवासोहळा ॥ जय. ॥ २ ॥
मानवरुपी काया दिससी आम्हांस । अक्कलकोटी केंला यतिवेषे वास ॥ पूर्णब्रह्म तोची अवतरला खास । अज्ञानी जीवांस विपरीत हा भास ॥ जय. ॥ ३ ॥
निर्गुण निर्विकार विश्वव्यापक । स्थिरचर व्यापुनि अवघा उरलासी एक ॥ अनंत रुपें धरिसी करणें मायीक । तुझें गुण वर्णिता थकले विधिलेख ॥ जय. ॥ ४ ॥
घडता अनंतजन्यसुकृत हें गांठी । त्याची ही फलप्राप्ती सद्गुरुची भेटी ॥ सुवर्णताटी भरलीं अमृतरसवाटी । शरणागत दासावरि करी कृपादृष्टी ॥ जय. ॥ ५ ॥
<poem>
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |