"दत्ताची आरती/ आरती ओवाळीतो जय जय दिगंबरा दत्ता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: {{header | शीर्षक = {{लेखनाव}} | साहित्यिक = | विभाग = | मागील = [[दत्ताची आ...
(काही फरक नाही)

२१:२२, १४ सप्टेंबर २०१२ नुसारची आवृत्ती

<poem>

आरती ओवाळूं श्रीगुरू त्रैमूर्तीरुपा । सद्‌भावें पूजिता पावसि वारुनि ह्रत्तापा ॥ धृ. ॥

स्वरुप गुरुचें वर्णन करण्या मति नाही मजला । पाय तुमचे श्रीगुरुदत्ता लाजविती कमळ ॥ वर्तुळ गुल्फ सुंदर रम्य दिसती नेत्राला । कटिस्थित ती कौपिन शोभे अघटित गुरुलीला ॥ १ ॥

अरुणोदय सम छटि शोभवी श्रीगुरुमूर्तीला । हीच प्रसवली मिष्ट अन्न बहु कौतुक सर्वाला ॥ ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्रही तुष्टविलें त्याला । अतृप्त ऎसा कोणी प्राणी ग्रामिं नाहीं उरला ॥ २ ॥

दंडकमंडलु शंख चक्र आणि पद्म गदा हस्तीं । जटा मुकुट मस्तकीं कंठीं माळा शोभती । कुंदरदन हे बिंब फळासम ओष्ठ विलसती । ऎसीं श्रीगुरू त्रैमूर्ती अति सुंदर मूर्ती ॥ ३ ॥

नवस करुनी धनकरि वेगें उदिमाप्रति गेला । तव कृपेनें उदीम वाढुनि लाभ तया झाला ॥ परतुनि येता द्रव्याशेने तस्करिं वधियेला । संकट जाणुनि वधुनि तस्करां उठवीलें त्याला ॥ ४ ॥

अन्न भक्षितां विप्रापोटी चाळविला शूळ । दु:खें तळमळ करुनि प्राणत्याग दुर्बळ ॥ आपण जवळी आणविसी तूं द्रवुनी दयाळ । अन्नचि औषध देउनि शूळा हरिही तत्काळ ॥ ५ ॥

संततिसाठी वंध्या नारी प्रार्थितसे तुजला । कन्या पुत्र देउनि तींतें हरिसी दु:खाला ॥ श्वेत कुष्ठि तो ब्राह्मण धांवत स्वामींपुढें आला ॥ शुष्क काष्टाद्रुम निर्मुनि निर्मळ करिसी तयाला ॥ ६ ॥

कोल्हापुरिंचा द्विज पुत्र तो अज्ञ अपवित्र । जिव्हा छेदुनि भुवनेश्वरिसी स्तवित अहोरात्र ॥ चौदा विद्या देउनि त्यातें करिसी सुपतित्र । त्रैमूर्तीचा महिमा अपार अघटित गुरुसूत्र ॥ ७ ॥

त्रिविक्रमानें दांभिक म्हणुनि केली तव निंदा । विश्वरुप या दाउनि गर्व हरिला गोविंदा ॥ पतितामुखिं तूं सामर्थ्याने बोलविशी वेदा । वांझ महिषिला दोहुनियां तू प्राशियले दुग्धा ॥ ८ ॥

दिपवाळीचे दिवशीं स्वामी अष्टरुप होसी । अष्टगृहांसी जाउनि प्रेमें भिक्षा तूं घेशी ॥ गाणगापुरिंच्या शुद्रे स्तवितां प्रसन्न तूं होशी । शेती त्याच्या सहस्त्रपटिने धान्यपीक देशी ॥ ९ ॥

ऎसा अपार गुरुमहिमा हा वर्णु मी कैसा । भक्तरक्षणा अवतरलासी श्रीगुरु सर्वेशा ॥ नरहरि दत्ता स्वामी समर्था पावे जगदीशा । मोरेश्वरसुत वासुदेव दिन तारी या दासा ॥ १० ॥ <poem>


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.