क कुलकर्णी, रमेश विष्णू भूूसेना - लेफ्टनंट जनरल परम विशिष्ट सेवा पदक १४ एप्रिल १९३५ रमेश विष्णू कुलकर्णी यांचा जन्म बेळगाव जिल्ह्यातल्या निपाणीजवळच्या शिरगुप्पी या खेडेगावात झाला. त्यांचे शालेय शिक्षण बेळगावातील बेनन्स स्मिथ विद्यालयात, तर उच्चशिक्षण मुंबईमधील सेंट झेवियर्स महाविद्यालयात झाले. नेहमीच्या सरधोपट मार्गावरून न जाता काहीतरी वेगळे करायचे या अंत:प्रेरणेतून त्यांनी संरक्षण दलाचे कार्यक्षेत्र निवडले. १९५६च्या जून महिन्यात पायदळ भूसेनेत प्रथम गढवाल रायफल्समध्ये त्यांची नियुक्ती झाली. १९७१ ते १९७३ या काळात अरुणाचल प्रदेशातील (पूर्वीचे नेफा) उंच डोंगराळ भागात एका तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले. त्यानंतर १९८१ ते १९८३ या काळात नागालँडमध्ये बंडखोर आणि प्रतिकूल वातावरणात त्यांनी अतिशय जबाबदारीचे काम पार पाडले. एप्रिल १९८७ ते फेब्रुवारी १९८९ या काळात उत्तरेकडील सीमारेषेवर म्हणजे कारगिलपासून काडगोदम भागात मुख्यत्वे सियाचीनच्या सीमासंरक्षणाची जबाबदारी असलेल्या एका तुकडीचे त्यांनी नेतृत्व केले. याच कालावधीत दोन महत्त्वाच्या लढायांचे त्यांनी यशस्वीरीत्या नियोजन केले. वीस हजार फूट उंचीवर शून्याखालील तापमानात हे युद्ध लढले गेले. या युद्धात शौर्य गाजवलेल्या जवानांपासून ते अधिकार्यांपर्यंत अनेकांना सन्मान पदके देऊन गौरवण्यात आले. १९८७मध्ये पाकिस्तानकडून आपल्यावर जो हल्ला झाला, त्या हल्ल्याची सर्व आखणी परवेझ मुशर्रफ यांची होती. त्यावेळी मुशर्रफ पाकिस्तानचे ब्रिगेड कमांडर होते. १९९० ते १९९१ या काळात ते आसाम रायफल्सचे महासंचालक होते. त्या वेळी संपूर्ण पूर्वांचलातल्या आठ राज्यांची त्यांच्यावर जबाबदारी होती. आठही राज्यांच्या राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांचे ते सुरक्षा सल्लागार होते. उंच पर्वतशिखरांवरील, तसेच भूप्रदेशावरील अनेक सैनिकी कारवायांचे नियोजन आणि प्रत्यक्ष कारवाईत त्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. १९८८ ते १९९३ या काळात त्यांनी आसाम रायफल्समध्ये कर्नलपदी काम केले. १९९३ सालच्या एप्रिल महिन्यात ते ‘अॅडज्युटंट जनरल’ म्हणून भूसेनेतून निवृत्त झाले. त्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या गव्हर्निंग बॉडी ऑफ सर्व्हिसेस प्रिपरेटरी इन्स्टिट्यूटचे (औरंगाबाद) ते अध्यक्ष होते. ज्या तरुण मुलांना एन.डी.ए., आय.एम.ए. इत्यादी ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे, अशा विद्यार्थ्यांची या संस्थेत सर्व प्रकारची तयारी करून घेतली जाते. १९९४ ते २००५ या काळात त्यांनी या विद्यार्थ्यांच्या निवडप्रक्रियेचे काम केले. निवृत्तीनंतर भारत सरकारच्या गृहमंत्रालयाकडून एक महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. त्यांना भारत सरकार आणि नागा फुटीरतावादी यांच्यातील ‘युद्धबंदी करारा’च्या अंमलबजावणीची देखरेख करणार्या समितीचे अध्यक्षपद देण्यात आले. दोन्ही बाजूंकडून कराराचे पालन योग्य रीतीने होते आहे का नाही ते पाहणे आणि नियंत्रण ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी सांभाळली. ते एकमेव असे सेनाधिकारी होते, की जे युद्धबंदी करारावर सह्या करणार्या दोन्ही गटांना मान्य होते. यापूर्वी नागालँडमध्ये ब्रिगेड कमांडर म्हणून आणि आसाम रायफल्समध्ये महासंचालक म्हणून काम करताना नागा फुटीरतावाद्यांकडेे बघण्याच्या त्यांच्या मानवी दृष्टिकोनाचा सर्वांना चांगलाच अनुभव होता; त्यामुळे त्यांनी कुलकर्णी यांच्यावर विश्वास दाखवला. या कामाची धुरा सांभाळत असताना भारत सरकारची संरक्षण दले म्हणजे भूसेना, आसाम रायफल्स, केंद्रिय शिल्पकार चरित्रकोश
पान:शिल्पकार चरित्रकोश - खंड ४ - न्यायपालिका, प्रशासन, संरक्षण.pdf/४२१
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
![](http://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/35/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6_-_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A5%AA_-_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%2C_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%2C_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3.pdf/page421-1024px-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B6_-_%E0%A4%96%E0%A4%82%E0%A4%A1_%E0%A5%AA_-_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%2C_%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%2C_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3.pdf.jpg)