चतुःश्लोकी भागवत/पतिव्रतांचें निवासस्थान

पतिव्रतांचें निवासस्थान
जे शुद्धसत्वेंकरुनी संपन्न । नुल्लंघत पतीचें वचन । जे निर्विकल्प पतिव्रता पूर्ण । तिसी निवासस्थान वैकुंठ ॥९०॥
जे पतिपुत्रा आणि अतीता । भोजनी न देखे भिन्नता । जे घनलोभाविण पतिव्रता । ते जाण तत्त्वतां वैकुंठवासी ॥९१॥
जे पतीतें मानी नारायण । जे कोणाचे न देखे अवगुण । जे निर्मोह पतिव्रता पूर्ण । तिसी निवासस्थानवैकुंठ ॥९२॥
ज्यांसी निवास वैकुंठस्व्थान । वर्णन । श्रीशुक सांगतसे आपण । सभाग्यपण तयांचेची ॥९३॥
पविव्रतांचें वैकुंठलोकीचे स्थान
ज्या परमपुण्यें अतिपावन । त्या स्त्रिया वैकुंठी विराजमान । सौदर्यगुणें विष्णूसमान । तेज विराजमान शोभे कैसें ॥९४॥
लावण्य स्त्रियां केवीं दिसे । तेथें स्वयें स्वरुपें लक्ष्मी वसे । तद्रपें स्त्रियां सौदर्य भासे । यापरी शोभतसे वैकुंठलोक ॥९५॥
वैकुंठ नव्हे तें शुद्धगगन । मेघस्थानी गमे विमान । तेथें विद्युल्लता स्त्रिया जाण । सौदर्ये संपूर्ण झळकती त्या ॥९६॥
इतरांठायीं लक्ष्मी असे । तें ऐश्वर्ययोगें आभासे । ते निजरुपें वैकुंठी वसे । यालागी शोभतसे वैकुंठलोक ॥९७॥
लक्ष्मीसी अतिशय लावण्य । यावया हेंचि कारण । सप्रेमें सेवी हरिचरण । यास्तव शोभमान अतिसौदर्य ॥९८॥
जेणें सुख होय निजजीवा । ऐसी गोड हे हरीची सेवा । मेळवुनी उत्तम वैभवा । रमा सद्भावा हरिचरणी ॥९९॥
सर्वांगमनोहर शृंगारवनांतील लक्ष्मीची हरिसेवा
शृंगारवाटिकेमाजी डोल्हारा । लावूनीयां सुवर्णसूत्रा । लक्ष्मी निजभावें निजवरा । नानोपचारा सप्रेम भजे ॥२००॥
शृंगारवाटिकेचें वन । वसंतें शृंगारिलें संपूर्ण । पराग उधळती पुष्पांतोन । सुवासित पूर्ण वन झालें ॥१॥
मृगमद अत्यंत शीतळ । ढाळीं झळके मलयानीळ । पंचम कूजती कोकिळ । झंकारें अळिकुळ भ्रमती तेथें ॥२॥
कुंकुमकेशरकस्तूरीरोळा । एकवटपणें कर्दम केला । सुगंध चंदन उधळला । नाना सुमनमाळा सुवासित ते ॥३॥
चंद्रकांतीचें शीतळ नीर । शुद्ध सुमनांचे विचित्र हार । हंस त्राहाटिले शेजार. । त्यावरी अरुवार शतपत्राचें ॥४॥
ऐसी देखोनी शज मनोहर । संतोषोनी पहुडला श्रीधर तेथें डोल्हारियाचा दोर । अंतः स्थिर हालवी रमा ॥५॥
येथें हरिगुणचरित्र । शुक बोलती विचित्र । हरिखें कूजताती मयूर । जेवी कवीश्वर गर्जती नामें ॥६॥
कोकिळांचे पंचमस्वर । जैसे सामगायन गंभीर । मधुर भ्रमरांचें झणत्कार । सारंगधरगुण वर्णिती पैं ॥७॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.