चतुःश्लोकी भागवत/सृष्टिपूर्व गुह्यज्ञान

सृष्टी न करवे सर्वथा । करितां येईल अहंता । ऐसा ब्रह्मा ह्नणत होता । तोचि यापरी तत्त्वत्तां अनुग्रहिला देवें ॥२४॥
जो सृष्टी नकरवे ह्नणत होता । तोचि आपुल्या अकर्तात्मता । सृष्टी करावयाची योग्यता । पावला विधाता पूर्णबोधें ॥२५॥
पुढीं सांठविले बुद्धिबळ । तेजि खेळतां विस्तारिले खेळ । तेवीं पूर्वसृष्टी सकळ । ब्रह्मा तत्काळ विस्तारी स्वयें ॥२६॥
पूर्ण पावोनि समाधान । श्रीनारायणाचें चरण । वंदिता जाला चतुरानन । उल्हासे पूर्ण पूर्णानंदबोधें ॥२७॥
हे कल्पादीची गुह्यज्ञानकथा । येणें ज्ञानसंपन्न जाला विधाता । तेचि कथा ऐकतां आतां । साधका तत्त्वतां लाभ काय ॥२८॥
सृष्टीपूर्वील कथा जीर्ण । जीर्णपणें वीर्यक्षीण । परीक्षिती तूं ऐसें न ह्नण । हे नित्य नूतन टवटवीत ॥२९॥
कल्पादीचा हा दिनकर । वृद्धपणें अतिजर्जर । याचेनी नलोटे अंधकार । ऐसा विचार मूर्खही नकरी ॥७३०॥
बहुकाळ ठेविला पुरोनी । अग्निहोत्रींचा जुना अग्नि । ह्नणोनी ठेवूं जातां वळचणीं । धडधडी तत्क्षणीं नित्य नूतनत्वें ॥३१॥
तेवीं कल्पादि हें गुह्यज्ञान । गुरुमुखें ऐकतां सावधान । साधक होती ज्ञानसंपन्न । यालागीं नित्य नूतन कथा हे ॥३२॥
स्वभूस्वयंभूगुह्यज्ञान । ऐके परिक्षिती सावधान । सुखरुप होईजे आपण । यालागीं नित्य नूतन कथा हे ॥३३॥
कथा नित्य नूतन आणि गोड । निर्दळी दैन्य दुःख दुर्वाड । साधका नित्य सुरवाड । पुरवी कोड श्रोतयाचें ॥३४॥
ऐसी नित्य नूतन सुखरुपता । हरिस्रष्टयांची ज्ञानकथा हे सृष्टीपूर्वील व्यवस्था । कैसेनी हाता आली पैं ॥३५॥

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.