श्री सद्गुरू समर्थ


नित्यनेमावली


एप्रिल १९८७

किंमत ४ रुपये
अकॅडेमी ऑफ कंपेरेटिव्ह फिलॉसॉफी ॲन्ड रिलीजन
बेळगांव.
विश्वस्त मंडळ (एप्रिल १९८७)

श्री जे व्ही परूळेकर चेअरमन् श्री ए जी सराफ विश्वस्त व टेझरर श्री डी बी परुळेकर विश्वस्त व सेक्रेटरी श्री एन एस मेत्राणी विश्वस्त विश्वस्त श्री के आर कुलकर्णी श्री वाय पी पंडित विश्वस्त विश्वस्त विश्वस्त श्री आर पी कुलकर्णी जी जी देवणदिक्षित

श्री सद्गुरू समर्थ


नित्यनेमावली

१९८७

किंमत : ४ रुपये प्रकाशक :- श्री दि भा परुळेकर सेक्रेटरी अकॅडेमी ऑफ कंपेरेटिव्ह फिलॉसफी ॲन्ड रिलिजन आवृती :- प्रती :-

मुद्रक :- गुरूदेव मंदिर - हिंदवाडी - बेळगांव - ५९० ०११ - बारावी २००० ( १९८७ ) विक्रांत प्रिंटर्स हिंदवाडी- बेळगाव

पान:नित्यनेमावली.pdf/५ पान:नित्यनेमावली.pdf/६
पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना.

 प्रस्तुत पुस्तकांत श्रीभाऊराव महाराज उमदीकर यांच्या सांप्रदायांत प्रचलित असलेला भजनक्रम दिला आहे. प्रथम रात्रौ म्हणणेचें भजन व नंतर काकडआरती अशी योजना केली आहे. काकडआरतीनंतर "पंचसमासी" नामक एक पांच समासांचें प्रकरण, त्यांच्या शिष्यांपैकी गणपति पवार नामक एका सोळा वर्षाच्या मुलाने केलेले, दिलें आहे. नंतर त्यांच्या शिष्यवर्गांपैकीं मंडळीनीं केलेली चारच पदें दिली आहेत. प्रस्तुत पुस्तक सांप्रदायांतील मंडळीसच विशेषेकरून उपयोगी पडण्याजोगे आहे. बहुजनसमाजास सर्व दृष्टींनीं पसंत पडेल अशा प्रकारचें एक विस्तृत पुस्तक करण्याचा विचार होता; परंतु कांहीं कारणामुळे तो लांबणीवर टाकणे भाग पडले. सदर पुस्तक प्रसिद्ध करण्याचा योग जुळून आल्यास त्यांत पुष्कळ चांगला मजकूर येण्याजोगा आहे. प्रस्तुत पुस्तकांची किंमत थोडी ठेवणें जरूर असल्यानें भजनांतील पुष्कळ आरत्या, अष्टकें, भारुडें गाळावी लागली आहेत. हा सर्व मजकूर व शिवाय महाराजांच्या संग्रही असलेल्या असंख्य अनुभविक पदांचा व अभंगांचा सांठा व तसेच महाराजांनी पाठविलेलीं कांहीं महत्त्वाचीं पत्रे, तसेंच सांप्रदायाचा समूळ इतिहास, महाराजांचें विस्तृत चरित्र इत्यादि मजकूर पुढील पुस्तकावर लोटणें जरूर आहे. शिवाय त्यांच्या शिष्यांनी केलेलीं पुष्कळच पदें आहेत, तीं सर्वं पुढील पुस्तकांतच घालणें जरूर आहे. हा योग केव्हां जुळून येईल तेव्हां येवो! तूर्त पूर्णचंद्राचा आल्हाद चंद्रकलेतच मानून घेणें भाग आहे.

 श्रीभाऊरावमहाराज यांची परंपरा रेवणनाथ (ज्यांस रेवण- सिद्ध असेंही म्हणतात ) यांपासून आली आहे. नवनाथांची नांवें एका संस्कृत श्लोकांत दिली आहेत, तो श्लोक असा :-

गोरक्षजालंदरचर्पटाश्च | अभंगकानीफम छिदराद्याः ।
चौरंगिरेवाण च भर्तुसंज्ञा | भूम्यां बभूवुर्नवनाथसिद्धा ॥ ४ ॥

 संस्कृतज्ञ लोकांस या श्लोकांत कांहीं दोष आढळतील; परंतु श्लोककर्त्याचा उद्देश नवनाथांची नांवें एकत्र ग्रथित करणे एवढाच असल्याने त्यांतील दोष पाहणें इष्ट होणार नाहीं. असो. "नवनाथ- भक्तिसार " नामक ग्रंथांत रेवणसिद्धाचे चरित्र ३४, ३५, ३६ या अध्यायांत दिले आहे रेवणनाथ हें नांव पडण्यांचें कारण असें दिलें आहे : -

पूर्वी अठयायंशी सहस्र ऋषी । जाले आहेत विधिवीर्यासी ।
त्याच समयीं रेत महीसी । रेवातीरीं पडियेले ॥ १७ ।।
रेवातीरीं तेही रेवेंत | रेत पडले अकस्मात |
चमस नारायण संचार करोनी त्यांत । देहधारी मिरवला ॥ १८ ॥

 रेवणनाथ कृषिकर्म करीत असतां त्यास श्रीदत्ताची भेट कशी झाली, दत्तांनीं पूर्ण अनुग्रह न करता केवळ महिमा सिद्धि कशी दिली, त्या सिद्धीच्या योगानें रेवणनाथांनी चमत्कार कसे केले, पुढे मत्स्येंद्रनाथांचे तेथे आगमन होऊन, त्यांस आठही सिद्धि वश असल्यानें रेवणनायांची मानहानि कशी झाली, दत्तांचा पूर्ण अनुग्रह मिळविण्याबद्दल त्यांनी नंतर कशी खटपट केली, मत्स्येंद्रनाथांनीं गिरिनारी जाऊन श्रीदत्तांस तेथें कसें आणलें, नंतर श्रीदत्तांनी रेवणनाथांस आत्मज्ञानपारंगत करुन सर्व विद्या व सर्व कलां कशां मिळवून दिल्या, याचें सुरस वर्णन " नवनाथ भक्तिसार" अध्याय ३५ यांत दिले आहे तें जिज्ञासूंनी पहावें.

 या पुढचा रेवणनाथचरित्राचा उपयोगी भाग " सिद्धांतसार" नामक ग्रंथांत सांपडतो. रेवणनाथांचे मरुळसिद्ध नामें अनुगृहीत होते. करवीरक्षेत्रीं सिद्ध पुरुषांशीं विरोध करणारी माई या नांवाची एक स्त्री होती. तिनें आपल्या पणानें कित्येक सिद्धांस बंदिशाळेत घातलें होतें मरुळसिद्ध अचानक तेथें प्रगट होऊन त्यांनी तिचा पण जिंकला, पण माईची पूर्ण "भ्रांति फेडण्याबद्दल " त्यांस गुरुंची आज्ञा नसल्याने ते गुरूकडे गेले व त्यांस करवीरास येण्याबद्दल प्रार्थना केली. रेवणनाथांनीं विनंति मान्य केली; वाटेंत रेवणगिरी पर्वतावर विश्रांती घेतली व करवीरास येऊन माईचें सर्वविष प्राशन करून तिचा पण हरण केला व ती शरण आल्यावरून

तिची एक किनरी बनविली. ती ते नेहमीं वाजवीत असत तसें म्हणतात.

 याप्रमाणें माईचें मर्दन केलें. म्हणून रेवणसिद्ध हे त्या प्रांती ' काडसिद्ध' या नांवाने प्रसिद्ध झाले. “कानडींत 'काड' धातूचा अर्थ त्रास देणें, छळणे असा आहे. 'माईगे काडिदा ' म्हणजे माईस छळलें म्हणून त्यास ' काडसिद्ध' असें नांव पडलें ; " ( सन्मार्ग वैभव ). ' काडसिद्ध ' या शब्दाचा अर्थ कोणी 'काड म्हणजे वनांत राहून सिद्धदशेप्रत पावलेले असा करितात. ' सन्मार्गवैभव ' कर्त्यांनी असे म्हटले आहे कीं, रेवणसिद्ध व काडसिद्ध यांचा उल्लेख स्कंदपुराणांत शिवपार्वतीसंवादात आहे. प्रस्तुत लेखकानें तो ग्रंथ अद्याप पाहिला नसल्यानें त्याबद्दल विशेष कांहींच लिहितां येत नाहीं. रेवणसिद्धांपासून मरुळसिद्ध व मरूळसिद्धांपासून काडसिद्ध झाले, असे त्यांत वर्णन आहे असे म्हणतात. कांहीही असो, रेवणसिद्धच काडसिद्ध या नांवानें प्रसिद्ध झाले असोत, किवां रेवणसिद्धांपासून काडसिद्धांची उत्पत्ति झाली असो, एवढे निश्चित आहे की, रेवणसिद्ध व काडसिद्ध या उभयतांत परस्पर निकट संबंध आहे. यांच्या परस्परसंबंधाचा पूर्ण इतिहास पुढील पुस्तकांवर टाकणें जरूर आहे:

 वरील विवेचनावरून वाचकांच्या लक्षांत येईल कीं, मत्स्येंद्रनाथ व रेवणसिद्ध यांचाही परस्पर अत्यंत निकट संबंध आहे. मस्स्येंद्रनाथांच्या सांप्रदायांत गोरक्षनाथ, गंनीनाथ, निवृत्तिनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, विसोबा खेचर, नामदेव इत्यादि प्रसिद्ध

संत होऊन गेल्याचे वाचकास माहीत असेलच. त्याचप्रमाणें रेवण- नाथाच्यां सांप्रदायांत काडसिद्ध, निंबरगीमहाराज वगैरे साधुसंत होऊन गेले आहेत. श्रीकाडसिद्धांचें स्थान करवीरनजीक सिद्धगिरी नांवाचा डोंगर आहे, तेथे आहे. श्रीकाडसिद्ध यास सर्व लिंगायत लोक शंकररांश मानून ते अयोनिसंभव होते असेंही मानतात व त्यांच्या धर्माचा मुख्य उपदेशक जो बसव त्यापेक्षाही ते काडसिद्धांस जास्त मान देतात; कारण बसव हे फक्त नंदीचे अवतार असून श्रीकाडसिद्ध हे प्रत्यक्ष शंकराचे अवतार आहेत. पुष्कळ लिंगायतधर्मानुयायी लोक आत्मज्ञानी होऊन गेले, हे त्यांच्या पुष्कळ संतांनी केलेल्या प्रेमळ आणि अनुभविक पदांवरून स्पष्ट होतें. ह्या पदांची एक कुसुमावली करण्याचें आमच्या एका मित्रांनें ठरविले आहे; व त्याप्रमाणें ते त्या कार्यासही लागले आहेत. आत्मज्ञानी लोक कोणत्याही धर्मात अथवा धर्मशाखेत असोत; ते लिगायत असोत, वैष्णव असोत, दत्तोपासक असोत आत्मज्ञान झाल्या- बरोबर तें एकमेकांशी कशा सलोख्यानें वागतात याचें एक उत्कृष्ट उदाहरण श्रीज्ञानदेवमहाराज यांच्या गायेंत सांपडण्याजोगे आहे:-

ॐ नमो शिवा आदि । कावडी घेतली खांदीं । मिळाली संत- मांदी । त्याचे रजरेणु वंदी || बृ० || गुरुलिंग जंगम त्यानें दाविला आगम | आधिव्याधि झाली सम । तेणें विश्राम पावलोंडरे ।। १ ।। जवळी असतां जगज्जीवन | कां धांडोळिसी वन | एकाग्र करी मन ।

तेणें होईल समाधान रे || २ || देहभाव जेथें विरे । ते साधन दिधले पुरें | वापरखुमादेविवरें | विठ्ठल विठ्ठल विठ्ठलुरे || ३ ||

श्रीज्ञानदेव महाराज यांचे वेळीं सुद्धां आत्मज्ञानी जंगम होते हैं यावरून उत्कृष्ट रीतीने सिद्ध होतें; व त्यांची योग्यताही ज्ञानदेव- महाराजांनी कवूल केली आहे. असो.

वर निर्दिष्ट केलेले श्रीकाडसिद्ध यांचेच नारायणरावमहाराज ( जे निंबरगीमहाराज या नांवानेंही प्रसिद्ध आहेत ) अनुगृहीत होत. त्यांचे एक विस्तृत चरित्र "सन्मार्गवैभव" या नांवाने चिमडचे राममाऊमहाराज असतांना त्यांच्या एका शिष्याने छापून प्रसिद्ध केले आहे. त्याप्रमाणें त्यांनी सहज केलेला हितोपदेश 'महाराजवर- वचन' या नांवानें बाबाचार्य काव्य, विजापूर यांनीं छापून प्रसिद्ध केला आहे. निवरगीमहाराजांनी स्वतः केलेलों कांहीं कानडी पदें त्या पुस्तकाच्या शेवटीं जोडली आहेत. निंबरगीमहाराजांचा जन्म लिगायत नीलवाणी जातींत शके १७१२ त झाला व त्यांचें निर्याण शके १८०७ चैत्र शुद्ध १२ स झालें. हे आपल्या पंचविसाव्या वर्षी सिद्धगिरीस गेले असतां (पं. स. १-२२ २३ ) त्यांस तेथें जंगम - रूपाने काडसिद्धांनी अनुग्रह दिला. पुढे घरी परत आल्यावर त्यांनीं ६ वर्षेपर्यंत साधनाची टंगळमंगळ चालविली. नंतर काडसिद्धांनों त्यांस पुनः दर्शन देऊन आपले अलौकिक सामर्थ्य दाखविलें व साधन करण्याविषयों पुनः आठवण दिली. नंतर नारायणरावांनी ३६ वर्षे

अविश्रांत साधन करून सिद्धगिरीस जाऊन सद्गुरूंची भेट घेतली व जगदुद्धाराची परवानगी मिळविली; व पुढे २८ वर्षे जगदुद्धाराचें काम करून त्यांनी निंबरगी येथें देह ठेविला. त्यांच्या समाधीवर देऊळ बांधण्याचं काम हल्ली निवरगी येथें चालले आहे.

निवरगीमहाराजांचें अल्प चरित्र पंचसमासी समास १ यांत दिले आहे तें जिज्ञासूंनी पहावें. निंबरगीमहाराज हे एक अलौकिक पुरुष होऊन गेले. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे -

"The greatest men in the world have passed away unknown. The Buddhas and the Christs that we know are but second-rate heroes, in comparison with the greatest men, of whom the world knows no- thing. Silently they live, and silently they pass away and in time their thoughts find expression in Buddhas and Christs, and it is these latter that become known to us." - On Freedom

अशा महात्म्यांपैकी नारायणरावमहाराज हे होते. त्यांची दासबोधा- वर व तुकारामांच्या अभंगावर अत्यंत श्रद्धा होती. श्रीकाडसिद्धांच्या अनुग्रहानें व आपल्या साधनबलानें त्यांनी आत्मज्ञान पूर्ण अनुभविलें होतें, त्यांनी आपला मार्ग अत्यंत गुप्त ठेविला होता; त्यामुळे त्यांच्या कांहीं जिवलग मित्रांसही त्यांची योग्यता कळली नव्हती. गुप्तं आहे उदंड धन | काय जाणती सेवक जन | स आहे तें ज्ञान | बाह्यात्काराचे ||" या न्यायानें इतर जनांस त्यांचीं योग्यता कशी कळावी ? आत्मज्ञान जीर्ण झालें होतें, त्याचा त्यांनों जीर्णोद्धार केला व त्यांनी लाविलेला आत्मज्ञानवृक्ष वाढून पुढे त्यांस जशीं फळे येतील तशी त्यांची योग्यताही प्रकट होईल. , नारायणरावमहाराज यांच्या शिष्यांपैकी मुख्य म्हटलें म्हणजे रघुनाथप्रिय साधु हे होत, हे बालब्रह्मचारी पुरुष होते. काशीयात्रा करून रामेश्वरास जातांना ते निंबरगीनजीक सोनगी गांवी राहिले असतां त्यांच्या तपोवलानें त्यांनी पुष्कळ चमत्कार केले व त्यांची पुष्कळ प्रसिद्धी झाली. नंतर निवरगीमहाराज तेथें येवून त्यांनीं " तुमचा मार्ग फक्त पुण्यतंचयाचा आहे, आत्मज्ञानाचा नव्हे" अशी त्यांची खात्री करून दिली.; आणि रघुनाथप्रिय साधु शरण आल्यानें त्यावर अनुग्रह केला. ( पं. स. १- ३०, ३१. ) नंतर साधुनुवा निवरगीहून जवळच असलेल्या उमदीस जाऊन राहिले व बारा वर्षे साधन करून त्यांनी पुष्कळ ज्ञान मिळविलें. तदनंतर त्यांनीं गुर्वाशेनें पुष्कळ लोकांवर अनुग्रह केला व नंतर ते चिमडास येऊन राहिले. तेथें त्यांनी शके १८०१ चैत्र शुध्द ३ स देह ठेविला. त्यांचें ज्या जागीं दहन केलें तेथें एक मोठा वृक्ष लाविला आहे, व तेथील 'तापनाशी' तीर्थात त्यांच्या नांवें त्यांचे शिष्य रामभाऊमहाराज यांनीं एक बाण स्थापिला आहे. रघुनाथप्रिय साधु उमदीस असतांना त्यांनी भाऊरानमहाराज यांचें अंतःकरण निर्गुण उपासनेकडे कसें ओढून घेतले, त्यांस ते निवरगीमहाराजाकडे कसे घेऊन गेले, व गुर्वाज्ञा झाल्याने स्वत:च भाऊरावांवर कसा अनुग्रह केला ( पं. स. २-१७-२१), पुढें भाऊरावांनी प्रपंच चालवून परमार्थ कसा साधला ( २१ - ३१ ), लोकनिदेस कसें जुमानलें नाहीं ( ३१ ३९ ), कित्येक वर्षे, गुरूंवर विश्वास ठेवून खडतर तप सें केलें ( ४०-४५ ), निंबरगीमहाराजचा देहांत झाल्यावर प्रेमदुःखानें विव्हल होऊन दुप्पट जोरानें साधन कसें चालविलें, व अद्वैतसिद्धिी कशी मिळविली ( ५०-५५), याचें वर्णन पंचसमासी समास २ यामध्ये सापडेल. पूर्ण अद्वैतबोध झाल्यावर केवळ लोकानुग्रह करण्याच्या इच्छेनें, गांवोगांवी हिडून त्यांनीं भक्ति कशी वाढविली, व समुदाय वाढवीत असतां त्यांचें वर्तन कसें असें याचें थोड़ें दिग्दर्शन त्याच समासांत (५५-७४) ओव्यांत सांपडेल. त्यांचें वय हल्ली ६८ वर्षांचें आहे व त्यांस दोन मुलगे आहेत. त्यांनी इंचगेरी या गांवीं ( तालुका इंडी, जिल्हा विजापूर ) एक मठ स्थापिला आहे; व तेथें वर्षांतून तीन वेळेस उत्सव होत असतो. चैत्र शुद्ध ९ ते १५ पर्यंत सप्ताह होतो; नंतर सर्व श्रावणमासपर्यंत त्यांचे पुष्कळ शिष्य तेथें जमून साधन वाढ- वितात; पुन:मार्गशीर्ष शुद्ध ९ ते १५ पर्यंत दुसरा सप्ताह होतो त्या मठाचें व सप्ताहाचें वर्णन पंचसमासी समास ३ मध्ये आहे. पान:नित्यनेमावली.pdf/१६ साधु कोणास म्हणावें याबद्दल बहुजनसमाजाच्या फारच चमत्कारिक कल्पना असतात. प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान कोणीच पहात न हींत. जो नानाविध चमत्कार करतो अथवा अप्रबुद्ध बोलत असतो तोच साधु; ज्याचें शरीर वृद्धापकालींहि तेज:पुंज असतें, अथवा ज्याचा शिष्यसमुदाय फार तोंच साधु : ज्यांच्या शिष्यवर्गात पुष्कळ विद्वान व श्रीमंत लोक असतात, अथवा उपनिषदें, भाष्य वगैरेचें ज्यास उत्कृष्ट विवरण करतां येतें त्यासच साधु म्हणावें; अशा अनेक प्रकारच्या कल्पनांनीं जनसमुदायांत काहूर उठविलें आहे. आत्मज्ञानाचा लोप झाला असल्यानें जिकडे तिकडे अज्ञानांध- कार पसरला आहे. या अज्ञानांधकाराचा नाश करण्याचें दिव्य कार्य भाऊराव महाराज करीत आहेत. ते स्वतः चमत्कार करीत नाहीत; पण अनेक चमत्कार आपोआप होतात :- आपण महंती न करिती । परि सर्वत्र चयरकार होती । कां ते पुण्यमार्गे चालती । म्हणोनियां ॥ ज्ञानास सिद्धींचा विटाळ । ऐसें वदती वेळोवेळ | परी तो गोविंद कृपाळ । भक्तकाज करीतसे || पं. स. २-७१, ७२. " शब्दज्ञानानें भुलून जाऊं नका " असें ते नेहमीं सांगत ते असतात. " बाबांनो मी धनगर आहें: मला व्याकरण कोश बर्मरे १२ काही येत नाहीं; माझा स्वामी मात्र कृपेसहित हृदयों वसत आहे." असें ते नेहमी म्हणतात. कित्येक लोकांचा असा आक्षेप आहे की, महाराजांस संस्कृत येत नाहीं; भाष्यें, उपनिषदें वगैरे न वाचतां हे साधु कसे असू शकतील ? या अज्ञ लोकांस विद्वत्ता व आत्मज्ञान यांमधील फरक मुळींच कळत नाहीं. वेद कंठरवानें असें सांगत आहे:- द्वे विद्ये इह वेदितव्ये यत्परा चापरा चेति । अपरा यदुग्वेदो यजुर्वेदोऽथर्ववेदः सामवेदः । परा यया तदक्षरमधिगम्यते || " विद्वत्ता व आत्मज्ञान परा व अपरा विद्या, शद्वज्ञान व निःशद्वज्ञान यांमध्यें जमीनअस्मानाचें अंतर आहे. वेदशास्त्रांचें पठण केले म्हणजे आत्मज्ञान होतेंच असें नाहीं; वेदशास्त्राध्यायना- वांचूनही आत्मज्ञान होणें शक्य आहे. "स्थाणुरयं भारहरी वेदानधीत्य न विजानाति योर्थऽम्" । "अनुभूर्ति विना मूढो वृथा ब्रह्मणि मोदते । प्रतिबिंबित शाखाग्रफला- स्वादनमोदवत् || " इत्यादि वेदांतील वाक्येंही केवळ बिद्वत्ता व आत्मज्ञान यांतील फरक दाखवीत आहेत. प्रत्यक्ष अनुभव न मिळवितां केवळ वेदान्त वाचून आपण ब्रह्म झालों अशा कल्पनेनें कित्येक लोक फसून जातात! १३ या मुद्याचें विवेचन स्थलसंकोचास्तव येथे जास्त करता येत नाहीं. असो. श्री काडसिद्धांपासून निंबरगीमहाराजांनीं व निंबरगीमहाराजां- पासून भाऊरावमहाराजांनी जे हें आत्मज्ञान मिळविलें तें आहे तरी काय अशी येथें जिज्ञासू वाचकांस शंका येईल. ज्या ज्ञानानें पूर्वी थोर थोर ऋषी पैलपार पावले तें हेच ज्ञान होय । "व्यास वसिष्ठ महामुनि | शुक नारद समाधानी । जनकादिक महाज्ञानी । येणेचि ज्ञानें ॥ २३ || वामदेवादिक योगेश्वर | वाल्मीक अत्रि ऋषेश्वर । शौनकादि अध्यात्मसार । वेदांतमतें ॥ २४ ॥ सन- कादिक मुख्य करूनी । आदिनाथ मीन गोरक्षमुनी । आणीक बोलतां वचनीं । अगाध असती ।। २५ ।। " दासबोध ५-६. अथवा अलीकडील साधुसंतांत, " निवृत्ति ज्ञानेश्वर | नामा आणि कबीर | एकनाथ गोरा कुंभार | कलियुगामाजीं ज्ञान यांसी ।। २४३ ॥ सोपान मुक्ताबाई परमानंद जोगा पाही । भानुदास मिराबाई । रामदास सोई लाग- लासे || २४४ ।। वेणूबाई विसोबा खेचर | तुकोबा नरहरी सोनार । नरसी मेहता रोहिदास चांभार | संत अपार अनुभवी ।। २४५ ।। चहूं युगांमाजी कोणी । जे जे झाले ब्रह्मज्ञानी । ते याची अनुभवें करोनी । सत्य मानी वचमातें ॥ २४६ ॥ दीपरत्नाकर, अध्याय ४. १४ या उतारावरून इतकें व्यक्त होईल की, या सर्व साधुसंतांनीं आत्मज्ञान हेच आपलें ध्येय केलें होतें. आतां आत्मज्ञान म्हणजे काय? आत्मज्ञान म्हणजे आपण आपल्यास पहाणें. " ऐक ज्ञानाचें लक्षण | ज्ञान म्हणिजे आत्मज्ञान | पाहावें आपणासि आपण या नांव ज्ञान ।” श्रीमद्भगवद्गीतेंतही राजयोगाचें फल आत्मदर्शन हेंच दिलें आहे :- यत्रोपरमते चित्तं निरुद्धं योगसेवया । यत्र चैवात्मनात्मानं पश्यन्नात्मनि तुष्यति ॥ सुखमात्यंतिकं यत्तद् बुद्धिग्राह्यमतींद्रियम् । वेत्ति यत्र न चैवायं स्थितश्चलति तत्त्वतः ॥ - अध्याय ६ गीता. आत्मदर्शन झाल्यावर अतींद्रिय पण बुद्धिग्राह्य सुख होतें; व तें सुख अनुभवीत असतां आसनापासून हलूं नये असे वाटतें असा या गीतावचनाचा सारांश आहे. उपनिषदांतही 'परं ज्योतिरुपसंपद्य स्वेन रूपेण अभिनिष्पद्यते सोऽयमात्मा ' असें वचन आहे. पतंजलींनीं योगाचें फल 'तदा द्रष्टु: स्वरूपेऽवस्थाम्' असेंच दिले आहे. श्रुति स्मृतिपुराणांनीं जी ही आत्मज्ञानाची कल्पना करून दिली आहे ती सद्गुरूस शरण गेल्यानेंच अनुभवास येते. 'सत्वाचें चांदणें 'पहावा दर्पणींचा नयन,' 'पोथी वाचूं जातां पाहे, मातृकांमध्येचि आहे. 'करें घेतां वस्तुलागीं, आडवें ब्रह्म ' इत्यादि वाक्यांचा गुरुकृपे- वांचून बोध होणें अशक्य आहे. सर्व साधुसंतांनीं आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरितां राजयोग व भक्ति यांची विलक्षण सांगड घातली होती. आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर देव व भक्त यांमधील विभक्तपणा निघून जातो, आपण ब्रह्म आहों अशी खात्री झाल्या वर सर्वाभूत भगवद्भाव दिसूं लागतो हाच सर्व साधुसंतांचा उपदेश आहे. प्रथम आत्मदर्शन कसें होतें व नंतर अभेदबुद्धि कशी होते याचें श्रीज्ञानदेवांनीं उत्कृष्ट निरूपण केले आहे:- - नुसर्धे मुख जैसें । दर्पणीं देखिजतसें दर्शनमिसें । वायांचि देखणें ऐसें । गमों लागे || ज्ञानदेव चक्रपाणी ऐसे | दोन्हीही डोळस आरिसे । परस्परें पाहतां कैसें । मुकले भेदा || --चांगदेवपासष्टी. । धन्य ते साधु कीं ज्यांनी हा अनुभव घेतला आहे ! वरील दोन ओव्यांत ज्ञानदेवमहाराजांनीं सर्व वेद, सर्व शास्त्रे व सर्व पुगणें यांचें सार थोडक्यात सांगितले आहे याचा अनुभव येण्यास साधनें म्हटलों म्हणजे प्रथम गुरुकृपा पाहिजे, व नंतर श्रवण, विचार व अभ्यास हीं पाहिजेत: नंतर विवेकवैराग्य उत्पन्न होऊन १६

मनुष्य आत्मदर्शनास पात्र होतो. आत्मदर्शन झाल्यावर हृदयग्रंथि सुटते सर्व संशय नष्ट होतात, नैष्कर्म्यसिद्धि प्राप्त होते, व देवांत आणि भक्तांत भेद उरत नाही. साधक द्वैतापासून अद्वैतास, आकारापासून निराकारास, स्वरुपापासून ब्रह्मस्थितीस सहज प्राप्त होतो. श्रीभाऊरावमहाराजांची जी एवढी योग्यता आहे ती केवळ ते आत्मज्ञानपारंगत झाले आहेत म्हणून होय. सर्व उपनिषदांचें जे मुख्य सार तें त्यानी स्वानुभवास आणले आहे. त्यांनी प्रत्यक्ष उपनिषदें वाचलीं नसतील, पण त्यांनी उपनिषदांच्या बापास आपल्या कंठांत साठविलें आहे. श्रीतुकाराममहाराजांनी म्हटले आहे :1 " वेद आम्हांवरी रुसोनिया गेला । आम्हीं त्याच्या बाला धरिलें कंठीं ॥" आत्मज्ञानास शद्वज्ञानाची मदत होते पण आवश्यकता नाहीं, हें तत्त्व जे सदैव उराशी बाळगतील त्यांसच निःशद्वज्ञानाची प्रीति उत्पन्न होऊन बुद्धीहूनहि पर जो परमात्मा त्यास प्राप्त होण्याचा मार्ग सांपडेल. ईश्वराचें नाम घेतलें असतां रूप सहजींच प्रकट होणार आहे; अनिशीं नाम घोकिलें असतां देवास भक्तांपासून अन्यत्र जातांच येत नाहीं! वनांतरांस जाऊं नका, मंसले ठायों तुम्हांस श्रमाचें फल प्राप्त होईल. १७

बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त । तया सुखा अंतपार नाहीं ।। १ ।। येऊनि अंतरी राहील गोपाळ | सायासांचें फळ बैसलीया || २ || राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी । मंत्र हा उच्चारी वेळोवेळा ।। ३ ।। तुका म्हणे ऐसें देईन मी दिव्य । जरी होईल भाव एकविध ॥ ४ ॥ हा महाराजांचा उपदेश हृत्पटलावर सदैव कोरून ठेवण्याजोगा आहे ! एकदा एका गृहस्थांनी महाराजांस म्हटले होतें :- " तुमचें भजन ऐकिले म्हणजे तुमचा मार्ग काय आहे हें ताबड- तोब लक्षांत येतें' याची सत्यता पुढील भजन वाचण्याची जे तसदी घेतील त्यांस कळून येणार आहे. तथापि त्यांतील मुख्य स्थलें दाखविली असतां पुष्कळ लोकांस फायदा होईल असें वाटल्यावरून त्या स्थलांचा थोडा निर्देश करून ही बरीच बाढ- लेली प्रस्तावना पुरी करितों. जसजसा गुरूपदेशाचा अनुभव येईल तसा तसा गुरुपदीं जास्त अभिलाष उत्पन्न होतो ( विषय नं. २ ). अलक्ष्यों लक्ष्य लाविलें असतां निजवस्तु प्रत्ययास येते; १८

घडि पळ घडोनें काळाचें मात्र सार्थक करावें ; संतप्रमाण आत्मज्योत सहज प्रतीतीस येते ( वि. नं ३) अहंकारावर स्वार होऊन त्याचा पाडाव केल्यावर अनुहृताच्या विजयदुंदुभि वाज- तात व "सर्वत्र तदीक्षण" रूपी एकांतभक्ति उत्पन्न होते (४). गुरुंच्या उपकाराचें उतराई होणें केव्हांही शक्य नाहीं ( ६ ). त्रिवेणीचें नित्यं स्नान करून आत्मारामाचें दर्शन घेतलें असतां "कर्मण्य कर्म" व "अकर्मणि कर्म " सहज होतें (७). देह हीच खरी पंढरी, व आत्मा हाच खरा विठ्ठल (९). निस्त्र्यैगुण्य प्राप्त करून घेण्यास प्रथम सत्त्वाचें सामर्थ्य उत्पन्न झाले पाहिजे. "सत्वेनान्यतमो हन्यात सत्वं सत्वेन चैव हि" (१०). आपण कोणीही तरेल; पण जो दुसऱ्यांस उद्धरील तोच खरा साधु (११). मंगेप्रमाणे आपले मन स्वच्छ झाले असतां भगवंत जवळच उभा आहे. अशा पुरुषांस श्रुतिसंमत अंगुष्ठाप्रमाणें रूप दिसतें; अनुभवी मनुष्यासच ही खूण कळणार. "येरा टकमक " पाहूं लागतो (१३). आत्मस्वरूप हें ज्ञानदृष्टीचें देखणें आहे; चर्मदृष्टी पाहू शकत नाहीं. सत्संगानें प्रारब्धरेषा उगवते, व हरीच्या गुणनामांचा घोष केला असतां पापें जहून जातात (१४). देहभाव विराल्याखेरीज वस्तु प्राप्त होत नाहीं (१५). साधकांनी कल्पनेचें आडरान न घेतां आपण आपल्यास पाहून आनंदांत निमग्न व्हावे ( १६ ). सर्व प्राणिमात्रांवर दया करणें हेंच आत्म१९

ज्ञानाचें प्रथम साधन आहे (१८). : अंत:करणति समुद्राप्रमाणे शांति उत्पन्न होऊन जडमूढपिशाचवत् पृथ्वीवर साधु हिडतात, ते लोकांस मूर्खाप्रमाणे भासतात, पण स्वतः ब्रह्मानंदांत मग्न असतात त्यांचें वर्म योग्याखेरीज दुसऱ्यांस कळत नाहीं (१९). लवण जसें समुद्राला मिळून तदाकार होतें, तसेंच साधु ब्रह्मास मिळतात व त्यांचें नामरूपही लयास जातें ( २० ). 'साधन करितां करितां सद्भक्ति उत्पन्न होईल, व सद्भक्तीनें साक्षात्कार. होईल (२१). पदोपदीं श्रीमुख पाहिल्यावर नंतर प्रत्यक्ष पाउलें दिसतील (२२). श्रीविठ्ठल म्हणतात कीं, "हे तुकारामा, तुझ्या अभंगाचें जें प्रेमानें पठण करितात त्यांच्या विपत्ती मी स्वतः हरण करितों," (२५). ज्या गुरूंपाशीं सर्वदा देव आहे त्यांचे चरणीं भाव ठेविला असतां आपल्यास देवाची प्राप्ति सहज होते ( २६ ) . वामसव्य, खालींवर, सबाह्यअभ्यंतरीं सर्वत्र देवाचें दर्शन होतें ( ६९ ). देवाचें दर्शन झाल्यावर आनंदानें त्रिभुवन कोंदाटून जातें (४१). देहामध्येच देव पाहून निर्गुणाच्या ज्योतीनीं त्यांस ओंबाळावें (४८). चंद्रसूर्य हेच तेथें दिव्याचें काम करितात (४९). पांडुरंगाच्या आरतीच्या वेळेस महाद्वारीं सिंहशंखनाद व भेरीगजर होत असतो (कांकडआरती ६). अंतरी आरती चालली असतां त्या प्रकाशांत रविशशि सुद्धां लोपून जातात, व अनाहत वाद्यांचा गजर होतो; व आनंदसागरांत बुडी २० दिल्यानंतर जो स्थिति प्राप्त होते ती वाचेनें बोलून दाखवितां येत नाहीं, किंवा मनानेंही आकलन करतां येत नाहीं (कांकड- आरती ७). पुढे भजनांत जे तुकारामांचे बारा अभंग दिले आहेत (१०-२१) ते व त्यापुढील २ अमंग हे निंबरगीमहाराजांच्या वेळेपासून या सांप्रदायांत नित्य म्हणण्याची वहिवाट पडली आहे; हेच कोठें "चवदा अभंग" या नांवानें प्रसिद्ध आहेत. विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी म्हटले आहे :- तुकाराम, नामदेव, ज्ञानदेव इत्यादिकांचे अभंगही किती आहेत याचा ठिकाण नाहीं. · चार कोटी एक लक्षाच्या शेवटीं । चवतीस सहस्त्र स्पष्ट सांगितले || सांगुनि इतुकें तुका कथिता झाला | 'चवदा अभंगा' सोडूं नका ।। " याचाच निराळा पाठ आमच्या भजनांत अभंग २३ यांत पहावा. हे बारा अमंग श्रीतुकाराम महाराजांनीं विदेहमुक्ति मिळविल्यावर त्यांची टाळ आणि गोधडी जी खालीं पडली त्या- बरोबर शेवटचा निरोप म्हणून पाठविले आहेत. " टाळ आणि कंथा धाडिली निशाषी घ्या रे ओळखोनि सज्जन हो || माझें दंडवत तुम्हां सर्व लोकां । देहासहित तुका वैकुंठासीं ।। " २१ हे अभंग तुकाराममहाराजांचेच आहेत अशी लोकांची खात्री व्हावी म्हणून "टाळ आणि कंथा" निशाणीरूपाने त्यांज- बरोबर पाठविण्यांत आल्या. ही निशाणी पाठविण्यांत आली तथापि ते तुकारामहाराजांचेच आहेत किंवा कसें याबद्दल मोठघा लोकांत सुद्धां मतभेद आहेत. अलीकडे निर्णयसागर प्रेस, इंदिरा प्रेस किंवा इंदुप्रकाश प्रेस यांनी छापलेल्या गाथेंत हे अभंग दिलेच नाहींत. ह. भ. प. विष्णुबुवा जोग यांच्या सार्थ गाथेंत क्षेपकांतही हे अभंग दिले नाहींत. हे अभंग स्वतंत्ररूपानें मात्र उपलब्ध आहेत; व पुष्कळ साधुसंतांच्या तोंडी असल्यानें पुष्कळ प्रसिद्ध पावले आहेत. शिवाय तुकारामतात्या यांनी आठ दहा हजार अभंगांची जी तुकारामाची गाया दोन भागांत छापली आहे तींतही हे सापडतात. याखेरीज हे अभंग तुकारामांचेच आहेत असे म्हणण्याबद्दल आणखी एक पुरावा आहे. त्या अभंगांतोल विलक्षण प्रेमळपणा व ओतप्रोत भरलेला स्वानुभव यांचा विचार केला असतां हे अभंग तुकाराम- महाराजांच्या वाणींतूनच बाहेर पडले असावे असें सवळ अनुमान होतें. · अभंगसंख्येबद्दल तरी बरें ! तुकाराममहाराजांच्या लोकांत एकमत कोठे आहे ? हल्लींच्या ज्या नांवाजलेल्या था आहेत त्यांत ४/५००० च अभंगांची संख्या आहे तुकाराम- G २२ तात्यांच्या गायेंत ८1१००० दिली आहे वर घेतलेल्या शास्त्री- बोवांच्या उताऱ्यावरून व शिवाय आमच्या अभंग २३ वरून ‘चार कोटी एक लक्ष चौतीस हजार अभंगसंख्या आहे असें दिसतें. महिपतीच्या म्हणण्याप्रमाणें ४ कोटी आणि कांहीं लक्ष संख्या आहे ( संतलीलामृत). तुकाराममहाराजांची अभंगसंख्या ठरविण्याच्या दृष्टीने आमच्या भजनांतील अभंग २४ अतिशय महत्त्वाचा आहे ; तो जिज्ञासूंनीं अवश्य वाचावा. त्यांत पांच कोटी एक लक्ष चौतीस सहस्र अभंगसंख्या असल्याबद्दल उल्लेख आहे रा. शंकर पांडुरंग पंडित यांनी हा अभंग आपल्या इंदुप्रकाशगाथेत प्रस्तावनेंत दिला आहे. फक्त " तीस लक्ष केली देवांसि करुणा । कर्मकांड जाणा एक लक्ष ||" ही ओळ गाळली आहे. ही ओळ गाळूनही त्यांची बेरीज वरील संख्येवर गेली आहे ! आतां आमच्या अभंगाप्रमाणें बेरीज करितां पांच कोटी एक लक्ष चौतीस सहस्र बेरोबर बेरीज येत आहे :- 79 १२००० संहिता १०००० उपग्रंथ ( अवतार सहस्र दशसहस्र ) १००००००० भक्ति १००००००० ज्ञान ७५००००० वैराग्य ७५००००० नाम ६०००००० बोध ६०००००० रूप ३.३ ३०००००० करुणा १००००० कर्मकांड १२००० स्वानुभव ५०१३४००० पांच कोटी एक लंझ चौतीस हजार हा अभंग तुकारामांच्या अभंगसंख्येच्या चर्चेत अत्यंत महत्त्वाचा आहे म्हणून इतक्या विस्तारानें लिहिणें भाग पडलें ! ¿ प्रस्तावना बहुतेक संपली प्रथम लहान प्रस्तावना लिहि- ण्याचा उद्देश होता, परंतु लिहिण्यास सुरवात केल्यावर प्रत्येक महत्त्वाचा प्रश्न डोळयांपुढे उभा राहिल्याने त्यांचे थोडें ना थोड़ें तरी विवरण केल्याखेरीज पुढे जाववेना महाराजांचें समग्र चरित्र लिहिणें कोणाच्या नशिबीं असेल तें असो त्यास ही प्रस्तावना थोडीबहुत तरी उपयोगी पंडावी व शिवाय सांप्रदाया- बाहेरील लोकांस या सांप्रदायाची मुख्य शिकवण कोणती हैं कळावें या उद्देशानें ही प्रस्तावना लिहिली आहे. पुढे छापलेल्या भजनांत कांहीं पाठ अशुद्ध असण्याचा संभव आहे. परंतु पुष्कळ मेहनतीनें सांप्रदायांतील पाठ इतर पाठांशीं ताडून योग्य ते पाठ २४ घेण्याची व्यवस्था केली आहे. जेथें दोन्ही पाठ सारखेच वाटले तेथें सांप्रदायांतीलच ठेविला आहे. भजनाचें हस्तलिखित पुस्तक व पंचसमासी नामक प्रकरण हीं आमचे मित्र रा. पंचनदीकर यांजकडे शुद्धिकरितां प्रथम पाठविलीं होतीं; त्याप्रसंगी त्यांनी केलेले पद शेवटों दिले आहे. तदनंतर ती पुन्हां अमव्या दुसन्या एका गुरुवंचूकडे पाठविण्यात आली, त्यांनीं होतां होईल तो शुद्ध करून तो आम्हांकडे परत पाठविली. प्रस्तावना, पंच- समासी समास २ पैकीं पुष्कळ भाग व पांचव्या समासांतील मुक्तिलक्षण (६७-८१) ही त्यांच्याच हातचीं आहेत. शेवटीं ज्या परमेश्वरानें हैं पुस्तक छापण्याचा सुयोग घडबून आणिला त्याचे चरणींच तें अर्पण करून ही प्रस्तावना पुरी करतो. -प्रकाशक. २५ सातव्या आवृत्तीची प्रस्तावना - नित्यनेमावलीची पहिली आवृत्ती श्रीसमर्थ भाऊसाहेब - महाराज असतानाच रा. रा. विष्णुपंत फडके यानी १९११ सालीं प्रसिद्ध केली. त्यानंतर श्रीसमर्थ महाराजांनीं १९१४ मध्ये देह ठेविल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजे १९१७ सालीं रा. रा. विष्णुपंत फडके यांनींच त्या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रसिद्ध केली. या आवृत्तींत श्रीमहाराजांच्या निर्याणाबद्दलचा अभंग प्रथम छाप- ण्यात आला होता. तो अभंग या आवृत्तींतही पुढे दिलाच आहे. नित्यनेमावलीची तिसरी आवृत्ती रा. रा. शिवलिंगप्पा चिक्कोण यांनी जमखंडी येथे १९२४ सालीं छापविली व चौथी आवृत्ती रा. रा. नीलकंठराव तुळपुळे यांनीं सन १९३० साली पुणे येथे प्रसिद्ध केली. पुढें तीन वर्षांनी श्री अंबुराव महाराजांनी १९३३ च्या डिसेंबरमध्ये देह ठेविला. त्यांचें रा. रा. मनोहरपंत देशपांडे, अथणी यांनी रचलेलें ओवीबद्ध अल्पचरित्र सहावा समास म्हणून, सहाव्या व या आवृत्तींत घातला आहे. 'नित्यनेमावली' अत्यंत अल्प किमतीत साधकांना मिळावी, या उद्देशानें ही आवृत्ती प्रसिद्ध केली जात आहे. श्रीगणपती संस्थान प्रेसकडून संपूर्ण सहकार्य लाभल्यानेंच या स्वस्त आवृतीचें प्रकाशन होत आहे हें कळविण्यास आम्हांस आनंद वाटतो. माघ शु. ३. शके १८७६. . प्रकाशक २६ आठव्या आवृत्तीची प्रस्तावना. · नित्यनेमावलीच्या या आठव्या आवृत्तींत खालील नवीन मजकूर घातला आहे, तो वाचकांना उपयुक्त वाटेल यांत शंक नाहीं. (१) कांहीं नवीन आरत्या ( आरती क्रमांक १२ ते १६ ) ( २ ) या नेमावलीची पहिली आवृत्ती तयार होण्यापूर्वी इंचगेरी मठांत चिमडमठांतील पांच पधें म्हटली जात असत; तो पांच पद्येहीं नेमावलोंत अंतर्भूत व्हावीत अशी इच्छा श्रीगुरुदेवांनीं प्रदर्शित केली होती. (६) श्रीअंबूरावमहाराजांच्या चरित्राचा नवीन समास घातल्यावर पूर्वीच्या "पंचसमासी" ची षट्समासी पांचव्या आवृत्तींत आली. या आवृत्तींत श्रीगुरुदेवांच्या चरित्राचा श्री. मनोहरपंत देशपांडे यांनी रचलेला समास अंतर्भूत केला आहे. आतां ही सप्तसमासी पूर्ण झाली. या आवृत्तीच्या छपाईचें काम श्रीगणपति संस्थान प्रेसनें काळजीपूर्वक करून दिले त्याबद्दल व्यवस्थापकांचे व कामगारांचे आभार मानणें अवश्य आहे. माघ शुद्ध ३ शके १८८२ प्रकाशक. दहाव्या आवृत्तीची प्रस्तावना " ज्येष्ठ शुद्ध दशमी शके १८७९ ( दि. ६-६-१९५७ ) रोजी श्रीगुरुदेव रानडे यानी निंबाळ येथे देह ठेविला. त्यांचे एक ओवीबद्ध अल्पचरित्र रा. रा. मनोहरपंत देशपांडे यानी रचलेले " श्री गुरुदेववचनामृतसार " हा सातवा समास म्हणून घालून या पुस्तकाची आठवी आवृत्ति श्री गणपति संस्थान प्रेसमधेच छापवून, १९६० साली प्रसिद्ध करण्यांत आली. तदनंतर याची नववी आवृत्ति पचसमासीतील कांही भाग कमी करुन व इतर कांहीं पदे वगैरे जास्त घालून, १९७६ साली श्रीमति चंद्रकलाबाई हाटे मुंबई यांच्या सहकार्याने प्रसिद्ध करण्यांत आली आणि त्यांच्या इच्छेनुसार त्याच्या प्रति साधकाना विनामूल्य भेट म्हणून देण्यांत आल्या. नित्यनेमावलीची दहावी आवृत्ति श्रीगुरुदेवानी स्थापन केलेल्या " अँकॅडेमी ऑफ कंपरेटिव्ह फिलॉसोफी अँड रिलिजन् बेळगांव " या संस्थेच्या सहकार्याने माघ शुद्ध ३ शके. १९०० (ता. ३०-१-१९७९ ) रोजी प्रसिद्ध झालो. या आवृत्तीमध्ये काकड आरती व त्रिकाळ भजन या शिवाय पुढील मजकुराचा समावेश करण्यांत आला आहे :- (१) श्रीभाऊ साहेब महाराज असताना प्रसिद्ध करण्यांत आलेले 'पंचसमासी" हे प्रकार जसेच्या तसें संपूर्ण यांत दिले असून, त्याबरोबर श्री अंबुराव महाराज व श्रीगुरुदेव रानडे यांची ओबीबद्ध अल्पचरित्रेंही देण्यात आली आहेत. (२) श्री शिवलिंगव्वा बाक्का यांची काही पदे RD 17 २८ आरत्या व पाळणा यांचाही समावेश यांत केला आहे. (३) सप्ताहाचे प्रसंगी सकाळी ( ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादि ) पोथीचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रारंभी पठण करण्यांत येणारे “नारायणस्तोत्र व निर्वाणषट्क" ही दोन्ही प्रकारणे साधकांच्या माहितीसाठी व सोयीसाठी यांत दिली आहेत. (४) दासबोधांतील नामस्मरण भक्ति व सख्य भक्ति " हे दोन्ही समास साधकांच्या दृष्टीने विशेष उपयुक्त म्हणून मानले गेले असल्याने त्यांचा, तसेंच "मनाचे श्लोक " पहिले दहा, यांचाही समावेश यांत केला आहे. (५) या नित्यनेमावलीची पहिली आवृत्ति तयार होण्यापूर्वी, चिमड मठातील ती 'पांच पदे' इंचगेरी येथील मठांत म्हटली जात असत ती पदेही श्रीगुरुदेवांच्या इच्छेनुरूप साधकांच्या माहितीसाठी या आवृत्तीत समाविष्ट केली आहेत. (६) याशिवाय काही नवीन आरत्या, पदे वगैरेही यांत दिली आहेत. • याप्रमाणें साधकाना अनेक दृष्टीनी उपयुक्त अशी नित्यनेमा- वलीची दहावी, अकरावी व ही बारावी आवृत्ति श्रीसमर्थ कृपेनें व या ॲकॅडमीच्या सहकार्याने साधकांच्या हाती देण्याचा सुप्रसंग लाभल्याने आनंद होत आहे. बेळगांव: माघ कृष्ण २, शके १९०८ (तारीख १५-२-१९८७) प्रकाशक श्री सद्गुरुनाथ भाऊसाहेब महाराज उमदीकर जन्म-उमदी शके १७६५ रामनवमी समाधी-हिंचगेरी शके १८३५ माघ शु. ३ १ श्रीसद्गुरुनाथ भाऊसाहेबमहाराज उमदीकर यांचें निर्याण. -- गुरुवार, माघ शुद्ध ३ शके १८३५. ( तारीख २९ माहे जानेवारी, सन १९९४ ). संग्लेसें वाटे अवतारकार्य । म्हणोनिया काय त्वरा केली ॥ १।। जातों म्हणोनिय सागितलें आधा सर्वही उपाधी त्यागियेली ॥२॥ शिष्य विनवितो आवणासो जाणें । मागें भक्ति कोणें चालवावी ॥ ३ ॥ तुम्हांसी हो त्याची काय चिता | भक्ति चालविता देव असे ||४|| चिता केली तरी होईल तें होतें | कदा चुकेना ते देवकाज ||५|| ऐसें वदोनिया वाणी बंद केली । आंत नामावळी चाललीसे ||३|| नाम चालवीलें एकादश दिन भोजनजीवन त्यागियेलें ||७| माघ शुद्ध तृतीया दिन गुरुवार | रात्र एक प्रहर झाली असे ||८|| शिष्य मिळोनिया करिती भजन | सप्रेम जीवन डोळां लोटें ।।९।। मजनाचे अंती विठ्ठलगर्जना । अतिप्रेम जाणा चालली से ।।१०।। कापुराची ज्योती निमतां देखोनि | टाळी वाजवूनी देह सोडी ॥ ११॥ सोडी देह आमुचा धन्य गुरुनाथ | ज्योती मध्ये ज्योत गुप्त झाली || १२ || २ काकड आरती. नारायण, नारायण, नारायण, नारायण ॥ बेळगायितु, बेळगायितु, वेळगायितु, बेळगायितु ।। एळु नारायणा एळु लक्ष्मी रमणा एळु श्रीगिरिवास श्रीव्यंकटशा पहला कासिद हालुगळु कावडियल्लि तुंबि लेसागि हाल्मोसरुवेण्णेयनु कडेदु । शेषशनने एछु समुद्रमथनव माडू देश केंपायितु एजु हरिये ||१|| अरळुमल्ल गिजाचि परिमळद पुष्पवन सुररु तदिट्टारे सुजनरेल्ला | अरविंदलोचना श्रीगोपालकृष्णा एळय्या एळु निनगेष्टु निद्रा ||२|| दासरेल्लंरु बंदु धूलिदर्शन गोंडु लेसागि ताळदंडिगे पिडिदु । आदिकेशव निम्म पुण्यनास्मरणि उदयदल्लेदु पाढतिर्परु हरिये ॥३॥ (२) शरणु सिद्धिविनायका शरणु विद्याप्रदायका | शरणं पार्वतितनयमूरुति शरणु मूषकवाहन ।। पहल /. निटिलनेत्रन वरदपुत्रने नागभूपणा प्रियने । कटिकरांकितकोमलांगने कनककुडलधारने ।। १ ।। बटुमुत्तिन पदकधारने बाहुहस्तचतुष्टने | इट्ट तोळदि हेमकंकण पाशांकुशधारन || २ || कुक्षिमहालंबोदर ने इक्षुचापन गेलिदने | पक्षिवाहह्ननाद पुरंदर विठ्ठलन जिदाने || ३ नारायण, नारायण, नारायण, नः रायण || ।। es ( २ अ ) ( सोमवार, गुरुवार आणि सप्ताहाचे अवधीत म्हणणेची ) me • भूपाळी - 1 येळु सद्गुरुनाथ | येळु करुणानिधिये । येळुनी उमदीश | जगदीशनय्या ॥ध्रु०॥ जगदोळगे दृश्य अवतारवनु धरिसिदी || सर्व धर्मद ममं तिळिसी कोट्टी || वेदके निलुकद ईशननु तोरिसिदो । गुरुदेव नी यन्ननु धन्य माडिदी ॥ १ ॥ गुरुविनिदले भक्त्ति गुरुविनिंदले मुक्ति | गुरुविनिंदले सहज परमेशप्राप्ती || गुरुदेव निन्नहोरतु अन्यदेवरु याके | गुरुविना दयवंदिरे साके || २ || धन्य गुरुदेवनें धन्य उमदीशने || धन्य नौ सत्धर्म प्रतिपालकने | धन्य निन भक्तरु भारतिय बेळगुवरु || भक्ततारक गुरुवे बेगनेलय्या ॥३॥ (३) उठोनिया प्रातःकाळीं । वेगें जाऊ राउळासी । जळतिल पातकांच्या राशी । काकडआरती देखिल्या उठा उठा हो साधुजन । साधा आपुलाले हित । गेला गेला नरदेह | मग कैंचा भगवंत उठोनिया पहाटे । विठोबा पाहूं वा नीट | चरण तयाचे अमोलिक | अवलोकूं दृष्टीं या जागे करा रुक्मिणीवरा । देव निजले निजमंदिरां । । वेगीं निंबलोण करा | दृष्ट होईल तयासी ढोल दमामें गर्जतीं । पुढें वाजंत्री वाजती । काकडआरती होते। पांडुरंग रायाची सिंहशंखनादभेरो । गजर होतो महाद्वारीं । केशवराज विटेवरी। नामा चरणीं वंदितो ( ४ ) गुरु हा संतकुळींचा राजा | गुरु हा प्राणविसांवा माझा | गुरुवीण देव नाहीं दुजा । पाहतां त्रिलोकीं गुरु हा सुखाचा सागर । गुरु हा प्रेमाचा आगर । गुरु हा धंर्याचा डोंगर । कदा काळीं डळमळेना गुरु हा सत्यालागीं साह्य | गुरु हा साधकासी माय । गुरु हा कामधेनु गाय | भक्ता घरीं दुभतसे गुरु हा भक्तीचें मंडण | गुरु हा देहासी दंडण | गुरु हा पापाचें खंडण | नानापरी वा रितसे गुरु हा वैराग्याचें मूळ | गुरु हा परब्रह्म केवळ । गुरु हा सोडवी तात्काळ । गांठी लिगदेहाच्या गुरु हा घाली ज्ञानांजन | गुरु हा दाखवी निजधन । गुरु हा सौभाग्य देऊन स्वात्मबोध नांदवी काया काशी गुरु उपदेशी । तारक मंत्र दिला आम्हांसी । बापरखुमादेवीवरासी । ध्यान मानसीं लागलें ( ५ ) फळलें भाग्य माझें । धन्य झालों संसारीं । सद्गुरु भेटले हो । त्यानीं धरियेलें करीं । पश्चिमे चालवीलें । आत्मा तेथें निर्धारी । त्रिकुटावरी नांदे | देखियेली पंढरी तें सुख काय सांगूं । वाचें बोलता नये । । आरतीचेनि योगें । गेलें मीपण माये राउळामाजीं जातां । राहे देह-अवस्था | मन हें उन्मत झालें । नसे बद्धतेची वार्ता । हेतु हा मावळला | शद्वा आलो निःशद्वता | तटस्थ होउनि ठेलें । निजरूप पाहतां ॥४॥ ॥६॥ ॥७॥ ॥ १॥ ॥ धृ०॥ ॥२॥ त्रिगुण गुण बाई । पूर्ण उजळल्या वाती । नवलाव अविनाश । न जाये स्वयंज्योती । लावितां लक्ष तेथें । हालूं विसरलीं पातीं । नातुडे मन माझें । न कळे दिवसराती आरती विठ्ठलाची । पूर्ण उजळली अंतरीं । प्रकाश थोर झाला । सांठवेना अंबरीं । रविशशि मावळले । तया तेजामाझारीं । वाजतीं दिव्यवाद्ये । अनह्त गजरीं आनंदसागरांत । प्रेमें बुडी दिधली । लाधलें सौख्य मोठें । नये बोलतां बोलीं सद्गुरूचेनि संगें । ऐसी आरती केली । निवृत्ति आनंदांत । तेथें वृत्ति निमाली विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल, !!! पुंडलीक वरदा हरि विठ्ठल !! ॥३॥ ॥४॥ प्रार्थना (१) याचेऽहं करुणासिन्धो यादज्जीवमिदं तव । अदैन्यं देहदाढयं च त्वत्पादाम्बुजसद्मतिम् ||१|| अनाद्यनन्तकालेषु भृत्योऽहं त्वां हि मे प्रभो । स्वं तुष्टो वाऽथ रुष्टो वा त्वां विना मे गतिर्नहि || २ || तुष्टोऽसि त्वं दयासिन्धो किमन्यैर्मम रक्षणे || रुन्टोऽसि त्वं दयासिन्धो किमन्यैर्मम रक्षणे ॥ ३॥ दोषाणां च सहिष्णुत्वे त्वत्समो नास्ति भूतले । मत्समो नहि देवेश कृतघ्नो वञ्चकोऽपि वा ॥४॥ ईशस्य खिलवीर्यस्य किमसाध्यं वदाच्युत ममेष्टं च कियन्मात्रं किमेतावद्विलम्बनम् ।।५।। जगत्स्वामी कृपापूर्ण: सम्भवेन्निर्दयापरः | का तदा गतिरस्माकं गरदायां स्वमातरि ।।६।। त्वमेवैको जगत्त्राता दाता ज्ञाता दयान्वितः | त्वां विना कः पुमान् कर्ता ह्यस्माकं तु मनोरथम् ||७|| आतंबन्धुरिति ज्ञात्वा त्वामहं शरणं गतः । रक्षमामथवा सम्यक् त्वं यशो मुञ्च शाश्वतम् ||८|| दीनबन्धो दयासिन्धो सुहृद्बन्धो जगत्पते । संसारार्णवमग्नं मां कारुण्येन सुमुद्धर ||९|| ८ निर्गुणेष्वपि सर्वेषु दयां कुर्वन्ति साधवः । नहि संहरते ज्योत्स्ना चन्द्रश्चाण्डालवेश्मनि ॥१०॥ प्रसीद मे श्रियः कान्त सुप्रसीद दयानिधे | पुनः पुनः प्रसीद त्वं प्रसीद वरदो भव ॥११॥ (२) | तापत्रयें हा बहु गांजलो मी बुद्धि स्थिरावे नच शीघ्र रामी || मनें वोढिलों सर्वदा कामपाशीं । गुरो कृपाळो धरि शीघ्र हातीं ॥१॥ विपत्ती असो सर्बदा कुंति मागे। हरीचें जरीं सर्वदा ध्यान लागे || सुटेना कदा भोगल्यावीण भोग | परी सवंदा नाम इच्छी अमंग || २ || मनीं प्रेरणा थोर आतां करावी । सदा वस्तुनें दृष्टि तुम्ही भरावी || शरौरों सदा नेम हा वाढवावा | सदा बुद्धिला ज्ञानयोगींच ठेवा ||३|| सदा संतसंगी रमो चित्त माझे । सदा तत्पदों वास माझा असो दे ।। कधीं दाविसी आमुची पंढरी ही भरे मानसी सर्वदा | इंचगेरी ||३|| संसारतापे बहु तापलों पहा | निवृत्तिमार्गे मज शीघ्र चालवा | नसे दुसरा रक्षिता कोण मातें कृपा पूर्ण दासान्दासा असों दे ।।५।। सकाळचें भजन गणाधीश जो ईश सर्वां गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा । नमो शारदा मूळ चत्वारि वाचा । गमो पंथ आनंत या राघवाचा ॥१॥ नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमम् | देवीं सरस्वतीं व्यामं ततो जयमुदीरयेत् श्रूयतां देव देवेश नारायण जगत्पते । स्वदीयनामध्यानेन कथयिष्ये शुभा: कथा: ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् । द्वद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् | एकं नित्य विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् | भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि (२) ।। ४ ।।

सद्गुरुनाथ माझे आई । मला ठाव द्यावा पायों ॥ मला ठाव द्यावा पायीं । सद्गुरुनाथ माझे अ.ई | मला ठाव द्यावा पायीं ॥ (३) IT R TI ।।३IT ( २ वेळ ) ( २ वेळ ) ( २ वेळ ) ॥२॥ पहिलें गहतां श्रीमुख 1 तहान हरपली भूक पहा पहा डाळेभरी । मूर्ति सांवळी गोजिरी रवि शशि ज्याच्या कळा । तो हा मदनाचा पुतळा || ३ || तुका म्हणे वर्णू काय | घेतो अलाया बलाया ।। ४।। ू १० ( ४ ) वामसव्य दोन्हीकडे दिसे देवाचें रूपडें खाली पाहे अथवा वरी । जिकडे पहावें तिकडे हरी डोळे झांकूनियां पाहें । पुढें गोपाळ उभा आहे अणुरेणु चक्रपाणी खूण झाली दासी जनी (५) हडबडलें पातक । रामनाम घेतां एक नाम घेतां तत्क्षणीं। चित्रे ठेविली लेखणी घेउनि पूजेचा संभार | ब्रह्मा येतसे सामोर नामा म्हणे हें जरी लटकें । तरी छेदावें मस्तक तिळाएवढे बांधुनि घर आंत राहे विश्वंभर तिळाइतुकें हें बिंदुलें । तेणें त्रिभुवन कोंदाटलें हरिहराच्या मूर्ती । बिदुल्यांत येती जाती तुका म्हणे हें बिंदुलें । तेणें त्रिभुवन कोंदाटलें ॥ २ ॥ ॥३॥ ॥४॥ ॥ १ ॥ ।। २ । ॥३॥ ॥ ४॥ TE ॥ ३ ॥ T४ IF ( ७ ) आनंद रे आजि आनंदु रे । सबाह्य अभ्यंतरी अवघा परमानंदु रे |१| एक दोन तीन चार पांच सहा | इतुकें विचारूनि अंतर शोधोनिया पहा | २ सातवा राम आठवा वेळोवेळां । बापरखुमादेवीवरु विठ्ठल जवळा | ३ (८) 1१11 ||२|| कृपाळू सज्जन तुम्हीं संतजन | हेचि कृपादान द्यावें मज आठवण तुम्हीं द्यावी पांडुरंगा | देवा माझी सांगा काकुळती अनाथ अपराधी पतित आगळा । परि पायांवेगळां नका करूं ||३|| तुका म्हणे तुम्हीं निरविल्यावरी । मग मन हरी उपेक्षीना ||४|| (९) नाम वाचे श्रवणीं कीर्ति । पाउले चित्तीं समान काळ सार्थक केला त्यांनीं । धरिला मनीं विठ्ठल कीर्तनाचा समारंभ | निद्वंद्व सर्वदा 'निळा म्हणे स्वरूपसिद्धि । नित्य समाधि हरिनाम (१०) आम्ही वैकुंठवासी । आलों याची कारणासी । बोलिले जे ऋषि | साच भावें वर्ताया ।। १ ।। झाडूं संतांचें मारग | आडरानीं भरलें जग । उच्छिष्टाचा भाग | शेष उरला तो सेवूं ॥ २॥ अर्थ लोपलों पुराणें | नाश केला शद्वज्ञानें | विषयलोभों मनें । साधनें बुडविलीं ||३|| पिटूं भक्तीचा डांगोरा 1 कळिकाळासी दरारा 1 तुका म्हणे करा | जयजयकार आनंतें ।।१।। ||२|| ||३|| ॥४॥ नाम भजे गुरुनाम भजे शिवनाम भजे ॥१॥ १२ दुपारचे भजन भाग १. हरनाम भजे कहो कहो जी गुरुभजनका कर्णरंध मेरे सुनता है । नव दरबाजे वद किये तो दशविध नाद बजता है ॥ १॥ अजब बजाया मोलि देखो सदाशिव को सुनता है । आदि पूरसे फेरे फिरसे सहस्त्रारपर नाद बजता है ||२|| एक अक्षरका मार्ग जानिला दुसरे उसमें न्यारा है । दो अक्षरका मार्ग मिले तो फियने न्यारा होता है || ३ || तीन अक्षरका मार्ग जानिला तीन मूर्तिका होता है । नादबिदुकल एक बना तो दुनिया डुबकर पिचडे है ॥ ४॥ चिता करकर देखो दिलपर तीनगुणमे न्यारा है । पंचलिंग जब एक बन तो आत्मक ब्रह्म बजाता है ॥५॥ शिवानगरपर शंकर मूनशी सिद्धासनपर बैठे है । माया शंकरि तीन गुणमे मदरस जपतो पिचडे है ॥ ६॥ चिदानंदगुरु ब्रह्म कृपासे बोधसार मैं बोलत है । अंतरंगसे मार्ग जानिला लिगसंग जप होता है ||७|| L (२) सहज माडो माडो गुरुभजनी | साधुसंतर चरणव पिडिनी || पल्ल|| तनु मन धनवु तन्नदल्ल | नेनवीन बायीगे नेच्चिकिल्ल || घन गुरुविन पादव पिंडि नी । अनुमानव्यातको माडो स्मरणी ॥ १ ॥ आग ईग यावाग स्थिरविल्ल । सागि मागि पोगुदु गळिगेल्ल || भोग भाग्यद भ्रमेयन कळे नी । योगियागि माडो नी मनरंजनी ॥२॥ जातिगोत्रनीतिगे तिळियलिल्ल । मातुमातीनोळगे होयितेल्ल । सत्यवोध गुरुविन पादव पिडी नी । सत्य चिदानंदन माडो स्मरणी ॥३॥ (३) परमहंस प्रकाशगे मंगल | परंज्योति परब्रह्मगे मंगल || पल्ल ॥ नित्य निरंजन निर्विकारगे मंगल । सत्य साधुर सहकारगे मंगल । मिथ्यामाया अळिदातागे मंगल | १४ मुक्ति कोडुवंथ कर्तागे मंगल ॥१॥ भेदाभेद अळिदातगे मंगल | भेदके निलुकद अगणितगे मंगल | मेदिनियोळगे जगभरितगे मंगल । वादीजनर संहर्तागं मंगल ॥ २॥ इंदुधर विश्वनाथ मंगल | बंदु लोकापुरदल्लि नितातगे मंगल | तंदे त्रिमल अनंतगें मंगल | कंद ज्ञानदेवर दातागे मंगल ||३|| (४) श्रीगुरुनाथं छंदननाथं । निर्गुणरूप सदोदितशांतम् ॥ श्रीगुरुसहजानंद महेशं । निर्मळनिश्चळ शुद्धपरेशम् ॥ बोधितबोधपरंपरबोधं । सच्चित्सुख अद्वैत विचारम् ।। ज्ञानेश्वरगुरुसवं भरितं तारय तारय महागुरुनाथ म् प्रेमळ निश्चळनिरामयरूपम् || निर्मलतारकपूर्णप्रतापम् || १५ (५) कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा | बुध्यात्मना वा प्रकृतिस्वभावात् । करोमि यद्यत्सकलं परस्मै | नारायणायेति समर्पयामि ।। L अच्युतं केशवं रामनारायणं । कृष्ण दामोदरं वासुदेवं भजे || श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं | जानकीनायकं रामचंद्रं भजे ||

हरिनारायण दुरितनिवारण 1 परमानंदसदा शिवशंकर ।। भक्तजनप्रिय पंकजलोचन | नारायण तव दासोऽहम् || हरिनारायण गुरुनारायण । घडि घडि जिन्हें करि पारायण ( असे ३ वेळा ) दुपारचे भजन : भाग २ प्रदक्षिणा धन्य हो प्रदक्षिणा सद्गुरुरायाची । धन्य धन्य हो प्रदक्षिणा श्रीगुरुरायाची । झाली त्वरा सुरमरां विमान उतरायाची ॥ धृ० ॥ पदोपदी घडल्या अपार पुण्याच्या राशी | सकळहि तीर्थे घडली आम्हां आदिकरुनि काशी ।। कोटि ब्रह्महत्या हरती करितां दंडवत । लोटांगण घालितां मोक्ष लोळे पायांत ॥२॥ मृदंग टाळ घोळ भक्त भावार्थे गाती । नामसंकीर्तनीं नित्यानंदे नाचती ॥३॥ गुरुभजनाचा महिमा न कळे निगमां आगमांसी । अनुभव जे जाणनी ते गुरुपदिचे अभिलाषी ॥४॥ प्रदक्षिणा करुनी देह भावें वाहिला | श्रोरंगात्मज विठ्ठल पुढे उभा राहिला ॥५॥ (२) अलक्ष्य लक्षुनि पाहे निजवस्तु । परात्पर चिन्मय ब्रह्मरुप तेज प्रत्यक्ष आहे || गुरुपद वंदुनि आधि पाहि तूं | हृदयांतरि शोधुनि मनातें धूर्त करी बोधुनी ॥ कामक्रोध मदमत्सर अंगीं। दंभाहंकार जिरवुनी द्वैत- कल्पनामार त्यागुनि || एक ग्रे मन स्वस्थ करोनि । बैस पद्मासनीं मुद्रा लाव आत्मभाषणीं ॥ दृष्टीं आंत दृष्टि सुरंग करूनियां समदृष्टि मग | नाना तऱ्हेचे रंग सुरंग | रक्त श्वेतवत आहे । पुढें नीलवर्ण तेज जाणावें ॥१॥ नोलवर्ण तें बिबकाशीं । चेतन्याची मुस त्यामध्यें वस्तु जडली असे ॥ त्रिकुट भेदुनी उलट जातां । मीन मार्गे धसे रूप अरूप होउनी प्रवेश || उन्मन होऊनिया ब्रह्मरहरीं। समाधि लावुनि बसे तेथें काळ कदा न धजे | सिद्ध पुरुष तो योग साधुनि | तापा स्तवितो करून हरण | आपुला आपण राहे निमग्न | त्यालाचि प्राप्ति होय चराचर अवघेंचि ब्रह्म आहे ॥२॥ सद्गुरूकृपा जखमचि वारी । ज्याला घाव लागेल तोचि घायाळगती घुमतो ॥ बीजमंत्र हा जप गायत्री । अष्टोप्रहार योजितो साधन घडि पळ घडि साधितो ॥ अहंभावे मीपण तनधन | गुरुचरणीं अर्पितो तो हा मूळ पिस्या इच्छितो । अखंड तन्मय त्यात लुब्धनि । निजवस्तु लक्षितो लोचनों । निरपेक्ष तो निर्मळ प्राणी । जगांत वेडा राहे अंतरी ज्ञानबोध- रस पिये ॥३ सद्गुरुकृपा उत्तम ज्यासी । सहज हातासी आली त्याला निजवस्तु लाधली || पाहातां पाहतां आत्मज्योत हो । बैराग्यें पाजळली चिन्मय वस्तु डळमळली || शाहालिंग संतप्रमाण | धन्य गुरुमाउली आनंदे हरिवर कृपा केली || कवनकटाक्षे करि सिद्धांत | गणपति भीमसेन गातो सभेत । गुरुपुत्र तो ज्ञानवंत | ऐंकुनि तल्लिन होये लुंगरा व्यर्थ चावटी राहे ॥४॥ १८ (३) काय सांग या समर्थाची थोरी । मजकासी आपणाऐसा करी ॥ ६० ।। सद्गुरुराजा तन्मय छत्रपति । मज करूनी सेवे अधिपति । सोऽहं शब्द सनद देउनि हातीं । शिरीं हात ठेविला मूद्रांकित ॥ १ ॥ .. अहंकाराचे दुर्ग आवरिले । तयावरी मजला पाठवीलें । पूर्वद्वारें त्रिकुट देखीथेलें । रजोदृष्टी ब्रह्मयासी जिकीयेलें ||२|| तेथुनि ऊर्ध्वपर्थे पश्चिममार्ग पाहे । सत्वगुणीं श्रीहाटीं विष्णु आहे | तथा वळंघोनी वख्ता जाय ! तमोगोल्हाटी रुद्र दिसता हें ||३|| ज्ञानशास्त्र घेऊनिया हातीं । केलो तमो- अज्ञानाची शांतीं । पुण्यगिरी तेथुनि देखे पुढतो । शुद्ध अधिष्ठानों विश्वमूर्ती ॥४॥ उना राहोनि तथा गिरीवरी । J १९ देखे भ्रमरगुंफा गडद ओवरी । ओटपीठावरूती शोभे बरी । परमानंद आहे तया घरीं ॥५॥ बोधबळिया प्रवेशलों तेथ । अहंकार झाला वाताहत | विजयदुंदभि वाजति अनुत । ब्रह्मदृष्टींत पावलों निजविश्रांत ||६|| भक्तिनिशाण चढविलें वरी । $1 जें कां ब्रह्म भासत चराचरीं । रामनामें गर्जती जयजयकारीं । दासपण न उरे तेथें उरो ॥७॥ (४) सखया रामा विश्रांति तुझे नामी । म्हणउनि मजला ने त्वरें निजसुखधामीं ॥धृ॥ अवचट सुकृतें नरदेहा झालो भेटी । पशु सुत-जाया धन-धामीं प्रीती मोठी माझीं माझीं म्हणुनि म्या धरिली पोटीं | यांच्या संगें भोगिल्या दुःख-कोटी ||१|| सोडुनि स्वहिता धावलों दिशा दाही । शववत झालों मागुता कौतुक पाही । २० परि खळजन हे नेदिती कवढी ते ही । परि ही आशा पापिणी लाजत नाहीं ॥ २ जंववरी दृढता तंववरी या तनुची प्रीती | जर्जर झालीया अवघेचि निंदक होतो। याचीं दु:खे तुजला मी सांगू किती । म्हणउनि येतो श्रीधर काकुळती ||३|| (५) काय सांगू मी या संतांचे उपकार मज निरंतर जागविती ॥१॥ सहज बोलणें हित उपदेश करुनि सायास शिकत्रीती ॥ २॥ काय द्यावें त्यांसी व्हावें उतराई # ठेवितां हा पायी जीव थोडा ||३|| तुका म्हणे वस्स घेनुकेच्या चित्तीं । तैसें मज येथें सांभाळीती ॥४॥ (६) झाली संध्या संदेह माझा गेला । आत्माराम हृदयीं सहजीं माला ॥ध्रु॥ गुरुकृपा निर्मळ भागिरथो । २१ शांति क्षमा यमुना सरस्वती । अशी पदें एकत्र जेथें होतीं । स्वानुभव स्नान हें मुक्तस्थिती ||१|| सद्बुद्धीचें घालोनि दर्भासन | वरी सद्गुरुची दया परिपूर्ण | शम दम अंगीं विभूतिलेपन । वाचे उच्चारी केशवनारायण ||२|| बोधपुत्र निर्माण झाला जेव्हां । ममता म्हातारी मरोनि गेली तेव्हां । भक्ति बहीण आली असे गांवा | आतां संध्या करूं मी कैशी केव्हां ॥३॥ सहज कर्मे झालीं ब्रह्मार्पण | । ऐसें ऐकोनी निवती साधुजन | जन नोहे अवघाचि जनार्दन । एका जनार्दनी लाधली निजखूण ||४|| (७) निरंजनीं वनीं देखिली मी गाय | तीन तिचे पाय चार मुख ॥१॥ सहस्त्र तिचे नयन नब तिचे कान | सत्रावीचें स्थान एक शिंग ||२|| २२ ऐशी कामधेनू व्यासानें पाळिली | शुकानें वळिली जनकाघरीं ||३| तुका म्हणे ऐसें भाग्य नरा भेटें । अभागी करंटे वायां गेले ||४|| (८) देह तो पंढरी प्रेम पुंडलीक | स्वभाव सन्मुख चंद्रभागा ||१|| विवेकाची वीट आत्मा पंढरीराव | जेथे तेथें देव ठसावला ॥२॥ क्षमा दया दोन्ही रुक्मिणी ते राई । दोन्हींकडे पाही उभी असे ॥ ३॥ बुद्धि व वैराग्य गरुड हनुमंत | कर जोडोनि तेथें पुढे उभे ॥४॥ तुका म्हणं आम्ही देखिली पंढरी । चुकविली फेरी चौन्यांशीच ||५|| रात्रीचे भजन सोमवार-सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब ( जलद दोन वेळा) सांब सदाशिव सांत्र (उंच स्वरात १ वेळ ) सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब (पूर्ववत् दोन वेळा) मंगळवार- सांत्र सदाशिव सांब सदाशिव सांब २३ - सदाशिव सांब हरा हरा ( सावकाश दोन वेळा. जलद दोन वेळा पुन्हा सावकाश दोन वेळा. - बुधवार हरि हरि विठ्ठल रखमाई विठोबा ( खालील स्वरांत तीन वेळा ) हरि हरि विठ्ठल रखुमाई विठोबा ( उंच स्वरांत ३ वेळ ) गुरुवार - जय जय गुरुमहाराज गुरु (४ वेळ) - - . जयगुरू जयगुरु जयगुरु जयगुरु (दोन वेळा) जयजय गुरुमहाराज गुरू । जयजय परब्रह्म सद्गुरु || (१ वेळ) शुक्रवार पावना रामा पतीतपावना रामा खालील स्वरांत २ वेळ) पावना रामा (इतकेंच उंच स्वरांत; उंच स्वरावरून चालू स्वरांत आल्यावर पूर्ववत् खालील स्वरांत ) पावना रामा पतीत पावना रामा (दोन वेळा) हरि नारायण गुरुनारायण । घढि घढि घडि जिन्हे २४ करि पारायण । तव दासोऽहं नारायण । हरि नारायण गुरु नारायण ॥ लक्ष्मीश्री रंगधर सीतारघूवीर राधेगोविंदा । हरि हरि राधे गोविंदा । रखुमाई पांडुरंगा (तीन वेळा ) शनिवार - मारुती सखया बलभीमा । - भजनालागी दे प्रेमा ॥ (२ वेळ) मजनलागी दे प्रेमा ॥ (३) मारुती सखया बलभीमा । भजनलागी दे प्रेमा । (२ वेळा) रविवार सांब सदाशिव सांब सदाशिव सांब सदाशिव सांब हरा हरा ( सावकाश २ वेळा जलद २ वेळा. पुन्हां सावकाश २ वेळा.) बारा अभंग जन्माचें तें मूळ पाहीलें शोधून | दुःखासी कारण जन्म घ्यावा ॥ १ ॥ पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी | नरदेहा येऊनि हानि केली ॥२॥ २५ बारा अभंग "जन्माचें तें मूळ पाहीलें शोधून । दुःखासी कारण जन्म घ्यावा ॥ १ ॥ पापपुण्य करुनी जन्मा येतो प्राणी । नरदेहा येऊनि हानि केली ॥ २ ॥ रजतमसत्त्व आहे ज्याचे अंगीं । याच गुणें जगीं वायां गेला ॥ ३ ॥ तम म्हणजे काय नरकचि केवळ । रज तो सबळ मायाजाळ ॥ ४ ॥ तुका म्हणे येथे सत्वांचें सामर्थ्य | करावा परमार्थ अहर्निशीं ।। ५ ।। (२) अहर्निशों सदा परमार्थ करावा । पाय न ठेवावा आडमार्गी ।। १ ।। आडमार्गी कोणी जन जे जातील । त्यांतूनी काढील तोचि ज्ञानी ॥ २ ॥ t २६ तोचि ज्ञानी खरा तारी दुजीयांसी । वेळोवेळां त्यांसी शरण जावें ॥ ३ ॥ आपण तरेल नव्हे तें नवल । कुळें उद्धरील सर्वांचीं तो ॥ ४ ॥ शरण गेलियानें काय होतें फळ । तुका म्हणे कुळ उद्धरीले ॥ ५ ॥ (३) उद्धरीलें कुळ आपण तरला । तोचि एक झाला त्रैलोक्यांत ॥ १ ॥ त्रैलीक्यांत झालें द्वैतचि निमालें । ऐसें साधियेलें साधन बरवें ।। २ ।। बरवे साधन सुख शांती मना । क्रोध नाहीं जाणा तिळभरी ॥ ३ ॥ तिळभरी नाहीं चित्तासी तो मळ तुका म्हणे जळ गंगेचें तें ॥ ४ ॥ २७ जैसी गंगा वाहे तैसें त्याचें मन । भगवंत जाण त्याचे जवळीं ॥ १ ॥ त्याचे जवळी देव भक्तिभावें उभा । स्वानंदाचा गाभा तथा दिसे ॥ २ ॥ तथा दिसें रूप अंगुष्ठप्रमाण | अनुभवी खूण जाणती हे ।। ३ ।। जाणती हे खूण स्वात्मानुभवी | तुका म्हणे पदवी ज्याची त्याला ॥ ५ ॥ ( ५ ) ज्याची त्याला पदवी इतरां न साजे । संताला उमजें आत्मसुख ॥ १ ॥ आत्मसुख घ्यारे उघडा ज्ञानदृष्टी । यावीण चावटी करूं नका ॥ २ ॥ करूं नका कांहीं संतसंग धरा । पूर्वीचा तो दोस उगवला || ३ || २८ उगवेल प्रारब्ध संतसंगे व रुनी । प्रत्यक्ष पुराणीं वर्णियेलें ॥ ४ ॥ वर्णियेलें एका गुणनामघोषें । जातील रे दोष तुका म्हणे ।। ५ ।। (६) दोष रे जातील अनंत जन्मींचे । पाय त्या देवाचे न सोडावे ।। १ ।। आळवा शारगंधरा भाववळें । धरूनि केशव आणा भाववळें || २ || पापियां न कळे कांहीं केल्या || ३ || न कळे तो देव संतसंगावांचुनि । वासना जाळोनि शुद्ध करा ।। ४ ।। शुद्ध करा मन देहातींत व्हावें । वस्तुसी ओळखावें तुका म्हणे ।। ५ ।। २९ (७) ओळखा रे वस्तु सांडा रे कल्पना | नका आडराना जाऊं झणीं ।। १ ।। झणीं जाल कोठें बुडवाल हत । विचारी मनांत आपुलिया ॥ २ ॥ आपुलिया जीवें शिवासि पहावें । आत्मसुख घ्यावें वेळोवेळां || ३ || घ्यावें आमसुख स्वरूपीं मिळावे । भूतीं लीन व्हावे तुका ह्मणे ॥ ४ ॥ (८) भूतीं लीन व्हावें सांगावें नलगेचि आतां अहंकाराची शांति करा ।। १ ।। शांति करा तुम्हीं ममता नसावी | अंतरीं वसावी भूतदया ॥ २ ॥ भूतदया ठेवा मग काय उणें । प्रथम साधन हेंचि असें ।। ३ । ३० असें हें साधन ज्याचें चितीं वसें । मायाजाळ नासें तुका म्हणे ॥ ४ ॥ ( ९ ) मायाजाळ नासें या नासेंकरूनि । प्रीति चक्रपाणी असो द्यावी ।। १ ।। असो द्यावी प्रीती साधूंचे पायांसी कदा कीर्तनासी सोडूं नये ॥ २ ॥ सोडूं नये पुराणश्रवण कीर्तन | । मनन निदिध्यास साक्षात्कार ।। ३ ।। साक्षात्कार झालिया सहज समाधि तुका म्हणे उपाधि गेली त्याची ।। ४ ।। ( १० ) गेली त्याची जाणा ब्रह्म तोचि झाला । अंतरीं निवाला पूर्णपणें ।। १ ।। पूर्णपणे घाला राहतो कैशा रीती । त्याची आतां स्थिती सांगतो मी ॥ २ ॥ सांगतों मी तुम्हां ऐका मनोगत | राहतो मूर्खवत जगामाजीं ॥ ३ ॥ जगात पिशाच्च अंतरीं शहाणा । सदा ब्रह्मीं जाणा निमग्न तो ॥ ४ ॥ निमग्न तो सदा जैसा मकरंद । अंतर्बाह्य भेद वेगळाले ।। ५ ।। वेगळाले भेद किती त्या असती । हृद्गत त्याची गती न कळें कवणा ॥ ६ ॥ न कळे कवणाला त्याचें हेंचि वर्म । योगी जाणें वर्मं खूण त्याची ॥ ७ ॥ खूण त्याची जाणे जे तैसे असती । तुका म्हणे भ्रांती दुजियाला || ८ | ( ११ ) दुजियाला भ्रांती भाविकाला शांती | साधूंचीं ती वृत्ति लीन झाली ।। १ ।। ३२ लीन झाली वृत्ति ब्रह्मातें मिळाले । जळांत आटलें लवण जैसें । २ ॥ लवण जैसें पुन्हां जळाचे बाहेरी । येत नाहीं खरें त्यांतूनीया || ३ || त्यासारिखे तुम्हीं जाणा साधुवृत्ति | पुन्हां न मिळती मायाजळीं ॥ ४ ॥ मायाजाळ त्यांना पुन्हां रे बाधेना । सत्य सत्य जाणा तुका म्हणे ।। ५ ।। ( १२ ) स्वर्गलोकींहून आले हे अभंग । धाडियेले सांग तुम्हांलागीं ॥ १ ॥ नित्यने में यांसी पढतां प्रतापें । जळतील पापें जन्मांतरिचीं ॥ २ ॥ तथा मागें पुढें रक्षी नारायण । मांडिल्या निर्वाण उडी घाली ॥ ३ ॥ बुद्धीचा पालट नांसेल कुमती । ३३ होईल सद्भक्ति येणें पंथें ।। ४ ।। सद्भक्ति झालिया सहज साक्षात्कार | होईल उद्धार पूर्वजांचा ॥ ५ ॥ साधतील येणें इहपरलोक । सत्य सत्य भाक माझी तुम्हां ॥ ६ ॥ 'परोपकारासाठी सांगितलें देवा । प्रासादिक मेवा ग्रहण करा ॥७॥ येणें भवव्यथा जाईल तुमची । सख्या विठ्ठलाची आण मज ||८|| टाळ आणि कथा धाडिली निशाणी । ध्या रे ओळखोनि सज्जनहो ॥९॥ माझें दंडवत तुम्हां सर्व लोकां । देहासहित तुका वैकुंठासी ।। १० ।। . (१३) -सत्य सत्य जाणा त्रिवाचा नेम हा । अनुभव पाहा पदोपदीं ।। १ ।। ३४ पदोपदीं पाहा श्रीमुख चांगलें । प्रत्यक्ष पाऊलें विठोवाची ॥ २ ॥ विठोबाचे भेटीं हरेल वा चिंता | तुम्हालागीं आतां सांगितले ॥ ३ ॥ सांगितलें खरें विश्वाचिया हिता | अभंग वाचिती जे कां नर ॥ ४ ॥ ते नर पठणीं जीवन्मुक्त झाले । पुन्हां नाहीं आले संसारासी ।। ५ ।। संसार उडाला संदेह फिटला | पूर्ण तोचि झाला तुका म्हणे ॥ ६ ॥ ( १४ ) चार कोटि एक लक्षाचा शेवट | चौतिस सहस्त्र स्पष्ट सांगितले ।। १ ।। सांगितले तुका कथोनियां गेला वारा अभंगाला सोडूं नका सोडूं नका तुम्हा सांगितलें वर्म । भवपाश कर्मों चुकतील ॥ ३ ॥ चुकती यातायाती विठोबाची आण | करा हे पठण जीवेभावें ॥ ४ ॥ जीवेंभावें करितां होईल दर्शन | प्रत्यक्ष सगुण तुका म्हणे ।। ५ ।। ( १५ ) वेदाचे अभंग केले श्रुतिपर | द्वादश सहस्त्र संहितेचे ।। १ ।। निघंट निरुक्त आणि ब्रम्हसुत्र | अवतार सहस्त्र उपग्रंथ ॥ २ ॥ अभंग हे कोटी भक्तिपर झाले । ज्ञानपर केले तितुकेची ।। ३ ।। पंचाहत्तर लक्ष वैराग्य वर्णिलें । नाम तें गाईलें तितुकेची ॥ ४ ॥ साठ लक्ष केला बोध या जगासी । बणिले रूपासी तितुकेंची ।। ५ ।। ३६ तीस लक्ष केली देवासी करुणा । कर्मकांड जाणा एक लक्ष ॥ ६ ॥ द्वादशसहस्त्र स्वात्मानुभवीं एवं जाणा सर्व संख्या ऐशी ।। ७ ।। ऐसे हे अभंग झालेसे भूतळों । पांच अंतराळी पत्रिकेची ।। ८ ।। चौतीस सहस्त्र लक्ष एक कोटि पाच सांमोनिया साच गेला तुका ।।९।। ( १६ ) सगुण हें ब्रम्ह विठ्ठलचि बोले । ऐक पां वहिलें तुकारामा ।। १ ।। तुकारामा तुवां केले जे अभंग । करिती जे कां जगीं नित्य पाठ ॥ २ ॥ जगीं पाठ करितां आवडी सभ्दावें । विपत्ति न होय त्या प्राण्यासी ।। ३ ।।. प्राण्याचे कल्याण होईल वा पाहे ।. ३७ भावें वाचितां हे नित्यनेमें ।। ४ ।। नेमें संकष्टासी करी अकरा पाठ | विघ्न त्याचे स्पष्ट दूर होय ।। ५ ।। दूर होय विघ्न विठ्ठल म्हणे तुकया | शेवटीं निज ठाया नेईन मी ॥ ६ ॥ ( १७ ) गुरुचरणीं ठेविति भाव । आपोआप भेटे देव ।। १ ।। म्हणुनि गुरुसी भजावें । रूप ध्यानासी आणावें । २ ।। देव गुरुपाशीं आहे । वारंवार सांगूं काये |॥ ३ ॥ तुका म्हणे गुरुभजनीं । देव भेटे जनीं वनीं । ( १८ ) जयजय गुरुमहाराज गुरु । (५ वेळा ) ३८ जयजय परब्रह्म सद्गुरु । ( १ वेळा ) जयगुरु जयगुरु जयगुरु जयगुरु | जयगुरु जयगुरु जयगुरु जयगुरु ।। (१९) सब संतनकी जय ! बालगोपालकी जय ! तुकाराममहाराज की जय ! ज्ञानोबा महाराज की जय ! रुक्मांगदमहाराज की जय ! कृष्णद्वैपायनमहाराज की जय ! रामदास महाराज की जय ! रघुनाथप्रियमहाराज की जय ! श्री भाऊसाहेब महाराजकी जय ! श्रीअंबुराव महाराज की जय ! श्रीगुरुदेव रामभाऊमहाराजकी जय ! श्रीगुरुदेव दत्त दत्त दत्त ! ३९ ( २० ) रामाश्रम सद्गुरुराज | गुरुलिंगजंगममहाराज || ( २ वेळा ) गुरुलिंगजगममहाराज | ( २ वेळा ) रामाश्रम सद्गुरुराज | गुरुलिंगजंगममहाराज | ( २ वेळा ) हिंचगेरीवासी सद्गुरुराज | उमदीं भाऊस हेवमहाराज || ( २ वेळा ) उमदी भाऊसाहेबमहाराज ( २ वेळा ) हिचगेरीवामी सद्गुरुराज | उमदी भाऊसाहेबमहाराज || ( २ वेळा ) हिचगेरीवासी सद्गुरुराज | जिगजेवणि अंबुरावमहाराज || ( २ वेळा ) जिगजेवणि अंबुरावमहाराज | (२वेळा ) हिचगेरीवासी सद्गुरुराज | जिगजेवण अंबुराव महाराज || (२वेळा ) निंबाळवासी सद्गुरुराज | Yo गुरुदेव रामभाऊ महाराज || ( २ वेळा ) गुरुदेव रामभाऊ महाराज || ( २ वेळा ) निंबाळवासी सद्गुरुराज | गुरुदेव रामभाऊ महाराज || ( २ वेळा ) (२१) आकल्प आयुष्य व्हावें तया कुळा | माझिया सकळां हरिच्या दासां ||१|| कल्पनेची बाधा न हो कोणेकाळीं । ही संतमंडळी सुखी असो ||२|| अहंकाराचा वारा न लागो राजसा ।। माझ्या विष्णुदासा भाविकांसी ॥ ३ ॥ शरीर प्राणांसी करीन कुरवंडीं । क्षण एक न सोडी संग त्याचा ॥ ४ ॥ नामा म्हणे तया असावें कल्याण | ज्या मुखीं निधान पांडुरंग ।। ५ ।। ४१ विठ्ठल रखुमाई विठोबा रखुमाई "विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ! ! ! ( २२ ) मी तंव अन्यायी अपराधी । कर्महीन मतिमंदबुद्धी ॥ १ ॥ तुज म्यां आठविले नाहीं कधीं । वाचे कृपानिधि मायबापा ।। २ ।। नाहीं ऐकिलें गाइलें गीत । धरिली लाज सांडिलें हित ॥ ३ ॥ 'नावडें पुराण बैसले संत केली बहुत परनिंदा ॥ ४ ॥ केला नाहीं करविला नाहीं परोपकार | नाहीं दया आली पीडितां पर ॥ ५ ॥३ 'करूं नये तो केला व्यापार | उतरी पार तुका म्हणे ॥ ६ ॥ ४२ ज्ञानोबा तुकाराम ज्ञ नोवा तुकाराम | । तुकाराम तुकाराम तुकाराम !! ! (२३) अहो बोलिलें लेकरूं । वेर्डे वाकुडें उत्तरूं || १ ॥ क्षमा करा अपराध | महाराज तुम्ही सिद्ध रु०॥ अहो नाहीं विचारिला । अधिकार म्या आपुला || २ || तुका म्हणे ज्ञानेश्वरा | राखा पायापें किंकरा ॥ ३ ॥ ( २४ ) पाहे प्रसादाची वाट । द्यावें धुवोनिया ताट ।।१।। ४३ शेष घेउनि जाईन तुमचें झालिया भोजन ॥२॥ अहो झालों एकसवा । तुम्हां आड न ये देवा ।। ३ ।। तुका म्हणे चित्त । करुनि राहिलों निवांत ।। ४ ।। विडा विडा घावो नारायणा | कृष्णा जगज्जीवना | विनविते रखुमाई । दासी होईन मी कान्हा ।। ६० ।। शांांति हे नागवेली - पानें घेऊनियां करीं ॥ मीप्पण जाळुनीयां | चुना लावियेला वरी - वासना फोडुनीयां चूर्ण केली सुपारी ॥ ४४ भावार्थ कापुरानें | घोळियेली विवेक हा कातरंग रंगी वैराम्प जायफळ मिळविले निर्धारी ॥ २ ॥ रंगला सुरंग E सकळ ।। ३ ।। दया ही जायपत्रीं । क्षमा लवंगा सुबुद्धि वेलदोडे । शिवरानीं ( २ ) विडा घेई नरहरी रात्रा | धरूनि मानवाची काया || यति वेष घेऊनिया | वससी दीनासी ताराया ॥६० ज्ञान हे पूग़ोकळ | भक्ति नागवल्ली दळ वैराग्य पूर्ण विमळ | लवंगा सत्क्रिया सकळ प्रेम रंगी जैसा कात । वेला अष्ट भावसहित || ॥ १॥ 1 जायफळ क्रोधरहित । पत्रीं सर्व भूत-हित ॥ २ ॥ खोबरे हेचि क्षमा | काढुनी द्वैताच्या वदामा ।. मनोजांचा वर्ख हेमा | कोपूर हा शांति नामा ॥ ३ ॥ कस्तूरी निरहंकार । कोठें न मिळती हे उपचार ॥ 1 आणिल्या | अपिले ॥ ४ ॥ ४५ भिमपुत्र यास्तव फार | सत्वर देई वारंवार ||४|| (३) माडी परमेश्वरगुरुध्याना| विडदिरुवदु भजना नोडो नी निन्नोळु निजखूना पूर्णैक्यद ज्ञाना ॥ १ ॥ अपरूपद नरतनुविदु नोडो । सडगरदा पाडो । अपहास्थव माडदें नी कूडो | घनचिन्मय गूडो ॥२॥ अग्नीचऋदं बळियल्लि | एरडु कमलदल्लि । प्राज्ञा झगिझगिसुत्र वेळ कहिल | तिळि निनोळ मेलिन स्थानद सहस्रा गिल्लि |३|| गुरुतत्वदपूरा | पेळलळवल्लद सुखसारा || शंकर पदविवरा ॥ भीमा॥ KOK ४६ आरत्या वेदांत- जय जया दासबोधा ग्रंथराजा प्रसिद्धा | भारती ओवाळीन विमळज्ञान वाळबोधा || संमतींचा काव्यसिंधु भरला | श्रुतिशास्त्रग्रंथगीता साक्ष संगम केला । महानुभाव संतजनीं अनुभव चाखिला | अतान जडजीवा मार्ग सुगम झाला ॥ १ ॥ नवविधा भक्तिपंथें रामरूप अनुभवी । चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी | हरिहरहृदयींचें गुह्य प्रकट दावी । वद्धचि सिद्ध झाले असंख्यांत मानवी ॥२॥ ३ वीसही दशकींचा अनुभव जो पाहे । नित्यनेम विवरितां स्वयें ब्रह्मचि होये । अपार पुण्य गाठीं तरि श्रवण लाहे । कल्याण लेखकाचें भावगर्भ हृदयीं ।। ३ ।। ४७ (२) सुखसहिता दुःख रहिता निर्मळ एकांता | कलिमल दहना गहना स्वामी समर्था || न कळे ब्रह्मादिका अंत अनंता । तो तूं आम्हां सुलभ जयकृपावंता ॥ १ ॥ जयदेव जयदेव जय करुणाकरा | आरती ओंवाळू सद्गुरुमाहेरा ||धृ|| मायेविण माहेर विश्रांति ठाव । शब्द्वीं अर्थलाभ बोलणें वाव || सद्गुरु प्रसादें सुलभ ( उपाव । रामी रामदासा फळला सद्भाव ॥ २ ॥ (३) पंचप्राणवेव आरति माडीरि । पंचतत्ववेंव वत्ति हच्विरि । चंचलवत्तियेव घृतवन्हाकीरी | पंचकर्मेद्रियगळ पहन माडींरि ।। १ ।। जयदेव जयदेव जयपरमहंसा, गुरु- परमहंसा | दयमाडिदय्या नी एनगे सर्वेशा || जयदेव ● ४८ जयदेव ॥ ६ ॥ आदर परसि आरु चक्रा मीरिसिदि । वेदके निलुकद निजगुणरस्ना तोरिसिदि || आदिनाथनल्लि लक्ष्यविडिसोदि । नादद मूलॐकारदोळु बेरिर्स.दि ।। जयदेव जयदेव ॥ २ ॥ तंदेत्रि मल्ल नी सद्गुरुनाथा । कंदगे ज्ञानद वस्तु को दूंथा दाता | संदेह बिडिसि एनगे माडिदि प्रख्याता | छंददि भजिसुवे ना निनगे अवधूता ॥३॥ जयदेव जयदेव ॥ (४) आरती करा हो सज्जन | द्वैतभाव टाकून ॥धृ॥ विवेक सद्बुद्धि । सद्बुद्धि | लक्ष लावुनी पदीं ।। अंत:- करण | मनशुद्धि । द्वैतातीतें बुद्धि ||१|| इडा पिंगळा | सुषुम्ना | मार्ग आहे कठीण || त्रिकूट संगम 1 समर्जन महालिंग दर्शन ||२|| चिन्मय गुरुमुर्ति | गुरुमूर्ति । अणुरेणू 1 • भासती ॥ बुद्धि भासाची | भासाचि । गुरुपुत्र जाणती ॥३॥ • (५) + आरति ज्ञानराजा । महा कैवल्यतेजाः । सेविती साधुसंत । मनु वेधला माझा ॥धृ॥ लोपलें ज्ञान जग हित नेणती कोणी I अवतार पांडुरंग | नाम ठेवियलें ज्ञानी ।।१।। कनकाचें ताट करें। उभ्या-गोपिका नारी । नारद तुंवर हो । साम गायन करी ॥२॥ प्रकट गुह्य बोले । विश्व ब्रह्मचि केलें | रामा जनार्दनी । पायीं टकचि ठलें ॥३॥ 5 ÉRIE DE PE TE TE IN DE FREE FT(E) कर्पूरारति एत्ति बेळगरि । कारुण्या मृतकरा देवगे- ॥प. ।। नीलकंधर निगम गोवर। भालचंद्राभरणगेक बालगोलिदनु हालाहल संविदनु । लोल श्रीगुरुरायगे ॥ १॥ वारिजोभ्दवशिरव हरिदनु । मारहर महादेवागे । घोर दुरितंव दूर मोडुव । शूर षण्मुखनय्यगे ॥२॥ शरणु जनके वरवं नित्तनु । परम पार्वतियरसगे Hess धरेयोळधिकंवाद मुंरशिंगर । पुरद सिद्धनाथगे । । ५० (७) जय जय काडसिद्धा । आरति माडुवे सिद्धा ॥१॥ मुत्तिन भारति । बंगारद वत्ति | दीविगि चंद्रदीप्ति | बळगुवे पूर्णं भक्ति ||१|| आरति माडुत प्रेमदि हाडुत । स्वामी ना निन्न दूत । करूणा माडो कृपावंत ||२|| आरति मेच्चिद तानु वरव कोडबंद | कृपा दृष्टिविंद । तुळजागे सदानंदा ||३|| ।।१।। (८) जय जय जय जय आरति माडुवे ॥ जय जय जय जय आरति तुंबुवे ॥ जय जय जय जय आरति बेळगुवे || अंगदायक स्वामिगे ॥ ॥ सूर्यवणिगे सुंदररूपिगे | मंदिरदोळु कुणिदाडु देवगे । चौरि चामर छत्रदोडेयगे । मुप्पिन मुनिगे ओप्पुव रूपिगे | सांवहरनिगे साक्षात् शिवनिगे । बेळगुवे आरतीय ॥१॥ चंद्रवणगे चित्ररूपिगे । मंजिनोळ गिरु महाहर शिवनिगे | पंजिन बेळीकले रंजिसु मुखगे | नील वर्णिगे बालवेषगे ||२|| ज्योतिवर्णिगे डुलासु रूपिगे . ५१ मलिनलिदाडुव नागर हेडिगे | अगमकारगे अनेक- रूपिगे । जगद अरसगे जन्म विनाशगे ||३|| लिंग वर्णिगे निझंकारगे । झणा झणा बहुनाद भोरगे । अंगदोळगिरु संगमेशगे। गंगाधरगे गौरीहरगे ||४|| एनवर्णिगे चन्नरूपिगे | भिन्नविल्लदे पाद तोरुत्रगे | मत्ते बारद मुक्ति कोट्टवगे | नंविद भक्तगे तुंवितुळु । कुशिवगे ||५|| देशकधिकवाद बास उमदी | गुरुविन पाददोळानंद शिवा । आतन बोधदोळु निमग्न हरा | नडु मध्यदल्लि कंडेवु धना || परिपरियिदलि परमा- स्मनिगे ||६|| - (९) ज्योति बेळगुतदे | झगझग | ज्योति बेळगुतदे ॥ ॥ अस्तमगिरि चन्न मस्तकदोळु चलुव || वस्तु काजुतदे झगाझग | १ | मानस तुदियलि ज्ञानके निलुक दे । ताने होळेत झगझग || २ || कंगळ मध्यदि तुंग गुहुद योगि | अंग होळेग्रुतदे झगाझग || लिंग होळेयुतदे झनझन ||३|| ५२ (१०) ● नमो नमो एंबे । गुरुवे कुडिधायिसु दे ॥ ॥ हर हर || सदामरित एत्र हृदयकमलदोळ || सुधारका अमृतवन सुरिसुवि एंबे || अ प. 1) आशे माड़िबंदे A निम्न अनुभवदाळ कुत् ॥ मोसवागदे भासुर प्रण मदोळु निराशतपदोळू निळिसदे संदे ॥ १।। अर्थवागवंते अनुमान | विट्टु होगवंते ॥ सत्यदि शिवभजन 15 नित्यदि माडुवाग । व्यर्थ त्रिवेगळ परिहारिसो 56 तंदे ||२|| पुण्य सुकृतदिँदे । निर्मागे एल्ल जीवगळोंदे वल्लिद श्रीगुरु बसवलंगगे । मंगळारति बेळगुवेनंबे।३।। - (११) मंगलं महालिंग उमदीशा | मुनिजन पोषा, s भासउपाधीतीत सवशा । इचगरवासाहरु पृथ्विमेलिन प्रेमभक्तरंतु । परिपालिसुत्र । नियनित्यदि सत्य शंकरने | चित्तशुद्धि मांडू एन्न कर्तृ नि करुणविट्टु । मृत्यविनं बाधेयनं विडिसुव सत्य सद्गुरु काडसिद्धा ॥१॥ धरणिपालिप दुरितसंहरने । ५३ त्रिपुरांतकने । चरसेवकभेजकरक्षकने । मायावि नीन परमपावन पंचपाशकने । मोरेय होक्करे विदुकाव, अरवु कोट्टु मरवु विडिसुव । शरणजन र स्मरणि तारक सुंदरात्मक सगुणनिधिये ||२|| अष्टदिप कर ॥२॥ वडेयने । सृष्टीक्रर्ता । श्रेष्ठ सद्गुरु, लिंगजंग मते मा निष्ठेथिइल नंविदवर कष्टु कडिदु कडय हासिसुवाः वृष्टि अमृत सुरिदु जगदि जय जय पडेदंथ सद्गुरू । ३१॥ (१२) जयदेव जयदेव जय सद्गुरुराया | जय अंबराया । ओवाळु पंचारति प्रेमे तव पाया । जय ।। जीर्णोद्धार कराया आत्मज्ञानांचा । झालासे अवतार भक्तीभावाचा || पाहूनी प्रभाव गुरुनी अंत शक्तीचा का प्रेमे तुज दिधली घट अमृतनाम चा भक्तीभावे तनमन गुरुपदी अपिल । ? 7 $5²** ॥१॥ ५४ त्रिंकाळ साधन करुनी ते व्रत उद्धरिलें ॥ सेवा तव पाहुनिया भाऊराय भुलले । 'झालो धन्य' म्हणुनी विरूद बांधियले ||२|| सादर सद्गुरुचरणीं सर्वारपण केले । माझे मीपण तेणे विरूनिया गेले || परमानंदी अत्रवे मन ते मावळले | आत्मपदावरी श्रीगुरुराये भूषविले ||३|| सद्गुरुनामाचा तो डंका वाजविला | कर्नाटक महाराष्ट्री झेंडा रोविला || जीवन्मुक्तीचा निजमार्गहि दात्रियला | आरति करुनी पावन दास राम झाला ||४|| प. पूज्य श्रीसमर्थ गुरुदेव रामचंद्र दत्तात्रय रानडे यांची आरती जयदेव जयदेव जयसद्गुरु रामा । गुरुदेवा रामां ॥ मारति ओवाळूं तुज आत्मारामा ||६रु० ॥ नंबूखंडी ग्रामीं कर्नाटक देशीं । रामेश्वर वरदाने अवतार घेशी । ५५ उमदीशानुग्रह तुज लाभे बाल्यदशीं । साधनयोगें कैवल्याचा प्रभु होशी ||१|| गुरुलिंगजंगम प्रभुचा तूं नव अवतार | सद्गुरु उमदीशाचा शिष्योत्तम थोर भक्तिपयाचा प्रेषित सिद्ध महोदार | साक्षात्काराचा तूं महाभाष्यकार ||२|| निंबाळाश्रम तव हें मुक्तीचें तीर्थं । परमार्थाचें मंदिर अध्यात्मपीठ | ध्यानाची नेमाची असे साधनपेठ । भक्तजनांना वाटे भूवरि वैकुंठ || ३ || भक्तीची फल्गुनदी पुनरपि प्रकटाया | जडजीवां ताराया अवतार घ्यावा । भक्तजनांचें वांछित पुरवा गुरुदेवा । लक्ष्मीसुत प्रार्थितसे धरूनि नभ्रभावा ॥४॥ जयदेव जयदेव || (१४) ( चाल :- जय जय गुरुलिंगा ) जय जय श्रीगुरुदेवा | वाढवि सद्भावा | भक्त - जनांना दावा । अक्षय निज ठेवा ||२०|| नवयुगिचा | 2 वर संत 1 अभिनव हृदयांत नवजीवनमूल्यांना क फुलविसि गा त्वरित ||१|| विज्ञानात्मज्ञान । पूरक- जाणोन 7 तेणे करण्या कथिसी | जीवन परिपूर्ण ॥२॥ आत्मज्ञानाचार्या । साक्षांच्चित्सूर्या 1 आत्मप्रभा दावुनिया । धन्य करिसि आर्या ||३|| स्वानंदास्तव येत । भाविकजन मार्तं । नाम-सुधा से दुनिया | होती कृतार्थ आरति मनोहर | मंगलमय थोर । भोवाळी प्रेमभरें करी जय जयकार ॥५॥ IR PIT? SO PR सीकर संकीर समनिक पत्र she ऐसी आरति त्रिभुवन तारै । तेजपुंज तहै प्राण उतार ॥१॥ पाती पंच पुहुप करि पूजा । देव निरंजन और न दूजा ||२|| तन मन सीस समरपन कीन्हा । प्रगट ज्योति तहै आतम लीना ॥३॥ दीपक ज्ञान सवद धुनि घंटा | परम पुरिख त देव अनंता ।। ४॥ परम प्रकाश सकल उजियारा । कहै कबीर में दास तुम्हारा IPFIZER ६७ शेजारती ( आतां स्वामी सुवें निद्रा करा अवधुता । तरसिंह- सरस्वति अवधुता । चिन्मयसुखधामी जाउनि पहुड़ा एकता ||६६०॥ वैराग्याचा कुंचा घेउनि चौक झाडिला । तयावरी सप्रेमाचा शिडकावा केला ॥ १ ॥ पायघड्या घातल्या सुंदर नवविधा भक्ती । ज्ञानाच्या समया उजळुनि लाविल्या ज्योती ॥२॥ भावार्थाचा मंचक हृदयाकाशी टांगिला । मनाचीं सुमनें जोडुनि केलें शेजेला ||३|| द्वैताचें कपाट लावुनि एकत्र केलें । दुर्बुद्धीच्या गांठी सोडुनि पडदे सोडिले || ४ || आशा- तृष्णा कल्पनांचा सांडुनि गलवला । क्षमा दया शांती दापी उभ्या सेवेला ॥५|| अलक्ष्य उन्मति घेउनि नाजुक दुशेला निरंजनीं सद्गुरु माझा निजीं निजेला ||६|| ( एकादशीश म्हणणेचा ) .. • कृष्णा घांव बा लवकरी, संकट पडले भारी, हरि तूं आमुचा कैवारी, आलें विघ्न निवारी ॥ रु०॥ ५८ पांडव असतां, वनवासी, कळलें कौरवांसी, त्यांनीं पाठविले, ते ऋषी, सत्व हरायासी || १ || रात्र झाली से, दोनप्रहर आले ऋषीश्वर | भोजन, मागती सत्वर, करूं कैसा विचार ||२|| साठी सहस्त्र, खंडी अन्न, दुर्वास, भोजन | सत्व जातील, घेऊन, अंतर पडता जाण ॥ ३ ॥ आजि निष्ठुर कां, झालासी, कोठें गुंतलासी | माझी होईल वा, गत कैसी, अनाथ मी परदेशी ||४|| कंठ शोषला अनंता, प्राण जाईल मातां । पदर पसरीते, तुज मातां, पाव रुक्मिणी कांता ॥ ५ ॥ आतां न लावी उशीर, धर्म चिंतातूर | अनर्थ करील, तो फार, एवढा करी उप- कार ||६|| ऐकुनि बहिणीची करुणा, माला यादवराणा | दौपदी लोळत से, हरिचरणा, उद्धवचिद्धन जाणा ॥ करुणाष्टक ( एकादशीस म्हणणेचे ) सत्र कळतां मग जाणीव-भाव नाहीं । स्वानंद तृप्ति ५९ सकळांसहि मुक्ति पाही । - । राहो ऽथवा तनु पडो समता जयाला । अद्वैत - बोद्ध - पद निश्चय पूर्ण झाला ॥ १ ॥ स्वप्नेंद्रजालवत मायिक सर्व आहे । यालागि निश्चय मनीं भय कोण वाहे | स्वप्रत्ययें विविध भाव अभाव गेला । अद्वैतबोधपद ||२|| ज्ञानानळें विविध संचित दग्ध झालें । वंध्याविलासवत तें क्रियमाण झालें । प्रारब्ध शेष उरलें जन निश्वयाला | अद्वैत बोधपद ||३|| कोणी उदास वन षासिच खेळ खेळे । कोणीहि कर्मरत आभमधर्म केले । स्वच्छंदता रमत एक विकल्प गेला अद्वैतबोधपद ॥४॥ रक्षु गजा मदगजारुढ राजभद्री | भिक्षू अकिंचन उदासिन हो दरिद्री | संकल्पशून्य मन आग्रहि भाव ठेला । मद्वैतबोध पद, T|५|| जीवेश्वरा आणि जगाप्रति एक काळें । निर्धा- रिलें घटमठीं नभ जेवि खेळे । वेदांत - संत -निज संमत याचि बोला । अद्वैतबोध पद. "६|| सिंधूहि सिंधूस भास्कर जो तयातें । त्याहूनि चोज उपमा न दिसे तयातें । चर्णील कोण गुणवर्जित निर्गुणाला । अद्वैतबोधपद ॥७॥ हा चिद्विलास मुनि मानस-हंस जाणा । विश्वीं वसे परि निरंकुश-गम्य जाणा । रंगोनि भास्कर निजानुभवीं - . ● बुडाला । अद्वैत बोधपद ॥८ करुणाष्टके सोमवार ज्या संगतीनेंच विराग झाला । मनोदरींचा जडभास • गेला 15 साक्षात्परात्मा मज भेटवीला विसरूं कसा मी गुरुपादुकांला ||१|| सद्योगप धरि आणियेले | font अंगेंच माते पर-ब्रम्ह केलें । प्रचंड तो बोधरवी उदेला । विसरू |॥ २ ॥ चराचरीं व्यापकता जवाची । अखंड . -- 2 .

भेटी मजला: तयाची | परंपदी संगम पूर्ण झाला । विसरूं ॥ ३ ॥ जो सबंदा गुप्त जनांत वागें । प्रपन्न भक्ता निजबोध सांगें । सदक्ति भावांकरितां भुकेला | विसरूं ॥ ४ ॥ अनंत माझे अपराध कोटीं। नाणी: मनीं घालुनि सर्व पोटीं । प्रबोधित तो श्रम फार झाला विसरूं ।। ५ । कांही मला सेवनही न झालें । तथापि तेणें मज उद्धरीलें । आतां तरी अर्पिन प्राण ✔ ✓ € त्याला | विसरूं ॥६॥ माझा अहंभाव आसे शरीरीं । तथापि तो सद्गुरू अंगिकारी । नाहीं मनीं अल्पविकार झाला । विसरूं ।। ७ ।। आतां कंसा हा उपकार फेडू । हा देहा ओवाळूनिदूर सोडूं | म्यां एकभावें प्रणीपात केला । 1 विसरूं ||८|| जया वानितां वानितां वेदवाणी । म्हणें नेति नेंती तिला जे दुरुनी | नव्हे अंत ना पाय ज्याच्या रुपाला । विसरू ॥ ९ | जो साबूच्या अंकित जीव झाला । ॥ त्याचा असे भार निरंजनाला | नारायणाचा भ्रम दूर केला | विसरु ।।१०।। । २ . मंगळवार समाधान साधूजनांचेनि योगें ॥ परी मागुतें दुःख होते वियोगें । घडीने घडी शीण अत्यंत वाटें । उदासीन हा काळ कोठें न कंठे ||१|| घरें सुंदरें सौख्य नानाप- रीचें । परी कोण जाणेल तें अंतरींचें । मनीं आठवितांचि तो कंठ दाटे । उदासीन० ||२|| बळें लाविता चित्त कोठें जडेना | समाधान तें कांहि केल्या घडेना । नयें धीर डोळा } ६२ सदा नीर लोटे । उदा० ||३|| अवस्था मनी लागली काय सांगों । गुणीं गुंतला हेत कोणासि मागों । बहुसाल भेटावया प्राण फूटे | उदा० ॥४॥ कृपाळूपणें भेट रे रामराया | वियोगें तुझ्या सर्व व्याळकू काया । जनांमाजि लौकीक हाही न सूटे | उदा० ॥५॥ अहा रे विधी त्वां असे काय केलें । पराधीनता पाप माझ उदेलें । बहूतांमधें तूकतां तूक तूटे | उदा० ||६|| समर्था मनीं सांडि माझी नसावी । सदा सर्वदा भक्तचिता असावी । घडेना तुझा योग हा प्राप्त खोटें । उदा० ||७|| अखंडीत हे सांग सेवा घडावी । न होतां तुझीं भेटि काया पडावी | दिसंदीस आयुष्य हे व्यर्थ लोटे । उदा० ||८|| भजों काय सर्वापरी हीन देवा । करूं काय रे सवं माझाचि ठेवा । म्हणों काय मी कर्म रेखा न लोटे । उदा० ॥९॥ म्हणे दास मी वाट पाहे दयाळा | रघुनायका । रघुनायका भक्तपाळा भुपाळा | पहावें तुला हें जिर्वी आर्त मोठें । उदा० ॥१०॥ W बुधवार युक्ति नाहीं बुद्धि नाहीं विद्या नाहीं विवंचितां । नेणता भक्त मी तुझा बुद्धि दे रघुनायका ।। १ ।। मन हें आवरेना कीं वासना वावरे सदा । कल्पना धांवते सैरा बुद्धि दे० || २ || अन्न नाहीं वस्र नाहीं सौख्य जनामध्ये आश्रयो पाहतां नाहीं नाहीं | बुद्धि दे० ||३|| ||३|| बोलतां चालतां येना कार्यभाग कळेचिना | बहुत पीडलों लोकीं बुद्धि दे० ||४|| तुझा मी टोणपा झालों कष्टलों बहुतांपरी । सौख्य तो पाहतां नाहीं बुद्धि दे० | ५ || नेटकें लिहितां येना वाचितां चुकतों सदा । अर्थ तो सांगतां येना बुद्धि दे० ॥६॥ प्रसंग वेळ तर्केना सुचेना दीर्घ सुचना | मैत्रिकी राखतां येना बुद्धि दे० ||७|| संसारी श्लाध्यता नाहीं सर्वही लोक हांसती । विसरू पडतो पोटीं बुद्धि दे० ॥८॥ चित्त दुश्चित होतें हैं ताळतंत्र कळेचिना | आळसू लागला पाठीं बुद्धि दे० ॥ ९ ॥ कळेना स्फुर्ति होईना आपदा लागली बहू । प्रत्यहीं पोट सोडीना • ६४ ॥११॥ Pat "1 बुद्धि दे० ||१०|| संसार नेटका नाहीं उद्वेग वाटतो जिवीं | परमार्थ आकळेना की बुद्धि दे० देईना पूविना कोणही उगेची जन हांसती । लौकिक राखतां येना बुद्धि दे० ||१२|| पिसुणे वाटती सर्वे, कोणीही मजला नसे | समर्था तूं दयासिंधु बुद्धि दे० ||१३|| उदास वाटतें जीवी आतां जावें कुणीकडे । तूं भक्तवत्सला रामा बुद्धि दे० ॥१४॥ कायावाचा-

  1. 1

मनोभावें तुझा मी म्हणवीतसे । हे लाज तुजला माझी बुद्धि दे० ।। १५ ।। सोडविल्या देवकोटी भूभार फेडिला बळे | भक्तांसी आश्रयी मोठा | बुद्धि दे० ।। १६ ।। उदंड भक्त तुम्हांला आम्हाला कोण पुसतें. 1. ब्रीद हें राखणे माधी बुद्धि दे० ॥ १७ ॥ उदंड ऐकिली कीर्ति पतीत. ।। ।। पवना प्रभु मी एक रंक दुर्बुद्धी बुद्धि दे० ।। १८ ।। आशा हे लागली मोठी दयाळुवा कृपा करी । आणिक नलगे कांहीं बुद्धि दे रघुनायका ॥ १९ ॥ रामदास, म्हणे माझा संसार तुज लागला | संशयो वाटतो पोटीं बुद्धि दे० ॥२०॥ जयजय रघुवीर समर्थ ॥. ņ 24 गुरुवार " सदा प्रार्थितों श्रीगुरुच्या पदांसी । धरीतों शिरी वंदितों आदरेसी । धरूनी करें तारि या बालकासी । नमस्कार हा स्वामि दत्तात्रेयासी ॥ १ ॥ मतीहीन मी दीन आहे खरा हो । परी मी तुझा दास, कृपा कराहो । जसें लेकरूं पाळिते माय कूशीं । नमस्कार हा० ॥२॥ लडीवाळ मी वाळ अज्ञान तूझा । गुरूवांचुनी पांग फेडील माझा | तुझ्यावीण दूजा कोण आहे आम्हांसी । नमस्कार हा० ॥३॥ पिता माय बधू सखा तूंचि देवा । मुलें मित्र सारे सोयरे व्यर्थ हेवा । कळोनि : . असे भ्रांति होई आम्हांसी | नमस्कार हा० ॥ ४ ॥ S चरित्रें गुरूचीं करी नित्य पाठ । जया भक्ति लागे - पदीं एकनिष्ठ 1 तयाचे कुळीं दीप सज्ञानराशी । नमस्कार हा० ॥५॥ वसे उंबरासन्निध सर्वकाळ । जनीं काननीं घालवी नित्यकाळ तया सद्गुरूचें नाम कल्याणराशी । नमस्कार हा० ।। ६ ।। श्रमोनी गुरूपासिं तो म्लेंछ आला । तथा स्फोटरोगांतुनी । 1 • C ६६ मुक्त केला । कृपेनें तसें स्वामि पाळी आम्हांसी । नमस्कार हा ० ||७|| सती अनुसूया सुधी आधीमाता । त्रयी मूर्ति ध्यानीं मनीं नित्य गातां । हरे रोग पीडा दरिद्रासि नाशी | नमस्कार हा० ॥ ८ ॥ करोंनी मनीं निश्चयो अष्टकाचा । कराहो जनीं पाठ दत्तात्रयाचा | करी माधवाच्या सुता दास दासीं हा० ॥ ९॥ । नमस्कार शुक्रवार तुझिया वियोगें जीवत्व आलें । शरीरयोगें वहु दुःख झालें । अज्ञान दारिद्र माझें सरेना | तुजवीण रामा मज कंठवेना ||१|| परतंत्र जीणें कंठू किती रे | उदास माझ्या मनि वाटतें रे | लल्लाटरेखा तरि पालटेना | तुज० ॥ २ ॥ जडली उपाधी अभिमान साधी। विवेक नाहीं वहुसाल बाधी । तुझिया वियोगें पळही गमेना | तुज० ||३|| विश्रांति नाहीं अभिमान देहीं । कुळाभिमानें पडलों प्रवाहीं । स्वहीत माझें होतां दिसेना | तुज० ||४|| संसारसंग बहु पीडलों रे । ६७ कारुण्यसिंधू मज सोडवी रे । कृपाकटाक्षे सांभाळि दीना | तुज० ॥५॥ विषयी जनानें मज लाजवीलें । प्रपंचसंगें आयुष्य गेलें । समयीं बहु क्रोध शांती घडेना | तुज० ||६|| सुदृढ झाली देहबुद्धी देहीं । वैराग्य कांहीं होणार नाहीं । अपूर्ण कामीं मन हें विटेना । तुज० ||७|| निरुपणीं हे सद्वृत्ति होते ।स्थलत्याग होतां सवेंचि जाते काय करूं रे क्रिया घडेना । तुज० ||८|| जय जय दयाळा त्रैलोक्य पाळा सिंधुहारी मज तारि हेळा भव- स्वामीवियोगें पळही गमेना | तुज० ||९|| आम्हां अनाथा तूं एक दाता । संसारचिंता चुकवी समर्था । दासा मनी आठव वीसरेना | तुजवीण रामा मज कंठवेना ॥ १० ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ शनिवार उदासीन हा काळ जातो गमेना चिंता शमेना | उठे मानसीं C । सदा सर्वदा थोर सर्व सोडून जावें । 1 + ६८ रघूनायका काय कैसे करावे ॥ १ ॥ जनीं बोलता बोलतां वीट वाटे । नसे अंतरी सूख कोठें न कंठे घडीने घडी चित्त कीती धरावें | रघूनायका० ॥ २ ॥ बहु पाहतां अंतरी कोंड होतो । शरीरास तो हेत सोडोनि जातो उपाधीस देखोनि वाटें सरावें | रघूनायका ० ||३|| अवस्था मनीं होय नाना परीची किती काय r सांगू गती अंतरींची | विवेकेंचि या मानसा आवरावें । रघूनायका० ||४|| म्हणे दास उदास झालों दयाळा । जनीं व्यर्थ संसार हा वायचाळा | तुझा मी तुला पूसतों सर्वं भावें । रघुनायका० ॥५॥ · (२) तुझा भाट मी वर्णितों रामराया। सदा सर्वेदा गाय ब्रोदें सवाया । महाराज दे अंगिचें वस्त्र आतां । बहू जीर्ण, झाली देहबुद्धि कथा ॥ १ ॥ रामदूत वायु- सुत भीम- गर्भ जुत्पती । जो नरांत वानरांत भक्तित्रेम व्युत्पती । स्वामिपक्ष निजकाजसारथी | वोरजोर - दासदक्ष शोरजोर धक्क घिग मारुती ॥२॥ रविवार 1 असंख्यात रे भक्त होऊन गेले । तिहीं साधनांचें वहु कष्ट केले । नव्हे कार्यकर्ता भुमीभार झालों । तुझा दास मी व्यर्थ जन्मासि आलों ॥१॥ बहु दास ते तापसी तीर्थवासी । गिरीकंदरी भेटि नाहीं जनांसी । स्थिती ऐकतां थोर विस्मीत झालों । तुझा दास ० ||२|| सदा प्रेमळासी तथा भेटलासी । तुझ्या दर्शन स्पर्शनें पुण्यराशी । अहंता मनीं शद्वज्ञानें बुडालों । तु झा दास ० ||३|| तुझ्या प्रीतिचे दास निर्माण झाले । असख्यात ते कीर्ती बोंलोनि गेले । बहु घारणा थोर चकत झालों | तुझा दास० ॥४॥ बहुसाळ देवालये हाटकाचीं । रसाळा कळा लाघवें नाटकाची । पुजा देखतां जाड जीवीं गळालों तूझा दास " ? . . C कितेकी देह त्यागिले तूजलागीं । पुढे जाहले संपत्तीचे विभागी। देहदुःख होतांचि वेगें पळालों । तुझा दास० ॥६॥ किती योगमूर्ती किती पुण्यमूर्ती धर्मसंस्थापना अनशांती किती । पस्तावलों कावलों तृप्त ●

७०

जालों । तुझा दास० ।। ७ ।। सदा सर्वदा राम सोडूनि कामीं । समग्र तुझें दास आम्हीं निकामी बहु स्वार्थबुद्धीने रे कष्टवीलो | तुझा दास ॥ ८ ॥ जयजय रघुवीर समर्थ | पाळणे. निजसुख पाळणा पाळणा, हालविते मी कृष्णा, क्षणभरि करि शयना, करि शयना, लागो दे तुज नयना || रु | चंदन काष्ठाचा, काष्ठाचा, रंगित भवरंगाचा । जडीत रत्नांचा, रत्नांचा, वर चेंडू मोत्याचा ॥१॥ कळस सोन्याचा, सोन्याचा, चौकोनी रुप्याचा || साखळदंडाचा, दंडाचा, मंजुळ शद्व- सुखाचा ॥२॥ दोरी निजहातीं, निजहातीं, तुजला गाती गीतीं । सखया हालविती, हालविती, घे बाळा विश्रांति || ३ || ऐशा ब्रजवाळा, व्रजवाळा, हालविती' गोपाळा | त्रिवक प्रभुलीला प्रभुलीला, वर्णित वेळो- वेळां ॥४॥ . ७१ (२) जो जो जो जो रे श्रीरामा । निजसुखगुणविश्रामा || रु० ॥ ध्याती मुनियोगी तुजलागीं । कौसल्यावोसंगीं ॥१॥ वेदशास्त्रींची मति जाण । स्वरूपिं झाली लीन || २ || चारी मुक्तींचा विचार | चरणीं पाहती थोर ॥३॥ भोळा शंकर निशिदिनीं । तुजला जपतो मनीं ॥४॥ दास गातसे पाळणा | राम लक्षूमणा ॥५॥ (३) आसन हाकि कुळ्ळि रिसिवनु । नासिकाग्र दृष्टि निल्लीसिदवनु । बीसुव वायुव तुंबीसिदक्नु । इंथा ७२ सूसुमुत्तिन मळेगरिसिदवनु ॥ जो जो० ॥ १।। आरू- चक्रदले अरडिसिदवनु || भेरो झांगुटि ताळा तोरिदनु । भोन्याडसिदवनु । वीरुव त्रिदळ साधन इंथा मुरूकोटिप्रभा बेळक तोरिदनु ||२|| सहस्रदळ - दमनिय पोगिसिदवनु । जीवब्रह्मानंद सुखद उणि सिदनु । केवळ सुषुम्नमार्गं तिळिसिदनु । नम्म देव चिदानंद ताने अनसिदनु ||३|| (४) देहविदु देहविल्लधांग तिळिदिर बेकु । मनसिन इंद्रियगळू इरबेकु । वेहद गुणगळू दूरीरबेकु । हीगे दिनदिनक अनुभव तिळिदिरबँकु ||जो जो० ॥१॥ मातु इद्द मातिन मजकूर मातु इलधांगिरबेकु । कण्णु तिळिदिरबेकृ । पातकर गेळेतन दूरीरबेफु | इंथा नीतिमार्गक्के नेटागिरबेकु ॥२॥ कण्णु इदु इलधांगिरवेकृ । कण्णिन कळेगळु तिळिदिरबेकू । हुण्णिवि चंद्रमन हागे उदगिरबेकु । नम्म देव चिदा- नंदन हागे इरबेकु ॥ + ७३ एद्द घळिगि मोदलु गुरुविन नेनेसि । अरविनोळगे नामस्मरणेंय हिडिसि 11 मरविन देहक्के बोधव माडिसि | हिंग दिनदिनक आत्मन कैय सेरिसि ॥ १ ॥ जो जो० ॥ मरु माडबेकु चित्त पालट | आरू माडबेकु अवन कैवास | आग तिळीयोदु योगि मनि आट । इदर खून तिळियबेकु गुरुविन गुरुत ॥ २ ॥ पापद मनियोंदु तोंळे यिसिदवनु । पुण्यद मनियेंदु तिळिसिदवनु । नाम अमृत सार उण्णिसिदवनु । नित्यनेमदोळगे निराकार तोरिदनु ॥३१॥ मनसिन ओढि कंडियि- सिवनु । कनसिन प्रकार एन्निसिदवतु ॥ मासमासके ताने पालटादनु | नम्म गुरुविन मग गुरियागि

तोरिनु ||४|| वस्तु ताने आद मस्तकदल्लि | मस्तक

मध्यम मूल कोनेयल्लि | सत्य पूरेबो शिव मंत्रदल्लिक अल्लि चित्त कूडितु नम्म शिवन भेट्यागि ।। ५ ।। बाल हुट्टिद बालेव हेसरल्लि ॥ भोगद उदरल्लि जोगुळ हाडेवु नीगिदव ल अवन गुणगळु । नम्म योगिय तोट्टिल तूगिरे ब्यागदलि ॥ ६ ॥ मुत्तिन मूगुति ● ७४ "मुगिनहिलट्टु | वस्तु वालन तोट्टिल तूगुता ॥ अनूभविके- रेल्ल कूडव | इंथ सृष्टियोळग शिवन तोट्टिल तूगूता ॥७॥ अप्प कोट्टनु एनगं ओप्पुव मगन - तप्पगोडदे निम्म जोगुळ हाडुवनु ॥ सत्तु हुट्टिबरुव जन्म कडिदवनु । नित्य नित्य कालदल्लि निम्मने भजीसुवेनु ॥ ८ ॥ जोगुळ हाडंवु नोडुत अवन कंडेवीग नम्म वस्तू वालन्न | भैलिगे मुडचट्टू इल्लदे हुट्टघान | इंथ रामरसदिद कामट्टिनु ||९|| गुरुविन दर्यादद माडिद पदबु | अरविट्टु तिळीदवरिगे आदीतु T वरवु ॥ वरविल्लदवरिगे मायाद मलवु इथ । कायदोळ इरुववन तिळिदु पारागु ।। १० । जो जो नम्म गुरुविन हाड़ि । जो जो सत्य साधुरन पाडि | जो जो देव सांबन नोडि नम्म उमदि गुरुविन नेनिसिकोंडचाडि ॥११॥ जो जो ॥ 1 " ७५ पंचपदी प्रस्तुत नेमावलीची पहीली प्रत तयार होणेपूर्वी चिमड मठाच्या भजना पैकी इंचगेरीस म्हली जात असतती पांच पदें : पद १ लें 7 भज सद्गुरुराजं भज श्रीगुरुराजं || त्यज त्यज भवजंजालं मायागुणशीलं ॥ध्रु.॥ सत्पदचित्पदरूपं । अखिलानंदस्वरूपं ॥ ॥ अगणिततेजोऽमूपं । नीरांजनदीपं ।। १ ।। दृष्ट्वा दृश्यं ध्योमं । पीतं शुभ्रं ताम्रं ॥ नीलं धवल श्यामं । अभिनवनवरंगं ॥२॥ गुप्तागुप्तस्वरूपं दृष्ट्वा नाशनपापं ।। S हत्वा भवभयतापं । श्रुतिगभितसोपं ॥ ३ ॥ घंटाकिणिकिणिनादं । सिंहं शंखं नादं || भेर्यादिकमहानादं । अनुभव मन लुब्धं ॥४॥ मुनिजनमानसहर्ष । मायागुण आकर्ष ।। शोधनमार्गशीर्ष | तब पुराणपुरुष ||५|| इति स्तोत्रं पठ श्रुत्वा । पावनदासजीवित्वं । पापं सर्वं हत्वा । भवभय नाश त्वम् ॥ ६॥ ७६ पद २ रें 1 सद्गुरु चिद्धन तुजला । आलों शरण मी तारी मजला ॥ जय गुरु जय गुरु जय गुरु जय । जय गुरु जय गुरु जय गुरु जय ॥ ४० ॥ श्रुतिस्मृति तुजला गाती । परि ती आजवरी न होय पुरती ।। १ ।। ।। जय ।। शेष सहस्रमुखीं वर्णितां । परि ती आजवरी न होय पुरती ॥ २ ॥ ॥जय | पहा वागीश्वरी तुज स्तविती । परि ती आजवरी न होय पुरती ||३|| संत सज्जनीं वर्णिलें बहू | ऐसा तूं एक देवाधिदेवू || ४ || पाहूं जातां तुमचा अंत । नलगे म्हणुनी तुम्ही अनंत ॥ ५ ॥ जाणुनी जे जन धरितील पंथ । ते ते झाले तव पदीं संत ॥ ६ ॥ सचराचर तूं निर्मिता । सर्वावरती तुमची सत्ता ||७|| साधकाचे पुरवूनि कामा । तूंचि सहज करिसी निष्कामा ॥ ८ ॥ या दासा तव पदीं प्रेमा | देऊनि करिसी मला उत्तमा ॥ ९ ॥ जय गुरु जय गुरु ॥ पद ३ रे E . ★ प्रार्थना ऐका माझी । गुरुराया समर्था । ७७ Y त्रिभुवनीं तूचि थोर | दोनजन उद्धरिता ॥१॥ सद्बुद्धि दे मजला । दुर्बुद्धिचा वीट आला | कामादि वैरि वारी । करि निष्काम मजला ॥२॥ वासना मनि वसली । कधीं निघेनासी जाहली कोठवरी तिसि भांडू। मति माझी थकली ॥३॥ मोहमाया ममता भारी। गांजिताति परोपरी । यांतूनि सोडवि वा । तूंचि माझा कैवारी ॥ ४॥ निद्रा ही रांड खोटी । नित्य लागलीसे पाठीं आयुष्य व्यर्थ गेलें । पाहू नेदि जगजेठी ॥४॥ देहभाव बहु खोटा | मज करुनि करंटा tany देशोघडि लावियले । अन्न न मिळे पोटा ॥ ६॥ है. ऐसे हे अनंत गुण । गांजिताति कठीण 7 यांतूनि कोण मजला | सोडविल बा तूजविण ॥ ७ ॥ प्रार्थना परिसावी । गुरुराया गोसावी ॥ogothe दुर्गुण वारुनिया | द्यावी सायुज्यपदवी ||८|| दासासि संरक्षा । कामधेनु कल्पवृक्षा आपुले ब्रीद रक्षा | पुरवी माझी अपेक्षा ॥९॥ ७८ पद ४ थें हेंचि दान देई स्वामी । राहो मन नित्य नामीं ॥१॥ तुझी सेवा अखंडीत | घडो, रूपीं जडो चित्त ॥ २॥ अहर्निशीं संतसंग | घडो मज हा प्रसंग ॥ ३॥ दुरितकानन दहन करा | पुण्यरूप वैश्वानरा ॥४॥ शिरों ठेऊनीया हात। दासा करिसी जीवन्मुक्त ॥५॥ तूंचि माता पिता । तूंचि माझी भगिनी भ्राता ॥ तूजविणें चित्ता | नावडेची दुसरें ॥ ६ ॥ तूंचि माझें कुलदैवत । तूंचि माझी गणगोत । तूंचि माझें वित्त । नावडेचि दुसरें ||७|| तूंचि माझें प्रेमसुख | तूंचि माझें निरसी दुःख । तूजवीणें देख । नावडेचि दुसरें ||८|| तूंचि दासाचा सारथी | तूंचि माझी भागीरथी | तुजविणें गुरुमूर्ति | नावडेचि दुसरें ॥९॥ पद ५ वे माता फार काय बोलूं तुम्हांपुढें । पुरे कर्मझाडे भोगणें ते ॥ ७९ भोगणें तें सुख उचित या जीवा पुरवावी केशवा आस माझी ॥ माझी आस तुम्ही करावी सफळ । आतां उतावीळ जीव झाला झाला जीव कष्टी तुजविण झुरे पुरे आतां पुढे गर्भवास ॥ गर्भवास माझा चुकवी बा दयाळा । विनवितो कृपाळा परिसा दासा । नारायण स्तोत्रम् ॥ श्री गणेशाय नम: ॥ सप्ताहात पोथीवाचन सुरु करण्यापूर्वी म्हणावयाची स्तोत्रे नारायण नारायण जय गोविंद हरे | नारायण नारायण जय गोपाल हरे ॥ ध्रु. ।। करुणापारावर वरुणालयगंभीर ॥ २ ॥ यमुनातीरविहार घृतकौस्तुभमणिहार || ३ || . ८० पीतांबरपरिधान सुरकल्याणनिधान ॥४ मंजुलगुंजाभूष मायामानुषवेष ॥५॥ राधाऽधर मधुरसिक रजनीकरकुलतिलक ||६|| मुरलीगानविनोद वेदस्तुतभूपाद ||७|| वहि-निवर्हा पंड नटनाटकफणिोड ||८|| वारिज भूषाभरण राजीव-रुक्मिणि-रमण ॥ ९ ॥ ||९|| जलरुह दल - निभ- नेत्र जगदारंभक - सूत्र ।।१०।। - - पातक - रजनी - संहर करुणालय मामुद्धर ॥ ११ ॥ अंध - बक क्षयकंसारे केशव कृष्ण मुरारे ||१२|| + हाटकनिभषीतांबर अभयं कुरु मे मांवर ।। १३ ।। दशरथ राजकुमार दानवमदसंहार || १४ || गोवर्धन गिरिरमण गोपीमानस हरण ॥१५॥ भरयूतीर-विहार सज्जन ऋषिमंदार ॥ १६ ॥ विश्वामित्र मखत्र विविधपरा सुचरित्र ।। १७ ।। ध्वज वज्रांकुश पाद धरणीसुत सहमोद ||१८|| जनक सुता प्रतिपाल जय जय संस्मृतिलील ॥ १९ ॥ दशरथ वाग्धृतिभार दण्डक वन- संसार ||२०| ८१ - मुष्टिक- चाणूर - संहार मुनिमानसविहार ||२१|| बालिविनिग्रह - शौयंवर सुग्रीवहितार्य || २२ || मां मुरलीकर धोवर पालय पालय श्रीधर ||२३|| जलनिधि-वन्धन-धीर रावणकं विदार || २४|| ताटीमद - दलनाढ्य नट- गुण विविध-नाढ्य ।। २५ ।। गौतम पत्नीपूजन करुणाधनावलोकन |॥ २६ ॥ - संभ्रम - सीताहार साकेत - पुर - विहार ||२७| - - - अचलोवृति - चंचरकर भक्तानुग्रहतत्पर ||२८|| नैगमगान - विनोद - रक्षः सुत- प्रल्हाद ॥२९॥ - भारति - यतिवर - शंकर नामामृत मखिलांतर ||३०|| - नारायण नारायण जय गोविंद हरे || नारायण नारायण जय गोपाल हरे ॥ इति श्रीमत् शंकराचार्य बिरचित नारायण स्तोत्रम संपूर्णम् || " " निर्वाण षटक् मनोवृध्दचहंकार चित्तानिनाहं ८२ न च श्रोत्रजिन्हे न च घ्राणनेत्रे | न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् || १ || न च प्राणसंज्ञो न वै पत्र - चवायुर् न वा सप्तधातुनं वा पत्र - चकोषः । न वाक् पाणिपादौ न चोपस्थवायू चिदानन्दनरुपः शिवोऽह शिवोऽहम् ||२|| न मे द्वेषरागौ न मे लोभमोहौ मदो नैत्र मे नैव मात्सर्यंभावः । न धर्मो नचार्थो न कामो न मोक्षः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ||३|| न पुण्यं न पापं न सौख्यं न दुखम् न मन्त्रो न तीर्थ न वेदा न यज्ञाः । अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥४॥ न मे मृत्युशङका न मे जातिभेदः ८३ पिता नैव मे नैव माता न जन्मः | न बन्धुर्न मित्रं गुरुनैव शिष्यः चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥५॥ अहं निर्विकल्पी निराकाररूपी विभुन्वाच्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि । सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्ध: चिदानन्दरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ||६|| इति श्री शंकराचार्य विरचितं निर्वाण षटकं संपूर्णम् ॥ ८४ सप्तसमासी

1+

श्रीगणेशाय नमः ॥ श्रीसरस्वत्यै नमः । श्रीगुरुभ्यो नमः । श्रीराम समर्थ ॥ आधीं प्रार्थ गजानना । सकळ विद्येचिया प्रधाना विद्या कला उठती नाना | जयापासुनी ||१|| तो मंगळमूर्ती सकळांसी । आदि मध्य अवसानासी । सांभाळतो अहर्निशी । निरंतर ||२|| आतां स्तवूं वेदजनानी | सकळ विद्या जियेचेनी पावती ज्ञानाज्ञान प्राणी । कर्मानुसार ॥३|| भावें विनवूं श्रोतयांसी । जे कां अधिकारी श्रवणासी । जाणती श्रवणवर्मासी । अनुभवानुरूप ॥ ४ ॥ साष्टांग नमन सद्गुरूसी । प्रेमभावें वंदी चरणांसी । जो पार उतरी भवासी । क्षणमात्रें ॥ ५॥ जयजयाजी सद्गुरुनाथा | तुझिया पदीं माझा माथा । कृपा करिजे अनाथनाथा | मज दीनावरी ॥ ६ ॥ जयजयाजी रेवण- सिद्धा | सिद्धामाजीं महासिद्धा | बुद्धि देईजें मज L ८५ अबद्धा । करुण्य-शंभो ॥७॥ काडसिद्ध वास श्रीक्षेत्र करवीर योगेश्वर । त्यांते नमी जो नर । तों , पावनची ||८| प्रेमें वंदूं गुरूलिंगजंगमा । तुझा पार न . । कळे आगमा । मग मी पामर तुझा महिमा | काय जागे ||९|| युगानुयुगीं अवतरोनी | भक्त्तिमार्ग दाविसीं जनीं । बहुत भक्त उपदेशोनी । मोक्षपंथीं चालविसी ।।१०।। द्वापार. माजी रेवणसिद्ध । रेणागिरी झाले सिद्ध तयापासाव काडसिद्ध । अनुगृहीत ॥ ११ । का इसिद्धांचें आगमन । सिद्धगिरोस झाले जाण

। अलिप्त झाले ॥ १२ ॥ तेथूनि किती एक दिवस कमून केलें मायेचें मर्दन । काडसिद्ध नाम म्हणून मरूळसिद्ध आपण । अवतारा घे ॥ १३ || मरुळसिद्धांचे अनुगृहोत ।एकोरामसिद्ध संत । एकोरामापासून होत । पंडिताराध्यसिद्ध ॥ १४ ॥ एकामागुनी एक सिद्ध । ऐसे झाले पांच सिद्ध । उपदेशोनि अनेक बद्ध । मोक्षा लेले ।। १५ । सिद्धावतार गुरुलिंगजंगम । ८६ त्यांचा अनुग्रह झाला परम । तोचि कथाभाग सुगम | आधी सांगिजेल || १६ || निंबरगी नामें एक ग्रामीं | नारायणराव गुरूस्वामी । तयांचे चरित्र वर्णितों मीं । अल्पमात्र ।। १७ ।। महाराज असता लहान । सण पातला फाल्गुन | समर्थ बहुत वेळ खेळून | गृही आले ।। १८ ।। ह्मणोनि वडील बोलिले । रागें समर्थ निघाले | पंढरपुरीं त्वरित पातले | | विठ्ठलदर्शना ।।१९।। ||१९|| जैसे दास गेले वनीं । तैसे समर्थ विठ्ठलभवनीं । देउळामाजीं बैसले ध्यानीं एकाग्रमनें ।। २० ।। ऐसें सप्त दिवस ऋमित । तंव स्वप्न झालें अवचित । सिद्ध- गिरीस जावें त्वरित | आज्ञा जाहली ||२१|| मग तें सिद्धगिरीस जात । तंव पुराण चाललें क्षेत्रांत । तें ऐकती देऊनि चित्त । हर्षनिर्भर होऊन ॥ २२ ॥ जंगम - रूपें काडसिद्ध । खुणें संबोधिती सन्निध जाताचि | समर्थ सुबुद्ध | उपदेशिले ॥ २३ ॥ तेणें जाहले तल्लीन । मग गुर्वाज्ञा घेऊन । निवरगी ग्रामी परतोन । ये ते ८७ । जाहले ||२४|| समजून घेतला गुह्यार्थ। राहती बहुधा अरण्यांत । रामदासापरी समस्त | वेळ ऋमिती ॥ २५ ॥ प्रपंच परमार्थ मिळोन | दोन्ही चालविती समान । छत्तीस वर्ष करुनि साधन । सिद्ध जाहले ॥ २३ ॥ मग लोक उपदेशिले । भक्तिमार्गा लाविले । शतानुशत उद्धारिले । तथा ग्रामीं ॥ २७ ॥ तंव एक ब्रह्मचारी | काशी करुनि पंढरपुरी | जाता राहिले सोनगी नगरीं । निवरगीसन्निध || २८ ॥ ब्रह्मचारी आले ऐकुन । लोंटांगणें जाती जन समर्थही भेटीकारण । तेथें आले ॥ २९ ॥ निर्गुण भक्त समर्थ जरी | सगुण भक्त ब्रह्मचारी | दोघां वाद बहुतांपरी। थोडा वेळ जाहला ॥३०॥ समर्थगुह्य ठसून मनीं । ब्रह्मचारी लागले चरणीं । उद्धारा मातें ह्मणोनि । दुःखी जाहले ।। ३१ ।। मग समर्थे उपदेशिलें । तेधवां मन तल्लीन झालें । उमदी ग्रामीं राहिले । साधन करुनि ॥ ३२ ॥ द्वादश वर्षे साधन करितां । साधु । नाम पावले तत्वाता । मग समर्थ दिधली सत्ता । उपदेशावया । ३३ ॥ तंव अनेक जन उपदेशून । भक्तिमार्गात लावून | साधनसिद्धीस पाववून मोक्षा । नेले ॥ ३४ ॥ भजन गायन नाना उपाय । करोनि स्मरती समर्थपाय । तयांसी नाम रघुनाथप्रिय प्राप्त झालें ॥ ३५ ॥ उमदीकर देशपांडे एक । सोळा वर्षाचे बालक | तेही झाले सेवक समर्थांचे । ३६ ।। लहान असुनी सात्विक संभावीत आणि तपक | एकनिष्ठ ॥ ३७ ।। तयांचे अंगीं आणि भाविक देव- अंश ।। 7 ८८ । वैराग्य बाणलें । सुदृढ धरिती गुरुंची पाउले । साधन ● 1 साधीत चालले । एकनिष्ठपणें ॥ ३८॥ प्रतिगुरुवारों येऊन गुरुच्या चरणीं होती लीन । भेटीवीण न करिती भोजन | प्राणांतींही ।। ३९ ।। ऐशीं वर्षे बेचाळीस | न चुके साधन एक दिवस अंतरी वसे उल्हास भक्तिविषयों ॥४०॥ प्रसंग अथवा अडचण येतां A किंवा आनंदी मन असतां न चुकविले साधन 1N ८९ तत्वतां । महासमर्थे । ४१ ।। तया समर्थाचे कथन | पुढील समासी करीन | तुम्ही श्रोते विचक्षण | होऊनि ऐका ॥ ४२ ॥ समर्थाचे चरित्र कथन । गहनाहूनि अति गहन | म्या अबुद्धे तें लिहून | किचिन्मात्र ठेविलें ।। ४३ ।। त्यांत काय शुद्ध काय अशुद्ध । मज कळेंना । शुद्धाशुद्ध | मी आहे परम बुद्ध | सर्वामध्यें ॥ ४४ ॥ बोलतां नये तें कथिलें । सांगतां नये तें सांगितलें । न्यून पूर्ण क्षमा केलें । पाहिजे श्रोतीं ॥ ४५ ॥ अगाध समर्थ महिमान | केंवी वर्णू शके अज्ञान | परि समास केला पूर्ण । म्या मतिमंदे ॥ ४६॥ इति श्री गुरूपरंपरा- निरुपण नाम प्रथमः समासः || 4 1. श्री गणेशाय नमः । श्रीगुरुभ्यो नमः ॥ नमः || श्रीराम समर्थ ॥ तुझा महीमा गातां श्रीपती | श्रुतिशास्त्राची कुंठीत मती | पार न कळे मग निश्चितीं । नेति नेति बोलती ।। १ ।। नाहीं रूप नाही नांव । त्रिगुणरहित 1 निरावेव । परि भक्ताचिया सप्रेमभावा । सगुण लाघव दाविसी ॥॥ २ ॥ नाना अवतार धरोनि हरी । भक्त रक्षिले बहुतांपरी । सत्कीर्ती प्रगटली चराचरों । पुरा, णांतरी व्यासोक्त ||३|| आता कलियुगामाजीं साचार | उमदीमहाराज अति थोर । तया माझा नमस्कार | साष्टांगभावें ॥४॥ मागें साधुसंत झाले । तया- सारिखेच अवतरले । जगामध्ये प्रसिद्ध झाले । महा साधू ॥ ५ ॥ समर्थाचें उमदी स्थान होते महान । तयांच्या उपदेशें प्राण | ॥ ६ ॥ समर्था नांव भाऊराव । एकनिष्ठ गुरुपदीं भाव | म्हणूनिया झालें नांव प्रसिद्ध जगीं ॥ ७ ॥ ‘भा ' म्हणिजे दृश्यभास दृश्यभासीं वस्तुभास । वस्तुभासी तल्लीनतेस | पावती सदा ॥ ८ ॥ 'ऊ' म्हणिजे उपाधी । निरसनें परमार्थात साधी । तयापुढे षड्गुणशुद्धी P आपोआप ॥ ९ ॥ 'रा' म्हणिजे आठवण असून नसल्यासारिखे जाण । जगासारिखें राहणें पूर्ण | परो निवरगी साधू झिजवले समर्थ . ९१ निराकार || १० || 'व' म्हणिजे इहलोकींचे देव । साकारासारिखे अवयव । परंतु निराकार हाचि भाव | व्यक्त होई ।। ११ । जन्म झाला देशपांडें कुळीं । जें कां विधीने लिहिलें भाळीं । पुढें गुरूप्रसादे तात्काळीं । ललाटरेषा पुसली ॥ १२ ॥ उगवलें अनंत जन्मींचें प्रारब्ध स्वरूप लाधलें स्वतःसिद्ध स्वरूपदर्शन होतां बद्ध- । वार्तांचि उडाली ॥ १३॥ असो हे सर्व पुढे झालें । परी वालपणीं काय वर्तलें । आणि साधन कैसे केलें । तेंचि आतां निरूपिजेल ॥ १४ ॥ यांचे वडील बंधू दोघेजण | नानासाहेब आणि दाजीबा जाण । रघुनाथप्रियांनी कृपा करून । अनुगृहीत केले ।। १५ ।। वालपणीं भाऊराव । निर्गुणज्ञान मानिती वाव दाजिबांची गुरुसेवा सर्व । लटकी मानिती ।। १६ ।। परी । करिती सगुण उपासना । मारुति नित्य पूजिती जाणा । तेथें भेटती रघुनाथप्रियांना नित्यनेमें करूनि ।। १७ ।। त्यांस रघुनाथप्रिय नमस्कार # स्वयेंचि घालोनी ..

. साचार | अंतर वेधिती सत्वर । भक्तिमार्गी ओढिती ॥१८॥ निंबरगी गुरूंस शरण | जावया उपदेशिती जाण । त्यांस निवरगीस घेऊन स्वयेंच जाती ॥१९॥ निगरगीमहाराज अति थोर | धीर उदार आणि गभीर । दूरदृष्टीने करोनि विचार | साधुबुवास आज्ञा-

  • पिती ॥२०॥ आज्ञा करिती साधुकारण ।

तुम्हीच करून | अनुग्रह करावा म्हणून साधुबुवांनी मान्य भाऊराव उपदेशिले ॥ २१॥ अनुग्रह घेवोनि सत्वरी । राहिले उमदीभीतरीं । त्रिकाल साधन निर्धारी ! करीत राहती ॥२२॥ प्रपंच परमार्थ दोन्ही । चालविती • नेमेंकरुनी । परमार्थचि स्वार्थं मानुनी वाढविती ॥ २३ ॥ कुलव्यवसाय करिती । साधन करिती । लोकांचीं, 2 मनें सांभाळिती । म्हणून जडली प्रीति | मर्यादेवेगळी । ।। २४ || लोकांवरी करिती उपकार । उपकारची होऊ पाहे अपकार | जनसमूहाचा त्रास फार | होऊं लागे ।। २५ ।। प्रापंचिक लोक येती । प्रापंचिकचि गोष्टी + . ९३ बोलती । उगाच कालक्षेप करविती 1. व्यवसायभरे ।। २६ ।। तेणें झाला उदंड त्रास । भाऊराव चुकविती जनांस | जाऊं लागती वनास | साधन करावया ॥ २७ ।। मध्यान्हीं पोथी वाचती । श्रवणमननी निमग्न होती । नेमस्तपणें चुकविती । जनत्रास अवचा || २८ || रात्रीं जनांसी भेट देती । शिघ्रचि कामे आटोपती प्रपंची मलित न करिती | परमार्थबुद्धि ॥ २९ ॥ वाढत चालला अनुभव । विवेकवैराग्या मिळे ठाव । वैराग्यभरें प्रपच वाव | होऊ लागे । ३०॥ उदंड वैराग्य उपजलें । मामलतीसी नाकारिलें 1. | परमार्थ उत्तम म्हणोनि राहिलें । स्वतंत्र रीतीं ॥ ३१ ॥ जन बहुत निंदा करिती । यांचा लिगायत गुरु म्हणती । कोणी म्हणती चेटक निश्चिती | गुरूनें केलें ॥ ३२ ॥ श्वशुराचा होतसे त्रास | संबंधो धरिती अविश्वास | सर्व ढोंग म्हणूनि त्यांस | बहुन पीडा करिती ॥ ३३ ॥ परी अज्ञांसि न कळे ॥ विचार । नाहीं आत्मशानाचा साक्षात्कार | ब्राह्मण ● कोण याचा निर्धार | केवि कळे ।। ३४ ॥ वर्णाचा गुरु । ब्राह्मण । ऐसें असें वचन | हें सर्वथा सत्य जाण । परी ब्राह्मण कोणा म्हणावें ॥ ३५॥ ब्रम्ह जानाति ब्राह्मण | जो ब्रह्मविद असे जाण । जो मात्मज्ञान जाणे पूर्ण | तयासीच ब्राह्मण म्हणावें ॥ ३५ ॥ एवं तुकाराम ब्राह्मण आणि चोखामेळाही ब्राह्मण | ब्राह्मण नसतां ब्राह्मणंमन्य | गर्दभ जाणावे ॥ ३७॥ असो ऐसी निंदा होतां । ज्याचें धैर्य न चळे सर्वथा । तोचि जाणावा तत्त्वतां | देवपुरुष ॥ ३८ ॥ इकडे साधन चालिलें | इकडे वैराग्य अंगीं भरलें । तेणें सामर्थ्य आलें । उदंड अंगीं ॥ ३९ ॥ एकदां गुरुसन्निध असतां आणि साधन । चाललें असतां | भोंगा मांडी पोखरी तत्त्वतां | परी अणुमात्र ढळेना |॥ ४० ॥रांनीं वनीं सर्प वृश्चिक | सन्निध येती जाती देख अथवा अंगावरी चढती । निःशंक | परी भीति असेना ॥ ४१ ॥ अथवा पाऊसें- भिजविलें | किंवा आतपें पोळलें | किंवा शीतें शरीय । ९५ भेदिलें । तरी अचळ ॥ ४२ ॥ अठरा बरुषें उभं राहून | तप केलें निद्रा जिंकून | तेणेंचि झालें पुण्यवान | सर्व जगासी ॥ ४३ ॥ असो ऐसें साधन करिती । शनिवारीं गुरूस भेटती । सद्गुरुची सेवा करिती । नाना- ॥ ४४ ॥ गुरुवरी निःसीम भक्ती । प्रकारें कामासही न असती । त्यांच्या पादरक्षा उचल | निंद्य याहती । मागें पुढें ।। ४५ ॥ त्यांचें गुरुबंधु रामभाऊ चिमडीं राहती त्यांनींही साधन चालविलें निश्चितीं । महायनें ॥ ४६॥ उभयतांची निष्ठा पूर्ण दृढ धरिती सद्गुरुवचन | त्याहून अन्य प्रमाण | मुळींच न मानिती ॥ ४७ ॥ रामभाऊनीं चालविला चिम्मड पंथ यानींही वाढविला परमार्थ बहुत । आज्ञा घेऊनि विख्यात करिती नाम गुरूचें ॥ ४८ ॥ असो गुरूचें देहांतसमयीं । भाऊराय सन्निध असतां पाही । परमार्थ वाढवावा लवलाहीं । म्हणोनि आज्ञा जाहली ॥ ४९ ॥ गुरुदेहान्त झालियावरी | यांसी चैन न पडे । 6 ९६ क्षणभरी । त्या प्रेमदुःखाची सरी । कोठेंचि नसे ॥ ५० ॥

असो, नंतर

। परमार्थ पाहिजे विचार केला कीं साधिती वाढविला । म्हणोनि साधिती साधनाला । अहर्निशीं । ।। ५१ ।। गुरुकृपेनें भाग्य फळलें पूर्ण अद्वैत मनीं त्रिवलें । तेणें समूळ उडोनि गेलें । मायाजाळ ।। ५२ ।। मनीं उदात्त हेतू धरती । कीं गुरुंची व्हावी कीर्ती । देवालय बांधून भूर्ति आंत स्थापावी || ५३ ।। आणि विठोबास नवस केला | भक्तिमार्ग पाहिजें वाढला | मग पंढरीस येऊन तुम्हांला । लोटांगण घालीन ॥ ५४ ।। सद्गुरूची पूर्ण कृपा होतां । मग करावी नलगे चिंता । विश्वास साधन गुरुकृपा मिळतां । काय उणें ।। ५५ ।। ऐसा मिळवोनि अनुभव । मग वाढविती समुदाव । कर्नाटक घुंडोनि सर्व । भक्तिमार्ग वाढविती ।। ५६ ।। लोक उद्धराया अवतरले । भक्तिमार्गासि लाविले । भूमंडळी ख्याती पावले हे | समर्थ ॥ ५७ || गांवोगांवी जाऊन भजन साधन करुन । नानाप्रकारे जन । "7 V . ९७ B 7 1 । संतुष्ट केलें ||५८॥ तयांचे एक प्रेमळ भक्त । अंबुराव नामें विरक्त | तेथे येवून स्वस्थ साधन करीत राहती ।। ५९ ॥ सदा हिंडती भुमिवरी | सप्दयास येती हिचगेरी | भजन लाविती परोपरी | नाना यत्नें ।। ६० ।। नीच जाती अथवा संस्थानिक यांनी पाचारिले असतां देख । त्यांचा भाव पाहोनि नेमक | गृहा जाती ।। ६१ ।। परमार्थी नाहीं लहान थोर । विद्या धन वर्णं विचार | परी प्रपंची वागती साचार । ज्याचे त्यापरी ।। ६२ ।। त्रपंवीं जाणती पृथक्करण | परमार्थी जाणती एकीकरण अंत्यज गुरुबंधूसही लोटांगण | । प्रेमें घालती ॥ ६३ ॥ बाष्कळांस घालिती नमस्कार | वादास न देती थार । नेमकांस सांगती बहुतर । अनुभव आपुला ।। ६४ ।। अथवा जो कां अनन्यशरण । तयांसही अनुभव सांगती जाण । अनुभवापुढें शद्वज्ञान फिकें पाडती ।। ६५ ।। ओझे कदापि न घालिती | शिष्यांसि स्वल्पही न मागती । बहुरूपी बहुरंगी मायेप्रति । ठाव नसे ।। ६६ ।। TITLE ९८ । कत्येक बाधा घालविती संकटी उपाय सांगती । नामौषधें ।। ६७ ।। वरे करिती । व्याधिग्रस्तांस त्रिकाळ पुराण भजन साधन । कदापि न चुकविती जाण । आनंदसागरीं आपण मग्न वारंवार होती ॥ ६८ || कित्येंक श्रोतेजन येती । ते पुराण भजनचि एंकती । परी त्यांसीं न कळे साधनस्थिती । नाम- धारकांऐसी ॥ ६९ ॥ पुराण भजन म्हणजे शद्वज्ञान | साधन म्हणजे निःशद्वज्ञान | वरिवरी पाहतां निःशद्वज्ञान केंवी कळें ॥ ७० ॥ आपण महंती न होती । कां तें ।। ७१ ।। झानास वेळोवेळ । परी तो करिती । परी सर्वत्र चमत्कार पुण्यमार्गे चालती । म्हणोनिया सिद्धींचा विटाळ । ऐसें वदती गोविंद कृपाळ । भक्तकाज करीतसे ।। ७२ । साधनें साध्य झालें सर्व । तथापि करिती साधन उपाव | कीं साधकां यावा उत्साह | साधन संदेहासि जिंकिले आणि 1 7 करवाया ।। ७३ ।। भयासि पळविलें । अनिर्वाच्य सुख प्राप्त झालें । साधन पंथे । ७४ ।। असो तया साधूंची लक्षणें । लिहिता होत असे उणें । मी मतिमंद काय जाणे । नाना कळा ॥ ७५ ।। समर्थाचे वर्णन | मी काय करीन दीन । अनुगृहीत मी म्हणून | एवढें वर्णिलें ।। ७६ || होईल कृपा जरी सत्वर | पुढतीं लिहोंन साचार | नातरी मी पामर । इतुकें पुरें ।। ७७ ।। श्रीमत्समर्थ भाऊराव महाराजचरित्रनिरूपणं । इति नाम द्वितीय समास : ॥

॥ श्रीगणेशाय नमः || श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीराम समर्थं || जें कां सप्रेम भक्तिचें फळ । कीं सरळ वैराग्याचें मूळ । अथवा ज्ञानाचें अधिष्ठान केवळ । ते हे प्रांजळ सत्कथा ॥ १ ॥ संसारतप्त भक्त प्रेमळ । आनंदसागरी जाहले शीतळ त्यांची चरित्रें अति रसाळ | ऐकिली सकळ सज्जनीं ॥ २ ॥ धन्य तयांची १००

करणी | मठ बांधिला वनीं । तेथील वर्णन निरुपणीं । सावध ऐका ॥ ४ ॥ योगीराज महासमर्थं । कष्ट करुनि पाहीला परमार्थ । परमार्थ तोचि मुख्य अर्थ दृष्टीपुढे ॥ ४ || ॥ जिकडे जातील समर्थ । त्या स्थळीं सर्वहि अर्थ । अर्थ असता अनर्थ | कासया घडे ॥ ५ ॥ एकीं मागमागोन घेणें । एकां न मागता देणें निष्क्रमभजनें देव उणें । पडोंचि नेदि ॥ ६ ॥ समर्थ जिकडे जाती | तिकडे लोक धावून येती । आलेल्यांचे मन करीती । संतुष्ट बहु ||७|| बहु दूर भक्ति पसरली । हिंचगॅरीस येती भक्त मंडळी | सप्ता करोती योग्यकाळीं " आनंदाने ॥ ८ ॥ मार्गशीर्ष चैत्र माघ मासीं । उत्सव करिती सप्त्यांसी । श्रावणमासीं निश्चयेंसी | साधन वाढविती ।। ९ ।। तया स्थळीं चमत्कार | होती तयांचा विचार | शोधुन पहावा साचार | विचारवंतीं ।। १० । विचार म्हणजे इच्छ हार । न मागता होत साचार | नाना अडचणींचा प्रकार | निघोन जातो ।। ११ ।। तया स्थलांचे मोल । करितां होतसे अमोल | रत्न आणि १०१ फोल | सारिखें कैसें ।। १२ ।। तेथे दोन मुखवटें सुरेख । रौप्य आणि ताम्र एक । तया मूर्तीचें कौतुक । पाहतां कळे || १३ || तेथे मृदंग नाद थोर पुष्प सुवास संभार । आश्चर्य करिती जन फार | पाहुनिया ॥ १४ ॥ कित्येक भक्ती बांधिल्या सभोवार राहण्या शाळा तया भुमीची तुळा | मुळींच नसे ॥ १५ ॥ भक्त त्रिकाळीं भजन करिती । कर्पूरसंभारे आरती करती । जय- जयकारें ढाळया पिटती प्रेमभरें ।। १६ ।। दोन रौप्यवेत्रिका असती । त्या देवापुढे ठेवती । सप्ताह प्रसंगी आणती । शोभायमान ॥ १७ ॥ टाळ मृदंग कित्येक | तीन झंकार घंटा अनेक षाहुनियां हर्षित लोक । मनामध्यें ॥ १८ ॥ दिंड्या पताका लाविती । फुलझाडे शोभा देती। मंडपशोभा पाहुनि मती होय ।। ११ ।। चहुंकडे पर्वत | मध्ये मठ शोभत । लोक साधनाकरीतां जात तयांवरी ॥ २० ॥ जवळी तीर्थे असठी दोन । स्नानें करिती सकळ जन । उत्तम जलें | गुंग १०२ ठेऊन ! असती पूर्ण । सर्वकाळीं ॥ २१ ॥ गुरूंच्या पादुका गुरूलिंगजंगम म्हणून भक्ती चालविती नमून | तया पुढें || २२ शिवलिंगाजवळी गणपतीची ॥ आणि मूर्ती असे बलभीमाची । तेणें शोभा दुणावे साची | मूळ मूर्तीची ॥ २३ ॥ चौघडा वाजे समोर । स्त्रिया बसती माडीवर | घंटा टांगिली असे थोर । नादें अंबर भरतसे ॥ २४ ॥ पालखी निघे तीन रात्री । तयापुढें वाजती वाजंत्री । वाटे कंपायमान धरित्री । नामघोषें ॥ २५ ॥ गुरुलिंग मूर्ति पालखींत । बैसवुनी बारा अभंग म्हणत | नानापरीचीं वाद्ये वाजत | नाना छंदे ॥ २६ ॥ पालखीपुढे नाचती कितीएक गुरुलिंगजंगम नामें गर्जती । । करिती । ।। २७ ।। पांच प्रदक्षिणा घालिती । मग मूर्ती पूर्वस्थळी ठेविती । नानापरी आरत्या करिती । महानंदे ।। २८ ।। अन्नसंतर्पण सात दिवस । करोनि भक्त जाती स्वस्थळांस | तथा सप्त्यांचा उल्हास । किती म्हणून भजन जयजयकारें १०३ ।। २९ ।। असो मी निरूपण | वर्णावा पुढील समासौं श्रोती मतिमंद शिष्यवर्गाचे सावध परिसावें ॥ ३० ॥ साकार | समर्थ असती निराकार अज्ञान करीन ! माझें लिहिणें साकार लिहितां 1 चुकें फाय | तरी क्षमा मज किजे ॥ ३१ ॥ हें माझें चुकिचें लिहिणें । श्रोतीं गोड मानूनि घेणें । मज दीना न अव्हेरणें । क्षमा करोनि ॥ ३२ ॥ मी महाराष्ट्र भाषीं अजाण । अर्थव्याकरणीं बुद्धीहीन | म्हणून वर्णन संपूर्ण करितां न || ३३ ।। मी असे अजाण करंटा | उगाच ओव्यांचा करी पुरवठा । म्हणून हे गुरुश्रेष्ठा । क्षमा केली पाहीजे ॥ ३४ ॥ असो धन्य धन्य हिचगेरीं क्षेत्र | तेथें जाती ते पवित्र । स्वयें दर्शनें करिती पवित्र । इतर जनांसीं ॥ ३५ ॥ इति श्रीहिचगेरीवर्णनं नाम तृतीयः समासः || १०४ श्रीगणेशा नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रीराम समर्थ ॥ जयजयजी उमदीकरा | सकल सद्गुण माहेरा | चरित्र कथावया आज्ञा करा | ब्रह्मानंदा || १ || आज्ञा आपुली शिरसा वंद्य | आपण असा जगद्वंद्य । मर्नी स्मरोनी तुमचे पाद | कथा आरंभी मी ॥ २ ॥ तुम्ही निर्गुण निराकार | प्रपंचीं दिसतां साकार । आपणां न लगें संसार । म्हणोनि संसारांतीत | ॥ ३ ॥ महाराजांचे अनेक भक्त । परी कोण कोण झाले विरक्त | त्यांची कथा मन सुचित | समर्थ ऐका ॥ ४ ॥ जैसे रामदासशिष्य कल्याण तैसेचि असती गुणसंपन्न । अंबुराव नामें सुजण । करोनी भक्त ॥ ५ ॥ कल्याण उपमेसी दिधले ।। त्यांनी बहुत साधन केलें । सावनें मुख्य शिष्य झाले | म्हणून साम्य ॥ ६ ॥ हिचगेरी क्षेत्रीं । जाण । मठ | बांधावया दिवले स्थान मठामध्यें स्थळ करुन । । भक्ति करीत राहीले ॥ ७ ॥ असती अति साधनिक | १०५ संभावित आणि सात्विक | भक्तिवान आणि भाविक । ॥ ८॥ समर्थे पाहून त्यांचे गुण । भक्ति सर्वोत्तम उपदेशावया अधिकार पूर्ण दिधला परंतु कोणीही । जन। नुपदेशिले ॥ ९ ॥ त्यांनी सांगितले समर्थास । मी आपला दासानुदास । आपण असतां उपदेशास । केंवीं अधिकारी होईन ।। १० ।। जैसी रामदासांची शिष्यीण । वेणूअक्का नाम सुजाण । तैसीच समर्थाची पूर्ण शिवलिंगव्वा नामें ।। ११ ॥ तयांचे स्थळ जत संस्थान । लहानपणी उपदेश घेऊन 1 करिती तेव्हापासुन । एकनिष्ठपणें ॥ १२ ॥ सदोदित करिती साधन । दृष्टीपुढें आत्मज्ञान | धन्य तयांचें महिमान | मज न वर्णवे ।। १३ ।। महाराजांचे खटपटी भक्त । नंद्याप्पा आणि तुकाराम विरक्त । दोघे भावे वर्तत || एकनिष्ठपणें || १४ || नंद्याप्पाचे निवासस्थान | जमखडी नामें संस्थान | अनुगृहीत होऊन बहुत दिन जाहले ।। १५ ।। लिंगायत कुळीं जन्म १०६ बोधानंतर जाणिले वर्म । तेथोनि भक्तीवर प्रेम । अति- शयित ॥ १६ ॥ नेमनिष्ठे चालती । प्रति सप्त्यास मठीं येती । शोभायमान मठ करिती । सर्व प्रकारें ।। १७ ।। दुसरें नामे तुकाराम | विजापुरी ह्यांचा जन्म । बोधानंतर वधुनी भ्रम | गुरूपदीं लीन झाले ॥ १८ ॥ असती बहू खटपटी भक्तिवीण एवढी पोटी | आशा थाटें करिती । नाना नाचती | पालखी 1 नावडे गोष्टी | सप्ता न चुको । यांसी ।। १९ ।। भजन पूजन वाद्ये आणविती ॥ नाना छंदे प्रेमें पुढें || २० || चिम्मडी असती दोन अल्लाप्पा एक । विरक्त आणि ।। २१ ।। तयांचे करावया कथन कारण । विवेकी असती परिपूर्ण । ।। २२ । ककमरी नामें एक ग्राम शंकरेप्पा नाम । बहु शिष्यांमध्ये उत्तम भक्ती विषयीं ।। २३ ॥ तेथील सर्व भक्तमंडळी । विरक्त सेवक || कबीर भाविक । गुह्यज्ञानी वऋदृष्टिक हेंचि म्हणून लिहिलें । तेथील भक्त । १०७ मानूनि त्यास त्रिकाळीं । गुरू भाविती वंदिती भाळी । में करूनि ॥ २४ ॥ तैसेचि तिकोटेकर रामराव | ज्यासी संसार झाला वाव | त्यांचा समर्थ देखोनी भाव | सदैव आपणापाशीं ठेविले ॥ २५ ॥ जयाचें उपनाव फडणवीस | वाल ब्रह्मचारी पुरुष । उदार विरक्त आणि तापस | गुर्वाज्ञसी तत्पर ॥ २६ ॥ त्याच ग्रामीं आणखी एक असती एक भाविक | कवित्वे करिती अनेक | गंगाबाई ।। २७ ।। याही भवतीच्या भुकेल्या साधनीं सदोदित रंगल्या । आत्मज्ञानीं निष्णात झाल्या | विश्वासबळें ॥ २८ ॥ निंबरगींत असती परमभक्त । नागाप्पा नामें विख्यात वाद्य • गायनीं निष्णात । गंधर्वा ऐसे ॥ २९ ॥ निंबरगीत महाराजांचे पौत्र | समयसवे हिंडती सर्वत्र | गुणवंत आणि पवित्र । सर्वामध्यें ||३०|| तैसाचि समर्थाचा एक सेवक । आठ वर्षाचा बालक । लिहितां वाचता

कांहीं एक येत नाहीं ।। ३१ ॥ पांच वर्षाचा १०८

झाला जाण । असतां लहान । तेव्हांचि अनुग्रह तयें वेळेपासून साधन । नित्य करीतसे ॥ ३२ ॥ इराप्पा नामें बालक | असे अति भाविक | भजनीं निष्णांत, सात्विक | सर्वाहून ॥ ३३ ॥ एकदां भजन आइके जरी । न विसरे प्राणांतवरी | नासिकाग्रदृष्टी ठेऊन करो । कामकाज ॥ ३४ ॥ इतकें लहान वालक । कैसे झालें अति भाविक | हेंचि वाटे कौतुक । सकल जनां ।। ३५ ।। येणेंपरी अनंत लोक । स्त्रियाहि आत्मज्ञानिक | धन्य तयाचे कौतुक । " वर्णवेना | ।। ३६ ।। आईसाहेब पटवर्धन | समर्थ कीर्ति ऐकोन | अनुग्रहोत होऊन | भक्ति औत्सुक्ये करिताती ॥ ३७ ।। अंतरीं बाणिलें आत्मज्ञान | भक्तीवरी अति मन । धन्य तयांचें महिमान । किती वर्ण ॥ ३८ ॥ जमखंडी ग्रामी लोकांस । बहुतांसि लाविले भजनास । नेला. जन्म सार्थकतेस | हिचगेरी मठ वांधोनि ।। ३९ ।। सोलापुरी बयाबाई | भक्ति थाटॅ चालविती पाही । A १०९ उदार भाविक आणि उपकाराविषयीं । सर्वात श्रेष्ठ ॥ ४० ॥ सोलापुरी भक्त वाढविती । तेणें समर्थांची वाढे रूपाती। नाना लोकास साधनस्थिती सहजच होतसे ॥ ४१ ॥ शिष्यांमध्यें ज्ञानी प्राप्त परम । विद्या जया सुगम | वेदांताचें पूर्ण धाम | नाना एक्सरें || ४२ ॥ वकील विजापुरीं नरहरराव त्यांस । सांपडे भक्ति - ठाव | संपादू इच्छिती आत्मज्ञान नांव | खटपट करिती ॥ ४३ ॥ ज्ञानी बहुत असून भक्ति चालविती प्रेमेंकरून | धन्य तयाचे महिमान | मी काय वर्ण ॥ ४४ कित्येक असती शद्ध ज्ञानी ते न होती आत्मज्ञानी । परी हे शद्वज्ञान वारुनी खटपट तेरदाळीं जेठमल्ल | भक्तिसामथ्य औदार्याविषयी त्यासी तुल्य | कोर्ण च त्यांनीं आत्मज्ञान अनुभविलें । करिती ॥ ४५ ॥ जाहले मल्ल । नसे ॥ ४६ ॥ स्वजनांसि भक्तीस लाविले । तेणें बहुत ख्याती पावले । समर्थ तेथं ।। ४७ || सर्व समासांचा सारांश | द्यावया ११० 1 नाही अवकाश | पंचभूतों मुख्य आकाश | तैसेचि मुख्य वर्णितों ॥ ४८ ॥ मागें केले वर्णन | अंबुराव महाराज कोण | विचारवंत तुकवंत म्हणून । |तुकोवासमान ॥ ४९ ॥ ते सर्व शिष्यामध्ये श्रेष्ठ | अधिकार सर्वाहुन वरिष्ठ | तैसेचि तयांचे मन स्पष्ट दूरदृष्टी ।। ५० ।। जेवी कृष्ण नखाग्री पर्वत उचलोनि रक्षिले गोकुळ- गोत । नंद्याप्पा भक्तिमार्गास धरीत । तेणेंचि रीति ।। ५१ ॥ केलें भक्तीचें रक्षण | म्हणून कृष्ण उपमा जाण । भक्तिमार्ग वाढवून | जन्म सार्थक केला । शंकराप्पाचें वर्णन | वागें बोलिले कोठील कोण । भोळा भाव असे म्हणून सांव उपमा ॥ ५३ ।। | रामराव ब्रह्मचारी | भाविक विरक्त अंतरीं । लक्ष गुरुसेवेवरी । सर्वकाल ॥ ५४ ॥ जैसे होते हनुमंत || 1 तैसेंचि हे कार्य करीत म्हणून तथा उपमा साजत । हनुमंताची ।। ५५ ।। आणीक असती कित्येक भक्त सांगों जातां असंख्य मज ठाउके तेवढे येथ वर्णिले मूढें ॥ ५६ ॥ मी अज्ञान मतिमंद । मज न समजती नाना छंद । श्रोतीं यांतचि आनंद मानून घ्यावा ॥ ५७ ॥ असो, ऐसा भक्तिपंथ । सागरापरा I वहूत मी काय वर्णी तेथ | मंदमती ॥ ५८ ।। इति श्रीशिष्या वर्गनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ वाढला । श्रीगणेशाय नमः || श्री गुरुभ्यो नमः ॥ श्रीराम समर्थ ॥ आतां वढ सत सभा । जिये सभेसी मुक्ति सुलभा । जेथें जगदीश स्वयें उभा । सप्रेमभरें ।। १ ।। संतसभा अतिशय वाढली । अमर्याद होत चालली । गणना नाहीं ऐसी झाली । त्या सभेची ॥ २ ॥ असो, ऐसे ज्ञान वाढले । मज मंदमतीस काय कळे । नेति नेति वेद थकले । शद्वज्ञानें ॥ ३ ॥ सहस्रमुखी शेष | तोही थके वर्णावयास मी तों अज्ञान खास | केंवी व ॥ ४ ॥ नाहीं भक्ति मुख्य देवाची । शज्ञानें ११२ बडवड साची | आयुष्य गेले व्यर्थचि । मायाजाळी ।। ५ ।। मनीं कामना धरुन | भक्ति करिती सकळ जन | तैसेची मीही अजाण | करीतसे ॥ ६ ॥ निष्कामत्व मोक्षप्राप्ती | सकामत्वे जन्मप्राप्ती । म्हणून निष्काम कैसी भक्ति । निरुपिजेल || ७ || निष्काम म्हणजे कामनेवीण । शिवाशीं जीव भेटून | जै शिवांतचि होई लीन तै । सुटका || ८ || सुटल्यावरी देव होत । जग सगळे उद्धरीत । जगीं सांभसमान शोभत 1 शाश्वतरूपे ।। ९ ।। सा म्हणिजे 'साहा' गुण । 'भ' म्हणिजे भविष्य जाण । तोडून रेषा फिरवून घेतली पहा ।। १० । रेषा फिरण्यास मुख्य कारण | एकनिष्ठ भक्ति जाण तथा भक्तिचे निरसन | । सावध ऐका ।। ११ ।। 'भ' म्हणती भविष्यास भविष्यास । 'ती' म्हणती हरिमायेस | हरिमायेंनें शेवटास | होणार नेलें ॥ १२ ॥ भविष्याच्या शेवट करुन | प्रपंच परमार्थ दोहोंतून मीकाढूपणातें | पार तरले ॥ १३ ॥ या दोहोंमध्यें ११३ ॥ तयांलागीं ॥ १ ॥ बोजा । आत्म्यापरी ठेऊन ओजा । साधकां करीती सहजा । आपणासारिखे ॥ १४ ॥ अथवा बुध मुमुक्षु मंडळी । येऊन मिळती तयांजवळी । तयांसहीं तात्कांळीं । करिती साधु ॥ १५ ।। अभंग आपणासारिखें करिती तात्काळ । नाहीं काळवेळ ऐंसी युक्ति चालली पाही । जी वर्णितां यें ऐसी नाहीं । दासबोधीं कथिला तोही । दृष्टांत ऐका ।। १६ ।। दा. वो. द. १५ स २ ओवी || २३ || खनाळामध्ये जाऊन राहे । तेथे कोणीच न पाहे सर्वत्रांची चिंता वाहे । सर्वकाळ || १ || खनाळामध्ये राहून । सभा थाटे चालविती पूर्ण लोकां प्रचित दाखवून | भक्ति वाढविली ।। १७ ॥ प्रचीत म्हणजे आत्मप्रचीतीं । गुरुप्रचीति शास्त्रप्रचीती । प्रत्येक गोष्टीची प्रचीति । साक्षात्कारें ।। १८ । साक्षात्कार म्हणजे अक्षात । साहा गुणांचा पालट होत तई जनांत प्रख्यात | | पालटावे ! ! होइजेल ॥ १९ ॥ षड्गुण कैसे कामें ११४ 1 कीं ।। २१ ॥ सगुण ब्रह्माच्या । भक्तीस वाढवावे । क्रोधें मायेतें वधावे ॥ तरीच साक्षात्कार ।। २० ।। तुकाराम रामदास । करितो गद्यपद्यास त्यांसि धरूनि भक्तिस । उत्तेजन द्या | योगें। संभवामी युगे युगे । ऐसे अवतार अवघे निर्गुण झाले ॥ २२ ॥ अवतार महत्कृत्यें करिती । भक्ति मार्ग वाढविती । शरणागतांसि रक्षिती । सर्वकाळ || २३ || दा० बी० द० ७स० १० ओंवी ४० ॥ शरणागतांची वाहे चिता । तो एक सद्गुरूदाता । जैसे बाळक वाढवी माता । नाना यत्नें करूनि || १ || भक्ती वाढण्या कारण एक | बोलणें चालणें दोन्ही एक | समर्थाची प्रतिज्ञा एक | तीही ऐका ॥ २४ ॥ दशक वारा दासबोधी । समास दहा काढा आधीं। सत्तेचाळीस ओंवी वोधी । तैसेचि आचारती ॥ २५ ॥ ओंवी || आमुची प्रतिज्ञा आहे ऐशी । कांही न मागणें शिष्यांसी । आपणा मागणें जगदीशासी । भजत जावें ॥ १ ॥ म्हणून शिष्य ११५ झाले उदंड 1 परमेश्वरा ध्याती बंड | तेथे कैचें ॥ २६ ॥ सभेत अखंड | हरिरामोशाचें वृद्ध तरूण बाळ | पुरुष त्रियांदि सकळ । गजरे करिती कल्होळ | एकवटोनी ॥ २७ ॥ सभेत असती पंचाक्षरी पडक्षरी | त्रयोदशाक्षरी । द्वयक्षरी त्र्यक्षरी आणि चतुरक्षरी । तेही असती ।। २८ ।। समर्थास जे निंदिती । तेही अवधे वंदिती । अनुभवार्थ ऐकतां घालती । लोटांगण ॥ २९ ॥ आपुला मार्ग त्यजून ।। । उपदेश घ्यावया येती जन सत्यप्रचीती पावून आनंदती ।। ३० ।। अतिदूर स्थानीं जे असती । तेही दर्शनालागी येती । तेणें राष्ट्रीं भरली कीर्ती ! चोहींकडे ।। ३१ ।। साताऱ्याचे कांही येती | कोल्हापुरासी आहे कीर्ती । हुवळी धारवाड मिती | काय वर्णू ॥ ३२ ॥ मुंबापुरीत कांही असती । रत्नागिरी पुण्यात ख्याती । बहुत असती कोंकण प्रांती । येती जाती ॥ ३३ ॥ जमखंडी हें मुख्य स्थान । अनुग्रहीत सर्व सुजाण । लिंगायत आणि ब्राह्मण | बहुत असती ॥ ३४ ॥ तैसेंचि एक ११६ सोलापूर । त्याहून थोर विजापूर | अनुगृहीत लोक, फार तथा स्थानीं ॥ ३५ ॥ आणिक एक जत संस्थान । त्याहूनि वरीष्ठ | चिम्मड स्थान भाविक असति चिम्मड जन । भक्तिविषयीं ॥ ३६ || असो ऐसीं असंख्य स्थळें । मज रंकासी काय कळे 1 यशकीतिप्रताप झळाळें । समर्थांचा ।। विस्तारुन । , ऐसे व्हावया कारण । सांगिजेल संतांसींच बाणे खूण | अनुभावाची ॥ ।। ३८ । यशकीर्ति विस्तारली । असंभाव्य पसरली । यशकीर्ति प्रताप बोली । ऐका निरसन ॥ ३९ ॥ 'य' म्हणजें इहलोक । म्हणजे आशा टाक । ऐसे हे समर्थं देख । म्हणोनि लोक धुंडिती ॥ ४० ॥ कीर्ति म्हणजे भगवंतकीर्ति । आपण सर्वदा मुखें गाती समस्तांकडून गावविती । सर्वकाळ ॥ ४१ ॥ भगवंत - कीर्ति गाजवितां । साधुकीर्ति होते तत्वतां । हें सांगा- वया नको आतां । परी सांगितलें ॥ ४२ ॥ प्रताप म्हणजे ( ११७ परताप परतान ह्मणजे जनताप | सोशिल्या होतो प्रधान । एरव्ही नाही ।। ४३ ।। ऐशी कीर्ति समर्थाची । फेरी चुकते चौन्यांशीची । दृष्टांत वाणीं तुकारामाची | तीही ऐका ॥ ४४ ॥ अभंग | नरदेहा यावें हरिदास हरिदास व्हावें व्हावें । तेणे चुकवावे गर्भवास ॥ १ ॥ ऐशा शर्तीवरी समर्थ | आश्रम पावले गृहस्थ | क्रियाकर्म वरिष्ठ | सकळामध्ये ॥ ४५ ॥ समर्थ नरदेह पावले | सत्य ब्राह्मण गुरु केले ब्राह्मण । कोणासि ह्मणितलें । तेंहीं ऐका || ४६ ॥ ब्रह्म जानाति ब्राह्मणः | हे वर्म जानती गोसावी इतरां होय गाथा | गोवी । अंजणेवीण जाणती केवीं | गुप्त धन ।। ४७ ।। निंदक जरी शरण आला । अनुग्रह देती त्याला || गुह्यार्थ सांगूनि सन्मार्गाला | लाविती सदा ।। ४८ ।। तेणें चुकविली फेरी । त्यासी न दिसे थमनगरी ॥ आपण तरूनि लोक तारी। धन्य ते साधु ॥ ४९ ॥ ज्योतीस ज्योत मिळोन जाते । ब्रह्मपदीं ऐक होतें ॥ । ११८ जैसें तेव्हा एकटी कुडी पडते । पृथ्वीवरी ॥ ५० ।। आत्मज्ञान जीर्ण । तैसाचि मार्ग पुरातन । संभवामि युगे युगे ह्मणून | अवतार होती ॥ ५१ ।। निंदक जरी पुण्यवंत | तरी यमाच्या जाचीं पडत । ऐसें लिहण्या आधार मिळत । ह्मणून लिहिलें ॥ ५२ ।। जे या मार्गी चालले । ते जन्ममृत्यूपासून सुटले । इतर ते अवघे बुडाले | निंदितां निंदिता || ५३ ॥ लिहूं नये परी लिहिलें । निंदकांस दूषियलें । तींहीं सत्य पाहिजे शोधिले । ह्मणोनियां ॥ ५४ | अभंग || रेडा बोले भित चाले । महिमा ज्ञानदेवाची ॥ १ ॥ आतां याची प्रचीत । चित्त देऊन ऐका समस्त । एकोनियां यांतील भावार्य | समजून घ्यावा !! ॥ ५५ ।। 'रेडा' म्हणजे अज्ञानाकडून । 'बोले 'बोले' म्हणजे वेद बोलावून | ज्ञान्यास लज्जा आणून । भक्तिमार्गा ओढिती ।। ५६ ।। 'भी' झणजे भीती । ' ती ' ह्मणजे त्रिगुण जगती । जगीं । जगीं त्रिगुणांची भीति F 1 सर्वदा असे ।। ५७ ॥ 'मही' म्हणजे भूमीवरी । त्रिगुणा भिऊनि चाले अंतरीं । तई महिमा चढल्या- वरी । ज्ञानदेवचि तो ।। ५८ || दृष्टापुढे 'ज्ञान पाहिले । तै साक्षात् 'देव' चि झाले | ह्मणून ज्ञानदेव ह्मणितले । पृथ्वीवरी ।। ५९ ।। ऐसे समर्थ ज्ञानदेव झाले । गुह्य तेची प्रगटविले | सर्व विश्व ब्रह्म केले । धन्य धन्य साधु ।। ६० ।। आता हंस परमहंस यांचे । लक्षग करितों उभयतांचें । एकाग्रमनें ऐका साचे । श्रोते जन ।। ६१ ।। हंस लक्षण प्रपंचात । हौस धरुनि सहत । प्रपंचीं परमार्थ करीत । आणि अंतरीं मुक्त ।। ६२ ।। प्रवृत्ति मार्ग स्वीकारिती आणि समुदाय वाढविती । मुक्त होऊनि मुक्त करिती । साधकजनां ।। ६३ ।। हंस राहे ससारीं । परी भार ठेवी देवावरीं । जैसा वाळ खेळे अधांतरीं । ताताधरे ॥ ६४ ॥ परमहंस केवल परमार्थी | अनन्यांसि उपदेशिती । निवृत्तिमार्ग स्वीकारिती । प्रवृती सांडुनि । ६५ ।। + } १२० हंसा आणि परमहंमा । एकचि पदवी दोघां पुरुषां । किंचित् भेद तोही सहसा | न समजे ।। ६६ ।। आता मुक्तिचें लक्ष्मण । विशद दावुं बोलून | तेंचि मांता सावधान । श्रोती परिसावें ॥ ६७ ॥ गुरूवांचुन नाहीं मुक्ती । ऐसें सांगितले सिद्धांती आतां नामधारकांची स्थिती | बोलीजेल ॥ ३८ ॥ नामधारक आणि नेमस्त | गुरुवचनीं विश्वास धरीत । आचार बळें शोभत । अंती मुक्त होय ॥ ६९ || वासनाक्षय ह्मणजे मुक्ती । ऐसे सर्वत्र म्हणती । परी ऐशिया नामधारकाची गति । वेगळीच असे ।। ७० ।। दा० बो० || जेचि क्षणी अनुग्रह झाला | तेचि क्षणीं मोक्ष झाला | बंधन कांही आत्म्याला । बोलोंचि नये ॥ १ ॥ अभ्यासें घेती आत्मदर्शन | मी आत्मा अनुभवती पूर्ण विश्व ब्रम्ह जाणती जाण । ते जीवन्मुक्त होती ॥ ७१ ।। अंती मुक्ति आणि जीवन्मुक्ति । यात महदंतर निश्चितीं । म्हणून अभ्यासे स्वरूपस्थिती । अनुभवावी ॥ ७२ ।। १२१ याचि देहीं याचि डोळा घ्यावा मुक्तिचा सोहळा | स्वरूप न पाहतां बावळा । नामधारक होय ॥ ७३ ।। आपणां नको साधन । नाममात्रे मुक्त झालों जाण । ऐसे मनी दृढ धरुन साधन चुकविती ॥ ७४ ॥ प्रपंचमीति उडेना । काम क्रोधासि जिंकवेना । अनिर्वाच्य आनंद सापडेना | साधनावाचुनीं ।। ७५ ।। विषयजाळीं साधन नसतां नामधारक सांपडे तात्काळीं । अभ्यास खणून वासनामुळी । ह्मणून काढावी ॥ ७६ ॥ जो नामधारक आचार भ्रष्ट तो समजावा योगभ्रष्ट । गुरूवचन सांगतो स्पष्ट मुक्तीस न पावे ॥ ७७ ॥ गुरूसी पुनःशरण रिघावे | तरीच " त्याने मुक्तीस जावे। गुरू नसता लागें यावे । पुनः संसाणसी ॥ ७८ ॥ योगभ्रष्ट जन्म पावती । मानव- कुळी जन्म घेतीं | परी लक्ष चौन्यांशीची गती । चुकोन जाते ॥ ७९ ॥ मानव जाहल्यावरी । ज्ञानमार्ग सांपडे झडकरी | प्रयत्न होताची करीं । मोक्ष येतो C 1 १२२ 1 " ।। ८० || एतद्विषयीं सद्गुरुवचन । एकचि असे प्रमाण । ग्रंथाहून साभिमान | गुरूवचनीं धरावा ॥ ८१ ॥ शंका धरुन बैसला । अर्थी अनर्थ पै केला । मग ग्रंथः तो तुझांला । काय करील ॥ ८२ ॥ अभंग ॥ मातापिताः दोन्ही जीवेंची: मारावे | चरण वंदावे बायकोचे ।। १ ।। या अभंगी होतां अनर्थ । अनर्थामध्ये आहे अर्थ । अर्थ ¡ 17 1. + d आणि अनर्थ | पाहावा तैसा || ८३ | सुलट अर्थ सर्वा समजे | उलट आत्मज्ञानी उमजे । आम्ही आत्मज्ञानी शोधिजे । जनाविरुद्ध || ८४ ॥ कळतां कळतां कळों येतो । शोधितां शोधितां शोध लागतो। वळतां वळतां वळू लागतो । गुह्य अर्थ ।। ८५ ।। 'माता' तेचि हरिमाया। पिताः' अकहार राया । आत्मबोध-शस्रं उभया । जीवेचि मारी || ८६ || ? म्हणिजे संबोधन । एक' म्हणिजे वस्तुरूप वंदावे घरण | दर्शना उपरी ।। ८७ ॥ कैंसा आहे | आणि कैसेनि लाहे । तेंची आतां स्वभावें । वा जाण । तयाचे परी तो आत्मा • १२३ निरूपिजेल ||८८ | आत्मा द्रष्टव्य म्हणुन एक । श्रोतव्य नाम दुझे देख । मंतव्य तिसरे चौथें आणिक । निदिध्यासितव्य । ८९ ।। आत्मा द्रष्टव्य आत्मा पाहाणें । आत्मा श्रोतव्य श्रवण करणें 1 • मंतव्य म्हणिजे मनीं विचारणें । सर्व कांहीं ॥ ९० ॥ निदिध्या- सितव्य म्हणजे ध्यानीं रूप अभ्यासें प्रगठें नयनीं । मग ते जनीं आणि मनीं । सर्वदा दिसें ॥ ९१ ।। ध्यान करुन रूप पाहाणें । उगमा जातां जन्म नेणें । ऐशी आशा धरुन राहाणें । मनामध्ये ॥ ९२ ।। श्लोक ।। नभासारखं रूप या राघवाचें । मनीं चिंतितां मूळ तुटे भवाचें ॥ याहून सुलभ कबीरवचन | मुढा वाटे 'तेंहि गहन । श्रोतीं वाचावें देऊन मन । पुढें आहे ।। ९३ ।। वचन || देखो तो खसखस मूरीद मरे तो बसवस || १ | ऐंसेचि एक कानडींत । तेही दिधलें आहे येथ । "सुलभ जाणा अतिशयित । साधकांसी ।। ९४ ।। वाक्य || कुरहुर्कडरे मरळि भववके बरलारि ।। १ ।। 1. १२४ ऐसे आधार असूनी । कोणी खरे न मानिती जनीं । म्हणून चमत्कार मनीं । मानिती साधु ।। ९५ ।। 1 म्हणूनि सत्य मार्ग घरुन असत्यपंथ द्या टाकून उरवा ।। ९६ ।। आणि ज्ञानमार्गही ू 1 क्षमा कीजें अर्भकाला । अज्ञान जरी समर्थकृपें म्हणून क्षमा ।। ९७ ।। अथवा क्षमेचें नाही कारण लिहिलें पूणे । समर्थकरींची मी लेखण नलगे ।। ९८ ।। जैसे समर्थ लिहिती । तैसीच लेखणी चाले ती । दोष मजकडे नच येती । तिळमात्र ।। ९९ ।। ऐशा ग्रंथाचा कर्ता । तो एक सद्गुरुदाता | गणपति अज्ञान आहे तत्वतां | दासानुदास || १०० ।। इति श्री ज्ञाननिरुपणं नाम पंचम: समासः पुंडलीक वरदा हरि विठ्ठल ! भगवद्भजन वाढवून | कीर्ती सांप्रदायाचा गौरव केला सांगितला १२५ । पदकमली जयजय भाऊराव राज सद्गुरु नमित असे दास श्रीगुरु | धृ० ॥ कवि गणपती - रचित ग्रंथ येथे पातला । मंदमती परी मजसी मान हा दिला ॥ त्वां दिधल्या बुद्धीनें म्यांहि पाहिला | शुद्धाशुद्धी बुद्धी । परि करुनि । करीं लिहुनी पदि नमुनी । घाडि पामरु ॥ जयजयजय ॥ १ गुर्वाशें अल्प ● | ॥ १ ॥ फेरफार जाहला । शद्वान्वय जनघाटीं कांहीं शिरीं तव छत्रकृपा म्हणुनि संपला || । 1 । युक्ती । मजजवळीं नाहीं मुळी । भवजाळीं । बुडत श्रीगुरु काजें या दिवस लागले | जय० ॥ २ ॥ जठरानळ- म्हणुनि क्षमा मागाया पद्य निर्मिले । पद्य- पुष्प चरंणांबुजि आजि वाहिलें । तारी । वारी | सारी । मभीती । सौख्यतती मागे अति । पंचनदिकरू ॥ जयजय० ॥ ३ ॥ 1 घातला | मम भक्ती उक्ती १२६ श्री समर्थ अंबुराव महाराज यांचे संक्षिप्त चरित्र. सहावा समास ॐ नमो सद्गुरूवरा । आत्मतेज प्रभाकरा । सुमन मम विकसित करा आत्मदेवा ॥ १ ॥ श्रीसमर्थ भाऊराव | अमित त्यांचा शिष्यसमुदाव। विराजत त्यांत अंबुराव । उड्डुगणीं जेवि चंद्रमा ॥ २ ॥ वेष असत तो बावळा | परि अंतरीं अध्यात्मकळा | भक्तिभावाचा जिव्हाळा ॥ विलक्षणचि वसतसे || ३ || जयास सद्गुरू हाचि देव । सद्गुरूपदीं दृढतम भाव | सद्गुरुसि समर्पनी सर्वं । अनन्यपणें राहात ॥ ४ ॥ मति जयाची अतिप्रखर । नीतिनेमही खडतर । । १२७ भगवंताचा साक्षात्कार | दिव्य जयासी जाहला ॥ ५ ॥ जो कृपेचा सागर । विनयभावाचे आगर । ना शिवे जयः अहंकार स्वप्नांतहो कदापि || ६ || प्रेमाची जो प्रेमळ मूर्ती अचल नेमाची प्रतिकृति जयाचेनी भक्तिस्फूति । अभाविकाही होतसे ॥ ७ ॥ जेणे परमार्थ साधन । मामरण केले जाण | भगवंतावीण एक क्षण । वाषान ज्यांनीं दव- डिला || ८ || ऐसा आमुचा स्वामिराव | बाबा तयाचे प्रिय नांव ज्याच्या तपे भक्ति भाव | उपजला अभाविकांसही ।। ९ ।। जिगजिन्नी जगज्जयिनी जाण | केली बावानीं जन्म घेऊन | करणिकांचे कुलपावन | त्यांच्या दिव्य जीवनें ।। १० ।। बापुराव चुलत्यावरती | निंबरगीनाची अति प्रीति । तन्निरूपणीं वावती पोथी । निवरगीतचि राहती । ।। ११ ।। बालरणीं नित्ररगीस असतां । वावा भेटत निवरगीनाथा | नाथ नित्य त्या साखर देता । सक्रीमुत्या व्या ह्मणती ।। १२ ।। सक्रीमुत्याचें दिव्य दर्शन | न घडं तें दिनी शिक्षा पूर्ण जें दिनी घडे पुण्य दर्शन | शिक्षक प्रसन्न .. 1. 1. १२८ ते समयीं ।। १३ ।। ऐसा अलौकिक अनुभव | बालकाचा वाढवी भाव | श्रीबावांना ही ते देव । तेव्हांपासून वाटत ॥ १४ ॥ यथाकाळी लग्न जाहलें | तरुण बाबा आनंदले । इंचगिरीस सकुटुंब राहिले । करणिकवृत्ति करूनिया ।। १५ ।। निवरगीमहाराज इंचगेरींत । एकदा कुलकर्ण्याच्या घरीं उतरत | सारी रात्र साधना बसत | आश्चर्य बाबांना वाटले ॥ १६ ॥ त्यांनी त्रिवार विचारणा केली । खोकल्याने बसण्याची वेळ आली । 'इन्नायित्तप्पा' म्हणोनि | सकाळी हुल्याळाप्रति ते गेले ॥ १७॥ कांहीं काळ ऐसा लोटला । आकस्मिक आला यमाचा घाला । कन्या कांता स्वसदनाला । करालकालें खेचल्या ||१८|| पडतां आकाशींचो कु-हाड | उडाली अंतरी गडवड । मति जाहली दिड् मढ | क्रांति प्रचंड प्रपंची ॥ १९ ॥ उपजले वैराग्य प्रबळ | गेले गाणगापुर तात्काळ । उपोषण करूनिया सकळ गुरुवरित त्यांनी वाचिलें ॥ २ ॥ तेव्हां तया दृष्टांत झाला | श्रीदत्तांनीं सद्गुरु दाविला । त्याप्रति · श्री अंबुराव महाराज जन्म-जिगजिनी १८५६ समाधी - इंचगेरी २२-१२-१९३३ पान:नित्यनेमावली.pdf/१६६ १२९ जाया आदेश दिधला । नंतर बाबा परतले ॥ २१॥ तेच समयीं निवरगींत । श्रीभीमरायाचा उत्सव होत गेले असतां बावा तेथ । सद्गुरुदर्शन घडे तया ||२२|| देवळां- पुढील चौथन्यावर | बैसले होते उमदीकर | पाहतां त्यांना हेचि गूरुवर | अंबुरायासी वाटले || २३ ॥ परंतु सादर आणि सभय | बाबांचे ते चित्त होय | जाणोनि संकोच हा राव | देई तमाखू चिमुटभर ||२४|| येणें भया नष्ट झालें | बाबा समर्थ सन्नित्र बैसले | वृत्त आपुलें निवेदिले । समर्थचरणी तेघवां ||२५|| परमार्थांवीण दुःख न टळे | नामेंवीण परमार्थ न मिळे । तंव नाम घेई ब भाववळें । ऐसें बोधिले सद्गुरुनीं || २६ || 'मागुता येईन' ऐसे कथुनि | अंबुराव निघाले तेथोनी । संसार नाश येणें म्हणुनी | नामभय वाटे तथा । २७ जाणोनि बाबांची सुप्त शक्ती | नाम देण्या उद्युक्त होती । शिष्या करवो घरवून अणिती | समर्थ बाबांस ते समयी ||२८|| सावळसंग - भाऊराव | गुरुबंधु ते महानुभाव ॥ त्यांना खुणावतीं 16 १३० 1 गुरुदेव । नाम देण्याकारणें ॥२९ || दिव्यनाम पडतां श्रवणीं । वृत्ति पालटली तत्क्षणीं । नासाग्रीं दृष्टी ठेऊनी । वावा निघाले नेंम करीत ॥ ३० ॥ इंचगिरीस बाबा येत । परि नासाग्री दृष्टी अविचलित यापरी सतत नेमांत । एक मास लोटला ||३१|| झाकी नेत्रव्यथा भीकर | तेजरूप दिसती अपार । भ्रांत होय साधकवर | घात झालासे म्हणोनिया ||३२|| सावळसंग ग्रामी पातलें| गुरुसो इतिवृत्त निवेदिलें । म्हणे मज गरीवाचे डोळे । गेले आता काय करूं || ३३ ॥ गुरूराय हसती तेधवां। ।। ।। शिष्यांचा मेळावा | सांगोति नवशिष्माच्या अनुभवा । अनुभवपदें म्हणविती ||३४|| प्रात:काळी नेमा त्वरित । बाबा जात डोंगरांत | माध्यान्ह उलटता परतोन येत । ऐसे निष्ठुर तप केलें ||३५|| अखंड साधने सिद्धि मिळवी । ससारचिता सुदूर पळवी | भक्तियोगाचा मार्ग मळवी । मिळबी प्रंम सद्गुरूंचे || ३६ | तव शेत एक. लिलावांत घेतलें तें भाचा त्यास देत दोन पोती धान्य त्यांत जमवून । व्यावरी निर्वाह तयाचा ||३७|| दोहोचें ते तीन झाले तिन्हीं जागीं सहा पातले । तव एक पोतें बाबानीं दिलें । निवरगीं सप्ताहानिमित्त ॥ ३८ ॥ हें पाहोनी समर्थ तोषले बलूतेदार त्वां मज केले । एसें म्हणोनि आशिर्वांदिले । 'ओक्कळि गोम्न' द्यावें बा ॥ ३९ ॥ अंकुरला जो भाव अमोलिक । आतां यांतचि अमित पीक | देईल तुज जग- नायक | आशीर्वचन हे सद्गुरूंचें ॥ ४० ।। सहाचे मग वारा होत बारांचें बावीस जमत पुढे छत्तीसही येत । उणें काय देव देतां ॥४१॥ अनंत हस्तें देतां देवें । दोहातीं ते किती घ्यावे चालवी योगक्षेम तोचि सर्वे चिंता करणें कासया ॥४२॥ बाबांनी धंदा सोडिला । केवळ परमार्थ वाढविला । अमित नामफ्रेंमा जोडला सेविलास सद्गुरुनिष्ठने || ४३ || चित्तीं ज्याच्या बसें नाम | करील काय तथा काम | परी या मायिकाचा नेम प्राणां- तींही न धरवे॥ ४४॥ वैराग्य आणि यौवन | समरस होणे अति कठिण | महद्भाग्ये हें लाभें जाण सद्गुरुकृपें • 1 2 ( । बाबांना ॥४५॥ एवं समर्थकृपेचे आश्रित | समर्थसन्निधचि राहात | शंका विचारी सदोदित । चिकित्सक मति तयांची ॥४६॥ जाणोनि शिष्याचे मनोगत | सद्गुरु प्रेमानें उत्तरत ॥ निवारूनिया शंका समस्त । करिती सम धान तय| चें ॥४७ यापरी सहावर्षे पर्यंत | बाबा अति वादनिरत । समर्था बेजार करीत । अनावर जिज्ञासा तयाची ॥४८॥ शेवटीं एकदां श्रीवाबांनो | आपणा नामाधिकार दिला कोणी । ऐसे निंबरगी येथें विचारोनी | समर्थाना त्रस्त केलें ॥४९॥ सायंकाळी नेमास बैसले । तो दृष्टांती निंबरगीनाथा देखिल बाबांना त्यांनी दटावले | कांरे जीभ त्वां लांब केली ॥ ५० ॥ भाऊरायास नामाधिकार । म्यां दिधला असे साचार | तुज का त्याचा कारभार | उगाचि साधन करीत जा ॥५१॥ तेव्हां सद्गदित अंबुराये | देहभाव समर्था अपिला स्वयें । गुरुवाक्य वेदवाक्य होये | मग त्या अनन्य शिष्यासी | || ५२ ।। हरपला जंव देहभाव | विलीन गुरुपदी अंबुराव । अनन्यभावे दिव्य अनुभव | लाभला तया तात्काळ || ५३ ॥ । । I । बाबांव्या भावास भुलून इंचगिरीस मठ स्थापून सुदाम्याचें घर पावन समर्थामी पैं केलें ॥५४॥ वाढला समर्थ शिष्यगण | उभारला मऊ तेथेंचि जाण । सप्ताहसमयीं भक्तजन | जमत साधनाकारणे ॥५५॥ क्षेत्र भक्तीचे माहेर झालें । मठाधिकारी बाबास कल्पिले । सप्ते सकळ थाटांत चालले | अविरत सेवेनें तयांग्या ॥ ५६ ।। देखोनि बावांची सेवाभक्ती । संतोषें समर्थ उद्गारती तुझी सेवा मीं वानू किती धन्य धन्य बा अंबुराया ||५७ आला समर्थांचा । निर्माणदिन | शिष्यवृंदासि तो दुर्दिन । सर्वत्राना अत्यंत जाण । दुःख झालें तें समयीं ॥ ५८ ॥ समर्थ समधिस्त झाल्यावरी । विव्हळ बाबा अभ्यंतरी । न जाती तें मठा- बाहेरी । साधनीं निरत सर्वदा ।। ५९ ।। नाम द्यावया अधिकार | आधींच मिळाला असता थोर । न देई नाम शिष्यवर । तीन वर्षेपर्यंत ||६०। पुढें परमार्थप्रसार । राराहिला जाणोनि सत्वर | समर्थ आज्ञेनुसार । नाम द्यावया आरंभिलें ॥६१॥ नंतर दिन पाहून वश | श्रीवावा १३४ । निघाले जगदुद्धारा | करूनि हरिनामाच्या गजरा | झेंडा रोविला समर्थांचा ॥ ६२ || बाबा गांवोगावीं जात | भक्त- मंडळी नेत जेथ | त्रिकाळ निरूपण भजन करींत । उद्धरित भाविकांसी ॥ ६३ || परी आपुलें त्रिकाळसाधन | समर्थापरी न चुककविती जाण | श्रीवाबांचे नित्य निरूपण | समर्थाचेंच वाटत ॥६४॥ तव निरुपण ऐकून निंदकजन | म्हणती शब्द छिन्नमिन्न करून त्यांचें सौंदर्य हिरावून | कुरूप तयां करताती ||६५ || श केवळ वाहन । अर्थ - वाहक तो जाण | नेणती परी हे कुहकजन | सेविती शिष्य, अर्थसत्व ||६६|| शब्दांस करूनि साधन | वावा वदती स्वानुभवज्ञान | असार सोडून सार जाण | राजहंस चाखती ।। ६७ ।। पुढें मठांत द्वैत माजलें। श्री बाबांनी ते स्थान सोडिलें | आपण अलग राहू लागले वाढवित भक्ति तपोबळें ।। ६८ ॥ वृत्ति सदैव उदास | न मागती कांहीं कोणांस | भाववळें भगवंतास भजा ऐंसेचि मागत ||६९॥ श्री बाबा फिरत अविश्रांत | भक्ति वाढवावया जनांत । 1 7 १३५ भक्ता देवुनि आत्मप्रचीत । कृतार्थ त्यांना पै केलें ||७०।। पुढें वृद्धापकाळ झाला । न सोसती श्रम शरीराला | देह अत्यंत क्षीणला । उद्धारकार्य तरसे चालें ॥७१|| जंब उदरव्यथेनें देह पौडिला । तंवह नेमांत खंड न पडला | विदेहभाव वसे तय वेळां । नसें व्यथांगहा मुखावरी ॥७२॥ जाणोनि मापुला निर्याणदिन | आदेश दिला शिष्यालागोन | नाम मनीं दृढ घरुन | पथ्य पळा अविचलित ॥७३॥ नुरली आस मम किंचित | नारायण नारायण म्हणत | उडून जातों आकाशांत एसें वदोनी देह ठेवी ।। ७४ ॥ नाम सततः सादर स्मरणें । नीतिनियम अखंड पाळणें । सत्संगासी सदैव सेविणें | भोगणे भगवदानंद ||७५ || हाचि बाबांचा दंडक | आचरुनि दाविला तो देख । करुन करवून अनेक उद्धरागति पैं नेले ॥७६ ॥ श्रीरामरायाच्या प्रेरणेने । कृष्ण सखयाच्या सहाय्याने | हार मनोहर गूंफी कवनें । अपितसे तो श्र. चरणीं ||७७|| O ✓ श्री रामभाऊ रानडे यांचे चरित्र सातवा समास १ ॐनमो जी गुरुदेवा । सच्चिदानंदा चित्सूर्या । आत्म- विद्येच्या आचार्या | मतिप्रकाश मज देई ||१|| माझिये हृदयी वसावें । आपुलें दिव्य दर्शन द्यावें । पावन चरित्र वदवावें । मज मतिमंदाकडोनी ||२|| जमखंडी पात्रन परम | होत नूतन क्षेत्रोत्तम | भूमंडळी ख्यातनाम । नाम- जन्माकारणें ||३|| पहिल्या कन्यंनतर जाण । बहुत दिन नसे अपत्यदर्शन | तेणें गुणें दुःख दारुण | पार्वती मातेस होतसे ॥ ४ ॥ रामेश्वराचे उपासन । आणि अखंड नाम स्मरण | अनन्यभावें करी जाण माता पूत्रापेक्षेनें ॥५॥ तंव तिची तपस्या फळली | पुत्ररत्न प्राप्ति झाली | माता कृतज्ञतेनें भरली | आनंदाश्रू ढाळत ||६|| रामेश्वर चा वरद पुत्र । म्हणोनि नांव रामचंद्र | रानडे कुल परम पवित्र | त्याच्या जननें जाहले | ७ || धन्य मातेचें उदर | जथे । 1 श्रीगुरुदेव रानडे जन्म ३-७-१८८६ जमखंडी समाधी ६-६-१९५७ निंबाळ पान:नित्यनेमावली.pdf/१७६ १३७ अवतरे भक्तवर | जेणें केला लोकोद्धार । भक्ति - प्रेमप्रसारें IIII प्रज्ञा, जिज्ञासा, विवेक | उपजत गुण हे अलौकिक | ध्या गुणें हा बालक । शाळेमध्ये तळपतसे ॥ ९ ॥ श्रीभाऊराव सद्गुरु समर्थ | जमखंडीस येत असत । भाविकासी उद्धरित । नाममंत्र देऊनी ।। १० ।। शके अठराशें तेविशी वैकुंठचतुर्दशीच्या शुभ दिवशी । नामबीज रामचंद्रासीं । श्रीभाऊरांयें दीधलें ||११|| एकदां रामें ऐकलें । सद्गुरु सहज जे बोलिले । परीक्षाही नामवळें । उत्तीर्ण होतां येईल ॥ १२॥ तव शालांत परीक्षा पातली । रामे मनोभावें तयारी केली | उत्तर पत्रिकाही लिहिली | उत्तम प्रकारें तयानें ॥१३॥ तव आठवे तया समर्थवचन । करूं लागला नामस्मरण । स्मरणीच्या माळा ओढ से जाण । नित्य भावें रामचंद्रे ॥१४ । पुढ परीक्षेचा निर्णय कळला | क्रमांक दुसरा मिळाला । जगन्नाथ शिष्य - वृत्तीचा ॥ लाभ झाला । सद्गुरुकृपे तेधवा १५ ।। सस्वर राममाऊ पुण्यनुरीस जात पुढील शिक्षणास दक्षिण असे "1 १३८ महाविद्यालय त्यास | विद्या केंद्र होतसे ||१६ बुद्धीची चमक अलौकिक । सुशील-सौरभही अमोलिक | संतुष्ट तेणें प्राध्यापक महाविद्यालयांत त्या ॥ १७॥ अध्ययन आणि | नामसाधन | दोन्ही चालिली समसमान पारमार्थिक अनुभव जाण । कांही लाभले ते समयीं ॥ १८ ॥ पुढे एके दिनीं जमखंडीत । श्रीसमर्थ अकस्मात । पोथी वाचण्या आज्ञापत | तरुण रामरायासी ॥१९ रामभाऊ अती संकोचले | आढेवेढे बहुत घेतलें । परी समर्थाच्या आग्रहामुळे । पोथी त्यांनी वाचिली || २० || पोथी - भजन झालियावरी | जवळील शिष्यां खोलीत पाचारी | श्रीसमर्थ तिथें अवसरी । एकांतीं बोलत तयासी ॥ २१ ॥ निवरगीनाथांचे नातू 1 त्या साधकामाजी असतु त्यांना संबोधूनि समर्थं । भविष्यचि सांगत ते वेळीं ॥ २२ ।। अगा तव आाजियाची कीर्ति | पसरेल साता सागरा वरती | अखिल भूमंडळा - वरती | तरुणाच्या या तपोबळें || २३ || याचा अहंभाव जावया | लाविले यास वाचावया | तुम्हांसी आश्चर्य 1 १३९ वाटावया । कारण कांहीं नसेचि ' ।। २४ | दिव्य भविष्य ऐकोनि सकळां । आनंद अत्यंतच जाहला प्रेमादर त्यांचा दुणावला | रामरायाविषयींचा ॥२५॥ २ पदवीधर झालियावरी। 'फेलो' होऊन सत्वरी | छात्रवर्गा बंधूदरी प्रेमळपणें वागवी ॥ २६॥ शेवटीं आचार्य 1. परीक्षेत | तत्वज्ञान विषय घेत । पहिला क्रमांक मिळवित | कुलपति सुवर्णपदकही ॥२७॥ परीक्षितांचे विषयज्ञान | अधिक असें परीक्षकाहून परीक्षकांची ही प्रशस्ती मिळवून धन्य धन्य ते जाहले ॥ २८ ॥ पुढे जाहले अध्यापक | मग होत प्राध्यापक नंतर ज्ञान शाखा प्रमुख । शेवटी होत कुलगुरू || २९ ।। एवं चढती वा ती पायरी | गुरुकृपे लाभे उत्तरोत्तरी । ऐंहिक वैभावाच्या शिखरीं विराजत आपुल्या बुद्धीबळें ॥ ३० ।। अध्ययनें बुद्धी फुलली । नामसाधनें प्रतिभा फांकली | अंतर्बाह्य पूर्णता लाभली १४० Hung प्राध्यापक रायतें ॥ ३१ ॥ पूर्णप्रज्ञाच्या अध्यापनें। स्फूर्ति- करणाचे विकिरण । आत्मबुद्धीचें विकसन । विद्यार्थ्यांचें होतसे ॥ ३२ ॥ परगुणपरमाणूचें कौतुक । अत्यंतची करीत देख । आत्मविश्वास पोषक त्यांचा प्रबोध होतसे || ३ || केवळ विद्यालयीन शिक्षण न देत त्या समाधान | या कारणें लोकशिक्षण देण्या यत्न करीतसे ३४ नव संस्था स्थापिल्या | व्याख्यानमाला गुंफिल्या दोन पत्रिकाही चालविल्या | ग्रंथ लिहिले अमोलिक ||३५ ।। बेंगळूरीं 'उपनिषद्रहस्य' | कालिकापुरीं 'वेदान्त रहस्य' नागपुरीं 'गीता रहस्य ' | विशद केलें गुरुरायें ||३६॥ पुढें नागपुरीं भरे तत्वज्ञान परिषद | अलंकारी अध्यक्षपद | आत्मतत्व- 1 दर्शन विशद । केलें आपुल्या भाषणीं ॥३७॥ संस्कृत ऋषिसाहित्यासमवेत | प्राकृत संत साहित्यही अभ्यासत 1 संत - संदेशही विवरित । बुद्धिवादास पटेलसा ॥३८ । - 1 ग्रंथ रचनाही अमोल | मांग्लभाषेत झाली सकळ | यांतः जागतिक दृष्टी विशालः गुरूवर्याची दिसतसे ॥ ३९ ॥ . १४१ वैभव आणि विपत्ती । एकासवे एक येती समतेचे धडे देती | वेळोवेळीं गुरुवरा ॥ ४० ॥ दोन दुर्धर आजार | दोनही महाभीकर | लोळविती मृत्युशय्येवर | बहुत दिन गुरुराया ॥ ४१ ॥ सद्गुरूकृपा प्रबळ | आणि नामनिष्ठाही सवळ | ओढून काढी त्या कराळ! मुखांतुनीं कालाच्या ॥ ४२ ॥ प्रियजनांचा वियोग | तोही एक दारूण योग । 4 jeug + दुखा:नळाची ती आग | हृदया त्यांच्या जाळीत ॥ ४३ || आधीं जात प्रियसुत । प्रिय पत्नी पुढे जात माताही निघत । परधामा जावया ॥ ४४ ॥ गुरूवयं एकाकी मागती 1 जाहले । देवाशींच सख्य वाढविलें । साधननिरत ते झाले । . । उत्कटते ते समयी ॥ ४५ ॥ पुढे समर्थ आज्ञेवरूनी । द्वितीय संबंध केला त्यांनी सत्वरचि कन्यारत्नीं । गुरुवर्यानां प्रसादिले ॥ ४६ ॥ असो, तीन तर्फे शिकवून | कुलगुरूपद अलंकारून । जागतिक लौकिक संपादुन | सेवा- निवृत ते झाले ॥ ४७ ।। १४२ ३ - । जिज्ञासा आणि सुवृत्ती | कामपूर्ति आणि दुखःनिवृति । उत्कट स्मरण आणि सत्संगति । गुरुकृपा साक्षात्कार ॥४८॥ हीं आठ साधनें जाण । परस्पर पोषणें वाढून ॥ गुरूवर्या चढविती पूर्ण | आत्मदर्शन - शिखरावरी ।। ४९ ॥ परमार्थ- प्राप्ति आणि प्रसार । हेंचि वाटे र्ज वनसार | आदर्श हा परम थोर । पूर्वीपासुन त्या प्रेरितसे ॥ ५० ।। अधि नामसाधन होतें सकाम । तेणें होय पूर्ण काम | वाढलें मग नामप्रेम | उत्कट नेम होतसे ॥ ५१॥ कामप्राप्तीसवें कांही । अनुभवही आले पाही । आश्चर्यानंद ते समई । गुरुवर्याना होतसे ॥ ५२|| तारे बहुरंगी चमकत | शेषांचे वेटोळे दिसत । होत असे अति चकित । नव साधक क्या योगें ॥५३॥ याच समयीं क्षयविकार | बळावलां अति दुर्धर । तेणें मृत्यूचेंही महाद्वार । कांही वेळा त्या दाविलें || ५४ ।। प्रकृतिमान श्रीसमर्था कळविलें | अनन्यभावें शरण गेले । १४३ कृपा कराया विनविले । सर्वभावें तयासी ।। ५५ ।। तात्काळ पावला समर्थप्रसाद । आणि पत्रद्वारें प्रबोध | त्याच्या . मातेनें सेवेनें ब्याधी दुख:द । ओसरली ती हळुहळु || ५६ ॥ नंतर भेटावया समर्थास । मातेसवें गेले इंचगिरीस निवेदिलें दुखा:स || समर्थचरणी तेधवा ॥ ५७ ।। ऐकोनि मातेची आर्त मात | बोलत सद्गुरु कृपावंत । चिंता न करिगे यांत | याची चिंता देव करी ॥ ५८ ।। साठ वर्षे रामरायास मरण भय नाहीं खास | मोठें देवकार्य यास | करावयाचें असतसे' ।। ५९ ।। समर्थाच्या या आशीर्वचने । आनंदली उभयतांचीं मनें । सद्गुरूसन्निधचि राहूनि । साधननिरत ते झाले । ६० || समर्थ मग निरोप निधला । सूचक संदेशही कळविला । अंतःकरणीं उत्तम ठसला | पुढील त्याचा प्रबोध ।। ६१ ।। नेणपणें जालें तें जालें । जालें ते होऊन गेले । जाणपणें वर्तलें । पाहीजें नेमस्त ||६२॥ आतां चांगले दिवस पाहाल | सुगंध वार्ताही ऐकाल । आनंद आनंद होत जाईल | भगवंताच्या कृपाबळे ॥ ६३ ।। ● जंव अवतार कार्य संपले | समर्थ तंव स्वानंदी बुडाले । परी शिष्यवृंदा लोटले | शोक सागरी अपार ।। ६४ ।। पुढे बांधले अध्यात्मभुवन | कट्टानें चालविले साधन | नित्य आठ तास नामस्मरण | गुरुआज्ञेनें करीत ते ॥६५॥ भुवनों असता एक दिन । झालें त्यासी हनुमंतदर्शन | तेज:पूंज तें रूप जाण । साश्चर्य त्यांनी पाहीलें ॥ ६६ ॥ या अनुभवा- ।। ।। नंदसवे | देह-व्यथा पुनरपि प्रसवे । नित्यगुरूरायास दुदेंवे । शीतज्वर ग्रस्त करी । ६७ ॥ आता सद्गुरूवीण नाहीं सोय | धरावे त्यांचेच पाय | ऐसा करूनि दृढनिश्चय | गुरूगृही ते पातले ।। ६८ ॥ श्रीवाबा आणि श्रीआक्का | श्रीसमर्थशिष्या अलौकीका । त्यांचे पावन सानिध्य देखा । उत्साहप्रद क्या होई ॥६९॥ तेणें त्याचें पारमार्थिक जीवन 1 उत्कर्ष पावो लागले जाण अनुभवही नित्य नूतन | लाभले त्या गुरूकृपे ।। ७०।1 एकदा ' नयनाचे नयन ! देखिले | आनंदचे भरते मालें । श्रीबाबांना तें कळविलें । त्यांनांही हर्ष हं तसे ।। ७१।। पुढे 'नामास नाम ' झालें । हेंही I १४५ । श्री बाबांना कळविलें । तव 'घट्ट धरावे नामचि पहिले ।' सानंद बाबा सांगत ॥ ७४ | पाहून हा अनुभव अनुपम । श्री वाबा सांगत देण्या नाम | परी स्वरांनीं विनयें परम । पायिकपण चालविले :। ७५ ।। एके दिनी ध्यानस्थ असतां । समर्थांचे शद्व कानी पडत । 'ते फूल घे ' ऐसे सांगत | तंव जागृत होई गुरुवर ||७६ || नित्याप्रमाणें समाधीस गेले । तेथे ताजे फूल एक पाहिलें | स्वप्नांतील फूलचि जाणिलें । घेतलें तें गुरुराये ||७७ || पुढे फूल तें वाळवलें । निक्ष्य अनसे सेविलें । दिव्यौषधं त्या सुत्रारले । प्रकृतिमान तयांचें ॥७८॥ प्रकृति सत्वर पूर्ववत् झाली । भातभाकरी पवू लागली | अनुभवांतही वाढ जाहली | आनंद तया । होतसे ॥ ७९ ॥ | पुनरपि कोणी एके दिनीं। बैसले होते ते ध्यानीं त्यासमयी गुरुवरांनी । धिप्पाड पुरुष पाहिला 11८०॥ निवरगीनाथांचा शिष्य सतेज | मुद्रा त्याची तेज:पुंज | निंबाळास गेलें महाराज | ऐसे त्यानें सांगितलें ॥३५१॥ तव गुरुराय तया विचारती | 'तेथेही वाढणार । १४६ काय भक्ति ? । ऐकोन रायाची ही प्रश्नोक्ति । शिष्यानें. त्या दटावले ||८२ || मिटोनि मुख कर्ण - नयन | उगाच करी नामस्मरण | इतुकें बोलोनि वचन | सवेंच अदृश्य - - C T 51 जाहला ||३|| गुरुराय स्वप्नांतून उठले | समाधीस जाऊन आले । तंव एका गृहस्थ पत्र दिधलें । त्यांच्या हाती तेधवा ॥८४॥ निवाळ स्थानका जवळी । स्नेहयानें होती जागा पाहिली | तिच्या अवलोकनार्थं त्यावेळी गुरुरायांना पत्रीं विनविले ॥८५॥ स्वप्नाचा उलगडा झाला । गुरुवर गेले निवाळाला | स्थळ नेमिलें तत्काळा। आश्रमाकारणें तेधवा ॥८६॥ पुढे आश्रम तेथें थाटला | वास्तुशांतींत नामसध्ताह केला। गुरुबंधु-भगिनींचा मेळा । जमला सप्त्याकारणें ।। ८७ ॥ तेव्हां अनुभवांचा आरास | जाईजुईचा सुवास | आनंदाचा हव्यास | आश्रमांत जाहला ॥८८|| 1 ४ सेविला जो दिव्य रस | वाटावया भक्तजनांस | १४७

  • सुगंधी | श्रीगुरुदेवास

समर्थ लाभली ॥ ८९ ।। 4 साध • सहका-यांशी मतभेद झाले । गुरुदेवें त्यागपत्र दिधलें । पुढें प्रयागाहून आमंत्रण आलें । स्वीकारले ते गुरूदेवें ।। ९ ।। विश्वविद्यालयाचें विशाल क्षेत्र प्राध्यापकाचे काम स्वतंत्र । परिसरही परम पवित्र | परमार्थानुकूल लाभला ॥९१।। प्रकृतीस प्रयाग मानत नही उत्तम चालत । अनुभव सा भरती येत स्वानंदी रतः सर्वदा ।। ९२।। जेय उज्ज्वल अनुभव येत । तेथ वारंवार नेमा जात । ऐसी स्थळे अनेक पुनीत। प्रयागपरिसरी त्या केलीं ॥ ९३॥ ऐसें एक स्थळ सुंदर || होतें द्रौपदी घाटावर खरीदून ते गुरुर निवास विशाल बांधित ॥ ९४ ।। प्रतीवर्षी उन्हाळयांत । गुरुदेव निंबाळां येत । तंव भक्तगण तेथे जमतः त्यांच्या सन्निध रहावया ।। १५ ।। नाम द्यावया अधिकार । आधींच लाभला होता थोर परी मुमूक्षूना गुरुवर | श्रीबाबांच्याकडेंच धाडत |९६॥ श्रीवात्रांच्या निर्माणानंतर समर्थ प्रेरणेनुसार ।। परीक्षून ते भक्तवरां ! नाम देऊं लागले ९७ । परी नाम C १४८ । । देण्याची पद्धत होतीं विलक्षण किचित | दोघा काकांच्या मार्फत नाम देत गुरुदेव || ९८ | नात्मारविंद्र उमळला । बामंत्रण मिळे अलिकुळाला | भाविक - वृंदतेथे धाडला | बोध - मकरंद सेवावया ॥ ९९ | झालियावरी सेवानिवृत्त । निवाळी गुरुदेव राहत । कांही काळ प्रयागांत । प्रतिवर्षी काढीत । १०० ।श्रीगुरुदेवांची 'बैठक' असे अत्यंत अलौकिक || बोधरत्ने तव अमोलिक | भाविकांना लाभत ||१०१।। होत मंडळी अति तल्लीन । न राहे वेळेचे भान | तासाचें तास जाण । केम्हां जात न कळे ॥ १०२|| ध्यानी जंत्र तल्लीन होत 'नारायण' | 'नारायण' ऐसे गर्जत । भावारूढ गुरुदेव दिसत | दिव्यतेजयुक्त भाविकां ॥ १०३ ॥ न कळे दिवस की राती । अखंड लागलीसे ज्योती आनंद- लहरीची त्यांची गति । अवर्णनीय असतसे ॥ १०४ कधीं आनंदल हरीवर डोलत । कधीं शांतिसागरी विश्रमत । परी निजस्थिती कळो न देत ! सामान्यापरी वागुनी ॥ १०५ ।। जीवन त्यांचे आत्मरत आश्मप्रेरित, आत्मभरित || H 2 १४९ १ आत्मानंदे उन्मत ध्यानी सदैव विलसती ॥ १०६ ।। 1 - गुरुदेव मायेवीण माहेर | विश्रांतीचें निजसार त्यांचें अभय आणि आश्रय थोर | भक्ता सदैव लाभत ॥ १०७॥ श्रीचा अमृतमहोत्सव । जन्मस्थळी झालां अपूर्व | जमखंडीकराचें सुदैवा फळा माले ते समयी ||१०८|| तीन दिवस होत उत्सव | गुरुदेवांचा गुणगौरव | नामसप्ताहही अपूर्व | रामतीर्थी जाहला १०९ ।। उत्सव समाप्त जाहल्यावर | गुरुदेव राहिले महिनाभर परमार्थ - प्रेमास आला बहार । श्रीच्या दिव्य सान्निध्यें ||११०IT गुरुदेव निंबाळा परतले । सत्वरचि प्रयागा गेले काही दिन आनंदे राहिले । स्वसदनी तेथल्या ॥ १११ पुढे वादळ जाहले थोर | वीज पडे जवळील घरावर | शीत बाधे त्यांना फार | कफाने छाती दाटली ||११२॥ किंचित बरें वाटल्यावर | परतले निवाळा गुरूवर 1 आणिले केवळ अस्थिपंजरा शरीराचे तेधवा ।।११३ “ मौतका डंका " वाजला ऐसे कळलें गुरुदेवांना | कफातिरेकें घसा बसलाा बोलता नये ते वेळी . १५० K. १.१४ ॥ शेवटचे पांच दिवस न शिवती: अन्नोदकास | परी कळो न देती अन्य कोणास आपुल्या कटुंबावाचुनी ॥ १.१५० । निर्वाण दिनीही नेमास गेले T गुरुगृहपथ न्याहाळोनी आले । कटुंबास खुणेने कळविले आपण " जाणार म्हणोनीं ॥११६॥ रात्रीचें भजन झालें । भारतीचें 2 D 1 1 तेंज निमालें । आंत शांतपणे तये वेळें । ज्योतींत ज्योत मिळतसे ॥ ११७॥ श्रीगुरुदेव महाथोर । चालता बोलता चमत्कार | मरणास मारून तें अमर । आत्मरूपीं निमाले ।।११८ ।। देवाकडून आले । ते देवाकडेच गेले । धन्य झाले धन्य केले | धन्य धन्य श्रीगुरुदेव ॥ ११९॥ ५ श्री गुरुदेवांचा परमार्थ-सोपान | पांच पाय-यांचा असे जाण । त्याचा पाया मानवी मनः । त्यावरी तो उभा असे ।। १२० ।। भाव, बुद्धि, इच्छा शक्ति का आणि प्रतिभा + १५१. 4 तयोचिया माथी ही चार अंगे असती। मानव-मनाची शाश्वत ||१२१॥ परमार्थ- प्रेरणेने भाव जागृती | सद्गुण- सेवने नीतिशक्ती । आत्मज्ञाने 'बौद्धिक शांती | ध्याने प्रतिभा विकसन ||१२२|| चारही परस्पर पोषक | परस्पर साह वाढत । सर्वाची परिणति आत्मदर्शनात । अंती स्वानूभवें होतसे ॥ १२३ ।। एवं विवेकयुक्त नीतिप्रधान । भावयुक्त नामस्मरण पूर्ण । आत्मसाक्षात्कार- संपन्न | भक्तियोग श्रीगुरुदेवांचा ॥१२४|| एवं | श्री गुरुदेव- मनोहर | याच्या चरितामृतसार ' गुरुदेव - प्रेरणेनें रचित - . सेवनें भाविक थोर | आश्मानंदी रंगीत ।। १२५ ।। [आतां. विश्वात्मकें देवे । येणें वाग्यज्ञे तोषावे ! तोषोनि मज द्यावें । पसायदान ॥१२६।। M ! 1 GAAAAAA==ch FERE १५२ दासबोध: दशक ४ था: समास ३ नामस्मरण भक्ति || श्रीराम || हरण मागां निरोपिलें किर्तन । जे सकळांस करी पावन । जातां ऐका विष्णोःस्मरण | तिसरी भक्ती ।। १ ।। देवाचें करावे | अखंड नाम जंपत जावें । नामस्मरण पावावे समाधान | ॥ २ ॥ नित्य नेम प्रातःकाळीं । माध्यानकाळी सायंकाळीं । नामस्सरण सर्वकाळी करीत जावे ॥ ३ ॥ सुखदुःख उद्धेग चिंता । अथवा आनंदरूप मतां नामस्मयनेंत्रिण सर्वथा । राहोंच नये ||४|| हरुषकाळी विषमकाळीं । पर्वकाळी प्रस्तावकाळीं ॥ विश्रांतिकाळी निद्राकाळीं । नामस्मरण करावें ।। ५ ।। कोडें सांकडे संकठ | नाना संसार खटापट 2 १५३ T आवस्था लागता चटपट | नामस्मरण करावे ॥ ६ ॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होता । नाना उपभोग भोगितां । नाम विसरों नयें ||७|| संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती । नामस्मरणाची स्थिती । सांडू च नये ॥ ८ ॥ वैभव सामर्थ्य आणि सत्ता । नाना पदार्थ चाखता । उत्कट भाग्यश्री भोगिता | नामस्मण सोडु नये । ९ ।। आधी अवदसा मग दसा अथवा दसे उपरी अवदसा । प्रसंग असो भलतासा | परंतु नाम सोडूं नयें ।। १० ।। नामें संकटे नासतीं । नामें विघ्नें निवारती । नामस्मरणें पाविजेती उत्तम पदे ॥ ११ ॥ भूत पिशाच्च नाना छंद | ब्रह्मगिरहो ब्राह्मणसमंध | मंत्रचळ नाना खेद । नामनिष्ठे नासती ॥ १२ ॥ नामें विषबाधा हरती नामें चेडे चेटकें नासती । नामें होय उत्तम गती । अंतकाळीं || १३ || बाळपणीं तारुण्यकाळी | कठीणकाळीं वृद्धाप्य- काळी । सर्वकाळीं अंतःकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४ ॥ १५४ नामाचा महिमा जाणे शंकर। जना उपदेशी विश्वेश्वर | वाराणशी मुक्तिक्षेत्र । रामनामे करुनी ॥ १५ ॥ उकराट्या नामासाठी । वाल्मिक तरला उठाउठीं । भविष्य वदला शतकोटी चरित्र रघुनाथांचे ॥ १६ ॥ 1 . 1 हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातांपासून सुटला । नारायणनामे पावन जाला । अजामेळ ।। १७ ।। नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले | महापापी तेचि झाले | परम पवित्र ।। १८ ।। परमेश्वराचीं अनंत "नामे । स्मरतां तरिजे नित्यनेमें नामस्मरण करिता येमें। बाधिजेना ।। १९ ।। सहस्र नामामधें कोणीयेक । ह्मणतां होतसे सार्थक नाम स्मरता पुण्यश्लोक | होईजे स्वये || २० || कांहीच न करुनि प्राणी । रामनाम जपे वाणी । तेणे संतुष्ट चक्रपाणी | भक्तालागी सांभाळी ॥ २१ ॥ नाम स्मरे निरंतर । ते जाणावें पुण्यशरीर | महादोषांचे गिरिवर । राम नामें नासती ॥ २२ ॥ अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन ¡ 1 ● + १५५ उद्धरला । हळहळापासून सुटला | प्रत्यक्ष चंद्रमौळी || २३ || चहुं वर्मा नामधिकार । नामीं नाहीं लहान- थोर | जड मूढ पैल पार | पावती नामें ॥ २४ ॥ ह्मणोन नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें । तिसरी भक्ति स्वभावें । निरोपिली ॥ २५ ।। । इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादें नामस्मरण भक्तिनाम समास तिसरा ।

    • 000€ १५६

।। श्री राम ।। ।। मागा जालें निरुपण | सातवे भक्तीचें लक्षण | आतां ऐका सावधान | आठवी भवती ॥ १ ॥ देवासी परम सख्य करावे । प्रेमप्रीत ने बांधावे | आठवे भक्तीचें जाणावे | लक्षण ऐसे || २ || देवास जयाची अत्यंत प्रती । आपण वर्तावे तेणें रीती | येणेंकरिता भगवंती | सख्य घडें नेमस्त || ३ || भक्ती भाव आणि भजन । निरूपण आणि कथाकीर्तन । प्रेमळ भक्तांचे गायन | आवडें देवा ॥ ४ ॥ आपण तैसेचि वर्तावे | आपणासि तेंच आवडावे | मनासारखे होता स्वभावे | सख्य घडे नेमस्त || ५ || देवाच्या सख्यत्वाकारणें । आपले सौख्य सोडून देणें । अनन्यभावे जीवे प्राणें । शरीर तेही वेचावे ॥ ६ ॥ सांडुन आपुली संसारव्यथा | करीत जावी देवाची चिंता । निरूपण कीर्तन कथा वार्ता | देवाच्याचि सांगाव्या || ७ || देवाच्या सख्यत्वा । १५७ साठीं । पडाव्या शेवटीं प्राण तोहि जिवलगांसी तुटी । सर्वं अर्पावें वेंचावा || ८ || आनुलें आवघेंचि जावें । परी देवासी सरूप राहावे । ऐसी प्रीती जीवें भावें । भगवंती लागात्री ।। ९ ।। देव म्हणिजे आपुला प्राणामि न करात्रें निर्वाण । परम प्रीतींचें लक्षण । ते हे उसे असें ।। १० ।। ऐसे परम सख् धरिता | देवास लागें भक्तांची चिता | पांडव लाखा- प्राण । - 0 जोहरीं जळतां । विवरद्वारें काढिले | ११ ॥ देव सख्यत्व राहे आपणासी । तें तों वर्म आपणाचि पासीं । आपण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येती पडसादें ।। १२ आपण असतां अनन्यभावें । देव तात्काळचि पावे | आपण त्रास घेतां जीवें । देवहि त्रासे ।। १३ ।। श्लोक || ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहम् || जैसे जयाचें भजन । तैसाचि देवही आपण | म्हणौन हें आवघें जाण । आपणांचि पासीं ॥ १४ ॥ आपुल्या १५८ तरी मनासारिखे न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे । गोष्टी आपणाकडे सहजचि आली ॥१५॥ मेध चातकावरी वोळेना । तरी चातक पालटेना | चंद्र वेळेसि उगवेना । तरी चकोर अनन्य ।।१६।। ऐसे असावे सख्यत्व विवेके धरावे सत्य | भगवंता- वरखेल ममत्व | ममत्व | सांडूचि नये ||१७|| सखा मानावा भगवंत । माता पिता गणगोत । विद्या लक्ष्मी धन वित्त । सकळ परमात्मा ||१८|| देवावेगळे कोणी नाहीं । ऐसे बोलती सर्वही । परंतु त्यांची निष्ठा कांही । तैसीच नसे ||१९|| म्हणोनि ऐसे न करावे | ।।१९।। सख्य तरी खरेंचि करावे। अंतरी सदृढ धरावे । मनोगताकारणें । परमेश्वरासी ||२०|| आपुलिया देवावरी कोघास येणें । ऐसी नव्हेत ही लक्षणें 1 सख्यभक्तीचीं ॥२१॥ देवाचें जे मनोगत । तेचि मापुलें उचित । इच्छेसाठीं: भगवंत । अंतरूं नये की ||२२|| देवाचे इच्छेने वर्तावे | देव करील तें M १५९ 1 मानावे । मग सहजचि स्वभावे | कृपाळू देव ||२३| पाहातां देवाचे कृपेसी | मातेची कृपा कायेंसी माता वधी बाळकासी । विपत्तिकाळीं ॥ २४ || देवें भवत कोण वधिला | कधी देखिला ना ऐकिला | शरणा- गतांस देव जाला । वज्रपंजरू ॥ २५ ॥ देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसि तारी । देव होये साहाकारी । अनाथांचा ॥ २६ ॥ देव अनःथांचा कैंपक्षी संकटांपासून रक्षी । धांवन्निला कारणें ।। २७ ।। देव कृपेचा जळधरु | देवासि भक्तांचा नाना अंतरसाक्षी गजेंद्रां- । सागर । देव करुणेंचा विसरु | पडणार नाहीं ।। २८ ।। देव प्रीती राखों जाणे । देवासी करावें साजणें । जिवलगें आवधीं पिसुणें । कामा न येती ।। २९ || सख्य देवाचे तुटेना । प्रिती देवाची क्टेिना | देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३० ॥ ह्मणोनि सख्य देवांसी करावें। हितगुज तयांसी सांगावे "आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसे ॥ ३१ ॥ जैसा 1 3 १६० देव तैसा गुरु | शास्त्री बोलिला हा विचार | म्हणौन' सख्यत्वाचा प्रकारु । सद्गुरूसीं असावा ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सख्य भक्तिनिरूपणं नाम समास आठवा. श्रीरामदासांचे || मनाचे श्लोक ॥ श्री राम गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा | मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा | नमुं शारदा मूळ चत्वार वाचा गमूं पंथ आनंत या राघवाचा 7 ।। १ ।। मना सज्जना भक्तिपंथेंचि जावे । तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे । जनीं निंद्य तें सर्व सोडोनि द्यावे । जनीं वंद्य तें सर्व भावे करावें ॥ २॥ 10 प्रभाते मनीं राम चिंतीत जावा | पुढें वैखरी राम आधीं वदावा | सदाचार हा थोर सांडू नये तो । जनी तोचि तो मानवी धन्य होतो ॥ ३ ॥ मना वासना दुष्ट कामा नये रे । मना सर्वथा पापबुद्धि नको रे । मना धर्मता नीति सोडू नको हो । मना अंतरी सार वीचार राहो ॥ ४॥ मना पाप संकल्प सोडूनि द्यावा मना सत्यसंकल्प जींवीं धरावा ल १६२ मना कल्पना ते नको विषयांचीं। विकारे घडे हो जनीं सर्व ची चीं नको रे मना क्रोध हा खेदकारी । नको रे मना काम नाना विकारी | नको रे मना सर्वदा अंगीकारू । नको रे मना मत्छरू दंभ भारू मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवीं धरावें । मना बोलणें नीच सोसीत जावें । स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे मना सर्व लोकांसि रे नीववावे देहे त्यागितां कीर्ति मागें उरावी । मना सज्जना हेचि किया धरावी | मना चंदनाचे परी त्वां झिजावे । परी अंतरी सज्जना नीववावें ॥६॥ ॥७॥ ||८|| नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे । अती स्वार्थबुद्धी न रे पाप सांचे । घडे भोगणें पाप तें कर्म खोटे । न होतां मनासारिखे दुःख मोठे सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी दुखाची स्वयें सांडि जीवीं करावी | देहेदुःख हें सूख मानीत जावें । विवेकें सदा स्वस्वरूपीं भरावें ॥ ९ ॥ ॥१०॥

अकॅडमी ऑफ कंपेरेटिव्ह फिलॉसॉफी ॲन्ड रिलीजन
बेळगाव.


 बेळगांव येथील राणी पार्वतीदेवी कॉलेजला लागूनच सांगलीचे राजेंसाहेब, श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन यांची खासगी जमीन होती. त्यापैकी कांही भाग कॉलेजचे क्रीडांगणाकरिता मिळावा म्हणून कॉलेजच्या व्यवस्थापक मंडळाने १९४९ साली श्रीमंत राजेसाहेबांच्याकडे विनंती केली. पण या सर्व जमिनीबद्दल कांही तांत्रिक वांधा असल्यानें श्रीमंत राजेसाहेबांनी जमीन आपल्या मालकीची नाहीं असें कळविलें. याच सुमारास श्री जगन्नाथराव परुळेकर यांची अलिबागहून चिकोडी विभागाचे प्रांत ऑफिसर म्हणून बदली झाली आणि त्यांचेकडून ही जमीन श्रीमंत राजेसाहेवांच्या खासगी मालकीची आहे असे कॉलेजच्या चालक मंडळाला कळले. नंतर ही सर्व मंडळी श्रीमंत राजसाहेबांना सांगली येथे प्रत्यक्ष भेटली आणि श्रीमंतानी याबाबतीत विचार करून कळवितो असे श्री परळेकराना सांगितले. त्याचवेळी श्री. गुरुदेव रानडे यांचा मुक्काम, सांगली येथे राजेसाहेबांच्या माळ बंगल्यावरच होता. श्री. परुळेकर यांची व श्री. गुरुदेवांची भेट झाली आणि श्री गुरुदेवांनी श्री परुळेकर यांचेवर अनुग्रह केला, त्यांना नाममंत्र दिला आणि नंतर श्री परुळेकरानी सांगली सोडली.

 पुढे महिनाभरांतच श्रीमंत राजेसाहेबांनी तारेने श्री. परुळेकर याना भेटीस बोलाविलें. कै. बाबुराव ठाकूर, श्री वसंतराव हेरवाड़कर वगैरे कॉलेजची चालकमंडळीही त्यांचेवरोबर सांगलीस गेली. तेथे राजेसाहेबांच्याबरोबर चर्चा होऊन जमींनीचे बाबतीचा वांधा नाहीसा करण्याचे श्री. परुळेकर यानी श्रीमंत राजेसाहेबांचेकडे मान्य केले. नंतर लगेच कॉलेजकरतां अजमासे चार एकर जमीन राजेसाहेबांनी देणगी म्हणून दिली. त्याच सर्व्हे नंबरपैकी आणखी उरलेली जवळजवळ १२ एकर जमीन काय करू असा प्रश्न श्रीमंत राजेसाहेबांनी केला. ही जमीन श्रीगुरुदेव रानडे यानां देण्यात यावी असें श्री. परूळेंकर यानी सुचविले आणि ही विनंती मान्य करून श्री. राजेसाहेबानीं ती जमीन श्री गुरूदेवांना दिली. त्याप्रमाणे बेळगावच्या कलेक्टरना आक्टोबर १९५० मध्ये कळविण्यात आले.

 पुढें मार्च १९५२ मध्ये श्रीमंत राजेसाहेबानीं बेळगाव येथे या देणगीबद्दल जरूर ते कागदपत्र नोंद करून दिले. नंतर लगेच श्री गुरूदेवानीं या जमिनीबद्दल एक सार्वजनिक विश्वस्थनिधी ( Public Trust ) नोंद करून, त्या संस्थेस “अकॅडेमी ऑफ कंपॅरेटिव्ह फिलॉसॉफी अन्ड रिलीजन, बेळगांव " असे नांव दिलें. आपण स्वतः त्या संस्थेचें ट्रस्टी झाले आणि संस्थेचें ध्येय व उद्देशही त्यानींच खालील प्रमाणें ठरवून टाकले.

(A) To work for the spiritual unity of mankind and consequent peace and goodwill upon earth, bringing together intellectual and spiritual ...minded persons through (1) spiritual, symposiums ( 2 ) study and research, ( 3 ) Lectures, ( 4 ) Meeting and conferences and (5) Religious and philosophical publications.

 श्री. गुरूदेवांचें इतर कार्यामुळे आणि प्रकृतीही इतकीशी चांगली नसल्यामुळे त्यांचे हयातीत या संस्थेकडून कांहीं कार्य झाले नाहीं. तारीख ६-६-१९५७ रोजी श्री गुरुदेवांचे निर्माण झाले त्यांनंतर श्रीमंत राजेसाहेबांच्या सल्यानें बेळगांव येथील डिस्ट्रिक्ट जज्ज यांचेकडे नवीन, ट्रस्टी नेमण्याकरतां अर्ज करणेत आला आणि डिस्ट्रिक्ट जज्जानीं, १) श्री गणपतराव उर्फ काकासाहेब तुळपुळे, २) कृष्णराव उर्फ कृष्णराव उर्फ बाबासाहेव संगोराम, ३) श्री विठ्ठलराव जमखंडी, ४) श्री. जगन्नाथ राव परुळेकर व श्री के आर रानडें, या पांच जणांना ट्रस्टी म्हणून नेमले.

१९६२ नंतर हा हुकुम झाला. त्यानंतर लगेच सांगली येथें श्रीमंत राजेंसाहेबांचे वाड्यावरच या ट्रस्टींची पहिली, सभा झाली आणि श्रीमंतांचे सुचनेवरून श्री. तुळपुळे यांना चेअरमन व श्री. परुळेकर याना सेक्रेटरी नेमण्यात आले.

 या ट्रस्टनीं त्यानंतर कामास लगेच सुरवात केली. एप्रिल १९६४ मध्ये "गुरुदेव मंदिर" या इमारतीचा पाया नामदार बी. डी. जत्ती ( भारताचे भूतपूर्व उपाध्यक्ष ) यांच्या हस्ते घालण्यात आला. इमारत पूर्ण झाल्यावर तारीख ८-१२-१९६५ रोजी त्यावेळचे भारताचे अध्यक्ष कै. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले. या भव्य व सुंदर इमारतीमध्ये गुरुदेवांच्या पादुकांची स्थापना केली आहे. साधकांच्याकरता राहण्यास खोल्या आहेत आणि प्रवचनें, व्याख्या कीर्तने वगैरे कार्यक्रमाकरता मोठा हॉलही आहे. संस्थेच्या उद्देशास अनुसरुन लगेच १९६६ साली " पाथवे टु गॉड " (Pathway to God )


श्री गुरुदेव महाराज यांच्या पादुका
बेळगांव


हे इंग्रजी नियत कालिक सुरु करण्यांत आले. आता ते त्रैमासिक ह्मणून निघत आहे.

श्रीं गुरुदेवांच्या स्मरणार्थ एक वार्षिक व्याख्यानमालाही सुरु करण्यात आली आहे. त्या मालेतील व्याख्यात्याला अनुदान मिळते आणि ही व्याख्याने ग्रंथरूपाने प्रसिद्ध केली जातात. वेळोवेळी परीसंवादही घडवून आणले जातात आणि त्यावेळी वाचलेंले निबंधही छपून प्रसिद्ध केले जातात. याशिवाय वेळोवेळी प्रवचनें वगैरे कार्यक्रमही होत असतात. आतापर्यंत या संस्थेने ३२ पुस्तके प्रसिद्ध केली आहेत. वाचकवर्गाकरता एका ग्रंथालयाची व्यवस्था असून तेथें आता जवळ जवळ दहाहजार ग्रंथ उपलब्ध आहेत. प्रतिवर्षी वैकुंठचतुर्दशीस नामसप्ताहही साजरा होत असतो. त्याच प्रमाणे दरवर्षी श्री गुरुदेवांची पुण्यतिथीही साजरी केली जाते, प्रसंगानुसार इतर पारमार्थीक कार्यक्रमही होत असतात.

 शंभर रुपयें एकदम भरुन, " पाथवे टु गॉड " चें कायम वर्गणीदार असे आजमितीस १३० जण झाले आहेत. त्यांना आता विनावर्गणी हे त्रैमासिक मिळते. प्रत्येकी ३०० रु. देऊन या संस्थेचे तहहयात ( Life member ) असे आजमितीस १०१ समासद झाले आहेत; त्यांना संस्थेंचे त्रैमासिक विनावर्गणी मिळून दरवर्षी प्रसिद्ध प्रसिद्ध होणारी पुस्तकें ही विनामूल्य मिळतात. शिवाय ५०० रु. हून अधिक रक्कम देणगी रुपानें देऊन आश्रय दाते ( Donor ) असलेल्यांची संख्या ७५ आहे. त्याना तहहयात सभासदाप्रमाणें सर्व सवलती मिळतातच आणि त्याशिवाय त्यांच्यातर्फे ट्रस्टी म्हणून एक इसम निवडला जावून, तो व्यवस्थापनामध्येही भाग घेत असतो. किरकोळ देणगी देणाऱ्यांची संख्याही चांगलीच आहे. अशा रीतीनें जनतेकडून सहकार्य मिळत आहे आणि संस्थेच्या उद्देशास अनुसरून हळू हळू कार्य वाढत चालले आहे.

 श्री. काकासाहेब तुळपुळे यांच्यासारख्या श्रेष्ठ साधकांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे कार्य पहिल्यापासूनच व्यवस्थितपणें चालू होते. परंतु त्यांच्या प्रकृतीच्या अनानुकूलतेमुळे ते या कार्यातून १९७७ साली निवृत्त झाले. व त्यांचे मे १९८२ साली निधन झाले. त्यानंतर श्री बाबासाहेव संगोराम यांची अध्यक्ष पदी निवड झाली. नोहेंबर १९८३ मध्ये त्यांचेही निधन झाले व आता श्री जगन्नाथराव परुळेकर हे या संस्थेचें अध्यक्ष आहेत, आणि त्यांचे मार्गदर्शनाखाली काम चालू आहे. या संस्थेमार्फत आपल्या पारमार्थिक तत्त्वज्ञानाचा प्रसार सर्व जगभर होईल असे श्री. गुरुदेव ह्मणत असत. साक्षात्कारी संतांचे शब्द यथाकाल खरे होणारच, अशा धारणेनुसार संस्थेचे कार्य चालू आहे.

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ॥
गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोड़ी |
न लगे मुक्ती धनसंपदा । संतसंग दे गा सदा ॥

तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी |
शुद्धिपत्रक (ठळक)
पान ओळ अशुद्ध शुद्ध
भाग २

१५
५५
६०
६२
६८
७५
१००
११०
११२
११३
१२९
१३७
१४१
१४३
१४५
१५२

१४
११
११

१४

१५

१६

१५
१३

१६


सुरमरा
नभ्रभावा
सम्दावित
ध्याळकू
जुपती
म्हली जात
इच्छहार
श्रष्ठ
मी काढू पणाते
बुध
सावळसंर
पुढ परीक्ष
पनी
शुद्ध
आनंद
रवरानी
नामस्सरण

सुरवरा
नम्रभावा
सद्भक्ति
व्याकूळ
जुत्पती
म्हटली जात
इच्छाहार
श्रेष्ठ
मी पणाते काढून
बद्ध
सांवळसंग
पुढे परीक्षेचा
पत्नी
आनंदी
गुरुवरानी
नामस्मरण

आमची कांही प्रकाशनें

१) श्री गुरुदेव रानडे- प्रा. भा. र. मोडक व सौ. वसुधा मोडक ३-००

२) गुरुदेव रानडे व त्यांची पारमार्थिक शिकवण. श्री काकासाहेब तुळपुळे १५-००

३) ज्ञानेश्वराचे चरित्र. रा. ना. सराफ ८-००

४) श्री ज्ञानेश्वराचे आत्मदर्शन अर्थात कार्य आणि तत्वज्ञान रा. ना. सराफ ४०-००

५) श्री समर्थ रामदास जीवन आणि तत्वज्ञान ३०-००

६) भारतीय समकालीन दर्शन में प्रो. रानडे का योगदान का समिक्षात्मक अध्ययन हिंदी ३५-०० डॉ. जटाशंकर त्रिपाठी कापडी बायडिंग ४०-०० एकाच वेळी रु. ६० ची पुस्तके घेणाऱ्यास २० टक्के कमिशन देवू व टपाल खर्च आम्ही करु.

Academy of Comparative Philosophy and
Religion, Belgaum: - A Public Trust.
Founder:- Gurudev Dr. R. D. Ranade


We Publish -

Pathway to God

A Quarterly Journal

(October : January. April, July )

Annual subscription :-
Bharat Rs. 12/- Foreign 35/