पान:'भारता'साठी ('Bharata'sathi).pdf/298

हे पान प्रमाणित केलेले आहे.

त्यांनी भारतीय प्रजासत्ताकाची उतरंड केन्द्र आणि राज्य इतपतच मर्यादित ठेवली होती. राजीवजींच्या घटनादुरुस्तीमुळे आता केन्द्र, राज्य, जिल्हा, तालुका, आणि गाव अशी उतरंड तयार झाली. राजकीय दलालांवर तोफ डागणाऱ्या तरूण पंतप्रधानाला त्यानंतर लगेचच बोफोर्स तोफाप्रकरणी दलाली खाल्ल्याच्य आरोपास सामोरे जावे लागले. विश्वनाथ प्रताप सिंह यांनी त्यावेळी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पर्यायी पक्ष स्थापण्याचा जबरदस्त प्रयत्न केला. राजीवजींचा अखेरचा काळ बोफोर्सच्या बालंटातून सुटावे कसे आणि क्वात्रोचीचा कलंक झटकून कसा टाकावा याची चिंता करण्यातच गेला.

 पंजाबमधील अतिरेकी कारवायांना पाकिस्तानचा पाठींबा आहे, ईशान्येतील आदिवासी बंडखोरांना सरहद्दीवरील आणि इतर ख्रिश्चन धर्मीयांचा पाठींबा आहे तोपर्यंत ही बंडाळी शमणारी नाही; पण, त्याविरूद्ध तक्रार करण्याचा हक्क, जोपर्यंत तामीळवाघ श्रीलंकेचा तुकडा तोडून मागत आहेत तोपर्यंत मिळणार नाही अशा भावनेने दुसऱ्या देशात भारतीय लष्कर पाठवण्याची कुबुद्धी राजीवजींना झाली. त्यांनी श्रीलंका लष्कराचाही राग ओढवून घेतला. एका औपचारिक कवायतीच्या वेळी एका श्रीलंकन सैनिकाने भर कवायतीत रायफलचा दस्ता राजीवजींना मारला; पण,खरी नाराजी होती ती तमीळ वाघांची. भारतात निवडणुका चालू असतांनाच पहिली निवडणुकीची फेरी काँग्रेसच्या विरूद्ध गेली असतांना तमीळ वाघांच्या एका आत्मघाती मुलीने राजीवजी आणि त्यांचे साथी यांच्या चिंधड्या उडवून दिल्या. या हत्येविषयी चौकशी झाली, खटले चालले, दोघातिघांना फाशीची शिक्षा झाली; पण, अद्यापही त्यांना फासावर चढवण्यात आले नाही हे पाहता राजीवजींची हत्या घडवण्यामागे काही भारतीय संदर्भही असावा असे अनेक जाणकारांचे मत आहे.

 एकदा सुरू झालेली निवडणुकीची प्रक्रिया थांबवता येत नाही; पण, शेषन साहेबांनी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका पुढे ढकलल्या आणि दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसला लोकसभेच्या अनेक जागा जिंकता आल्या. तरीही राजीव गांधींविरूद्ध बंड उभारतांना विश्वनाथ प्रताप सिंह यांनी केवळ बोफोर्स दलालीचाच प्रश्न उठवला नव्हता; काँग्रेसमध्ये जन्म काढलेल्या राजासाहेबांनी नव्या स्वातंत्र्याच्या पहाटेची ललकारी दिली. राजीवस्त्राविरुद्धच्या शेतकरी आंदोलनास उचलून धरले, एवढेच नव्हे तर शेतकरी आंदोलनाने कर्जमुक्तीसाठी चालवलेल्या आंदोलनास महत्त्वाचे स्थान दिले. निवडणुकीतून सत्तेवर आलो तर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याखेरीज राहणार नाही असे त्यांनी वारंवार छातीवर हात

भारतासाठी । २९८