हे पान प्रमाणित केलेले आहे.

मन:स्थितीतून सावरण्यासाठी माझ्या मदतीला अंदमानच्या तुरुंगातले सावरकर आले. सकाळ होईपर्यंत सावरकरांच्या -


की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने
लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने
जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे
बुद्ध्याचि वाण धरिले करी हे सतीचे

आणि

आले शिरावरी जरी घनघोर झाले
दारिद्र्य दु:ख अपमानही प्राप्त झाले
कारागृही जरी सतत वास करी मी
पूजिन मी सतत मन्मयमातृभूमि

 या दोन काव्यांनी मला फाशीच्या कोठीमध्ये वास्तवतेला सामोरं जाण्याचं धैर्य दिलं.


 'साहित्यामध्ये जगणं' आणि 'साहित्यामध्ये व्यक्त करणं' या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. साहित्यिक मंडळींनी रागावू नये; पण मला काही वेळा संशय येतो, की ज्यांची संवेदन क्षमता तीव्र असते त्यांना साहित्य तयार करता येत नसावं. थोडंसं आडूनआडून ज्याला दु:ख सोसता येतं, पाहता येतं तो त्याचं सुंदर काव्यामध्ये रूपांतर करू शकतो. कवी जळतो असं म्हणतात; पण ज्यांच्या मनामध्ये दु:ख सोसण्यासाठी संरक्षणाचं कवच नसतं अशी भस्म होणारी माणसंच काव्य बाजूला ठेवून काही काव्य जगायचा प्रयत्न करतात की काय असा मला संशय येतो.

 या संमेलनाच्या निवेदकांनी आता म्हटलं, की हे तिसरं संमेलन झालं, पुढे चौथं व्हायचं आहे. ऐकून मला आनंद झाला. कारण पुढच्या वर्षापर्यंत तरी मराठी भाषा टिकणार आहे अशी आशा निर्माण झाली. या संमेलनाचे अध्यक्ष श्री. द.पं. जोशी यांच्या भाषणाचा वृत्तांत वर्तमानपत्रात वाचला. त्यांची चिंता, की 'चौथं, पाचवं, सहावं' अशी संमेलनं होतच राहतील. अर्थात साहित्य संमेलनं भरवायला साहित्य शिल्लक राहिलंच पाहिजे अशी काही आवश्यकता नाही. संमेलनं भरवायला काय हरकत आहे?' पण, काही मुद्द्यांवर माझा काही वेगळा विचार आहे. तो मी आपल्यापुढे नम्रपणे मांडू इच्छितो.

 मी काही केवळ शेतकरी नेता नाही. किंबहुना, मी खरा शेतकरी नाहीच. मी नेहमीच सांगत असतो, की मी जोशी आडनावाचा म्हणजे माझा जन्म ब्राह्मण घरचा आहे; पण

अंगारमळा । १३५