या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४० | १६ नोव्हेंबर १९८३ | पंढरपूर येथे 'विठोबाला साकडे' मेळाव्यात कृषिमूल्य आयोग बरखास्तीची मागणी |
४१ | १२ मार्च १९८४ | चंडीगढ येथील राजभवन वेढा सुरू. इतर राज्यांतील प्रतिनिधींसह एक लाख शेतकरी सहभागी. |
४२ | १८ मार्च १९८४ | चंडीगढच्या परेड ग्राउंडवर विजयोत्सव |
४३ | २७ मे १९८४ | संघटनेची पहिली कार्यकारिणी नाशिक येथे स्थापन |
४४ | २ ऑक्टोबर १९८४ | गुजरात व महाराष्ट्रभर प्रचारयात्रा सुरू |
४५ | ३१ ऑक्टोबर १९८४ | टेहेरे येथे यात्रासमारोप, तीन लाख शेतकऱ्यांचा मेळावा. |
४६ | २२ नोव्हेंबर १९८४ | पुणे येथील बैठकीत राजकीय भूमिकेवर निर्णय |
४७ | २१ जानेवारी १९८५ | धुळे अधिवेशन, सर्व राजकीय पक्षांना शेतीमाल
भावाविषयी भूमिका मांडण्यासाठी निमंत्रण. |
४८ | २ ऑक्टोबर १९८५ | राजीवस्त्रविरोधी आंदोलन सुरू. महाराष्ट्रभर एकूण
२५० ठिकाणी राजीवस्त्रांची होळी. |
४९ | ६ ऑक्टोबर १९८५ | राहुरी येथे उस परिषद. चरणसिंग, शरद पवार, प्रमोद महाजन इत्यादि राजकीय नेत्यांची हजेरी. |
५० | १२ डिसेंबर १९८५ | मुंबई येथे दत्ता सामंत यांच्यासमवेत पहिला शेतकरी कामगार मेळावा. राजीवस्त्रांची जाहीर होळी. |
५१ | २३ जानेवारी १९८६ | आंबेठाण येथे असताना हृदयविकाराचा पहिला झटका |
५२ | २ ऑक्टोबर १९८६ | अकोला येथे कपास किसान संमेलन |
५३ | ९ नोव्हेंबर १९८६ | चांदवड येथील पहिले महिला अधिवेशन. खुल्या अधिवेशनात तीन लाख महिलांचा सहभाग. |
५४ | ७ डिसेंबर १९८६ | राजीवस्त्रांवर 'ठप्पा मारो' आंदोलन. हुतात्मा बाबू गेनू स्मृती सप्ताह सुरू. |
५५ | १० डिसेंबर १९८६ | कपाशी आंदोलनात सुरेगाव, जिल्हा हिंगोली, येथे पोलीस गोळीबारात तीन शेतकरी ठार |
५६ | १२ डिसेंबर १९८६ | वर्धा येथील रेल रोको. विदर्भात ६०,००० तर मराठवाड्यात ३०,००० शेतकरी तुरुंगात. |
५७ | १५ फेब्रुवारी १९८७ | २५,००० शेतकरी मुंबईतील चौपाटीवर दाखल. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन. |
अंगारवाटा... शोध शरद जोशींचा ■ ४९९