पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४०   १६ नोव्हेंबर १९८३ पंढरपूर येथे 'विठोबाला साकडे' मेळाव्यात कृषिमूल्य आयोग बरखास्तीची मागणी
४१ १२ मार्च १९८४ चंडीगढ येथील राजभवन वेढा सुरू. इतर राज्यांतील प्रतिनिधींसह एक लाख शेतकरी सहभागी.
४२ १८ मार्च १९८४ चंडीगढच्या परेड ग्राउंडवर विजयोत्सव
४३ २७ मे १९८४ संघटनेची पहिली कार्यकारिणी नाशिक येथे स्थापन
४४ २ ऑक्टोबर १९८४ गुजरात व महाराष्ट्रभर प्रचारयात्रा सुरू
४५ ३१ ऑक्टोबर १९८४ टेहेरे येथे यात्रासमारोप, तीन लाख शेतकऱ्यांचा मेळावा.
४६ २२ नोव्हेंबर १९८४ पुणे येथील बैठकीत राजकीय भूमिकेवर निर्णय
४७ २१ जानेवारी १९८५ धुळे अधिवेशन, सर्व राजकीय पक्षांना शेतीमाल

भावाविषयी भूमिका मांडण्यासाठी निमंत्रण.

४८ २ ऑक्टोबर १९८५ राजीवस्त्रविरोधी आंदोलन सुरू. महाराष्ट्रभर एकूण

२५० ठिकाणी राजीवस्त्रांची होळी.

४९ ६ ऑक्टोबर १९८५ राहुरी येथे उस परिषद. चरणसिंग, शरद पवार, प्रमोद महाजन इत्यादि राजकीय नेत्यांची हजेरी.
५० १२ डिसेंबर १९८५ मुंबई येथे दत्ता सामंत यांच्यासमवेत पहिला शेतकरी कामगार मेळावा. राजीवस्त्रांची जाहीर होळी.
५१ २३ जानेवारी १९८६ आंबेठाण येथे असताना हृदयविकाराचा पहिला झटका
५२ २ ऑक्टोबर १९८६ अकोला येथे कपास किसान संमेलन
५३ ९ नोव्हेंबर १९८६ चांदवड येथील पहिले महिला अधिवेशन. खुल्या अधिवेशनात तीन लाख महिलांचा सहभाग.
५४ ७ डिसेंबर १९८६ राजीवस्त्रांवर 'ठप्पा मारो' आंदोलन. हुतात्मा बाबू गेनू स्मृती सप्ताह सुरू.
५५ १० डिसेंबर १९८६ कपाशी आंदोलनात सुरेगाव, जिल्हा हिंगोली, येथे पोलीस गोळीबारात तीन शेतकरी ठार
५६ १२ डिसेंबर १९८६ वर्धा येथील रेल रोको. विदर्भात ६०,००० तर मराठवाड्यात ३०,००० शेतकरी तुरुंगात.
५७ १५ फेब्रुवारी १९८७ २५,००० शेतकरी मुंबईतील चौपाटीवर दाखल. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ठिय्या आंदोलन.

अंगारवाटा... शोध शरद जोशींचा ■ ४९९