पान:अंगारवाटा...शोध शरद जोशींचा (Angarwata…Shodh Sharad Joshincha).pdf/५२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२  १३ मार्च १९९५ हिंगणघाट (वर्धा) व बिलोली (नांदेड) येथून विधानसभा निवडणुकीत पराभूत.
७३ ८ एप्रिल १९९५ हैदराबाद येथे ॲन्जिओप्लास्टी
७४ १० डिसेंबर १९९५ कापूस एकाधिकार खरेदीच्या विरोधात स्वातंत्र्य यात्रा. नरखेड येथे समारोप व तेथून मध्य प्रदेशातील पांढुर्णामार्गे कापूस सीमापार आंदोलन.
७५ १४ डिसेंबर १९९५ औरंगाबाद येथे ऊस झोनबंदी विरोधात उपोषण सुरू.
७६ २७ एप्रिल १९९६ नांदेड लोकसभा मतदार संघातून लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी. पराभूत.
७७ ४ एप्रिल १९९७ पंजाब व हरियाणामधील गव्हाच्या भावाचे आंदोलन.
७८ ९ ऑगस्ट १९९७ 'Q' आंदोलन सुरू. 'नोकरदार चले जाव', 'भ्रष्टाचार चले जाव'
७९ ५ जून १९९८ इस्लामपूर (सांगली) येथे शेतकरी संघटनेतर्फे आयोजित ग्रामीण साहित्य संमेलन
८० १० डिसेंबर १९९८ स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त अमरावती येथे जनसंसद सुरू
८१ २० डिसेंबर १९९८ पुण्याहून दिल्लीला जाताना विमानातच अर्धांगवायूचा झटका. शरीराची डावी बाजू कमकुवत झाली.
८२ १२ मार्च १९९९ शेतकऱ्यांची कंपनी स्थापन करून औद्योगिकीकरणासाठी 'भामा उद्योगनगरी'चे बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते भूमिपूजन
८३ ५ एप्रिल १९९९ मुंबईत बॉम्बे हॉस्पिटल येथे बायपास सर्जरी
८४ ४ डिसेंबर १९९९ गुजरातमधील नर्मदा जन आंदोलन
८५ १० जानेवारी २००० जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) महानिदेशक माईक मूर यांची दिल्ली येथे भेट शेतकऱ्यांवर लादलेल्या उणे सबसिडीची माहिती दिली
८६ १२ सप्टेंबर २००० जोशींच्या अध्यक्षतेखाली अटल बिहारी वाजपेयी यांच्यातर्फे कृषी कार्य बल स्थापन
८७ ६ एप्रिल २००१ नवी दिल्ली येथील नेहरू स्टेडियमवर 'किसान कुंभ' भरवून शेतकरी स्वातंत्र्याचा जाहीरनामा घोषित
८८ १५ नोव्हेंबर २००२ तीन महिन्यांच्या नर्मदा परिक्रमेला सुरुवात

अंगारवाटा... शोध शरद जोशींचा ■ ५०१