योगदानातून कामाला निश्चित दिशा मिळाली पाहिजे. म्हणजेच ते वर दिलेल्या 'थेंबे थेंबे तळे साचे ' या म्हणीप्रमाणे झालं पाहिजे. 'हत्ती आणि सात आंधळे' या कथेप्रमाणे होता कामा नये. सात आंधळे एका हत्तीची तपासणी करावयास सुरुवात करतात. ज्याच्या हाती हत्तीचा पाय लागतो, त्याला वाटतं हती खांबाप्रमाणे आहे. ज्याच्या ज्याची सोंड लागते त्याला वाटतं हत्ती नळीप्रमाणं आहे. शेवटी हत्ती नेमका कसा आहे हे कळून येतंच नाही. योगदान अशाच प्रकारचे असू नये. (याचंच आणखी एक उदाहरण म्हणजे सध्या निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यानंतर प्रत्येक वृत्तवाहिनीवरून जाहीर होणारे एक्झिट पोलचे निकाल!) तेव्हा, अर्थपूर्ण योगदान करण्याची सवय लावून घेणं हे स्वयंव्यवस्थापनाच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि ही सवय लावण्यासाठी आपलं योगदानमूल्य समजून घेणं आवश्यक आहे.
समूहाचा भाग म्ह्णून काम करत असल्याची जाणीव
थोर कलाकार, शास्त्रज्ञ अशा मोजक्या व्यक्ती पूर्णपणे स्वतःच्या जोरावर काम करून अपेक्षित परिणाम मिळवून दाखवितात. त्यांचा अपवाद वगळल्यास इतर सर्वसामान्यांना कोणतंही काम ते करणाऱ्या समूहाचा एक भाग म्हणून करावं लागतं, हे काम करणाऱ्या प्रत्येकाचे एकमेकांशी विशिष्ट प्रकारचे संबंध असतात. ते त्या कामातूनच निर्माण झालेले असतात.
हे संबंध जपण्याची प्रत्येकाची जबाबदारी असते. या जबाबदारीची जाणीव हे स्वयंव्यवस्थापनातील महत्त्वाचं तत्त्व आहे. ही जाणीव निर्माण होण्यासाठी दोन बाबी लक्षात ठेवावयास हव्यात.
एक, आपल्याबरोबर काम करणारे इतरसुध्दा माणसंच आहेत. त्यांनाही स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. त्यापैकी प्रत्येकाची स्वतःची शक्तिस्थानं आहेत, काम करण्याची स्वतंत्र पध्दत आहे आणि नीतिमूल्यं आहेत. त्यामुळं काम करणाच्या प्रत्येकाला इतरांची शक्तिस्थानं, कार्यपध्दती आणि नीतिमूल्यं यांची माहिती असणं आवश्यक आहे.
उदाहरणार्थ,एका वरिष्ठ अधिकाऱ्याला सचिवानं दिलेले लेखी अहवाल वाचून निर्णय घेण्याची सवय होती. त्यामुळं त्याचा सचिव प्रत्येक लहानसहान बाबत लेखी अहवाल स्वरूपात बॉससमोर ठेवत असे. काही वर्षांनंतर या बॉसच्या जागी नवीन आला. त्याला वाचनाचा कंटाळा होता. त्याऐवजी ऐकून माहिती घेणं त्याला पसंत होतं. पण सचिवानं सर्व काही लेखी देण्याची सवय सोडली नाही. त्यामुळे बॉसनं कंटाळून सचिवावर 'अकार्यक्षम’ असा शिक्का मारला. नव्या बॉसची कामाची पध्दत सचिवानं प्रथम नीट अभ्यासली असती तर त्याच्यावर असा अपमान करून घेण्याची वेळ आली नसती. कामाच्या बाबतीत सचिव अकार्यक्षम.नव्हता. पण नव्या वरिष्ठाची