जुन्या काळात नोकर पूर्णपणे मालकाच्या दयेवर अवलंबून असे. सुरुवातीच्या
काळात मालक त्याला बाजारातून वस्तू आणावी तसा विकत घेत. त्यांना ‘गुलाम’ असे
म्हणत. त्यानंतर नोकर ‘भाड्याने’ घेण्याची पध्दत सुरू झाली. म्हणजेच ठराविक
कामासाठी त्याची मोबदल्यावर नेमणूक केली जाऊ लागली. त्यानंतर शेती व पशुपालन
व्यवसायाला लागणाच्या विविध अवजारांची निर्मिती करणारे व्यवसाय निर्माण झाले.
अशा व्यवसायिकांना कारागीर म्हणून ओळखलंं जाऊ लागलं. लोहार, सुतार ,कुंभार,
विणकर, कातकर असे विविध व्यावसायिक निर्माण झाले. व्यक्तिगत कौशल्यांवर
आधारित असणारे हे मानवजातीच्या इतिहासातील पहिले व्यवसाय होत. ते मुख्यतः
वंश परंपरेने चालत असत .एखाद्या व्यावसायिकाकडे असणाच्या व्यवसायाचे त्याच्या
मुलाकडे हस्तांतरण होत असे. अशा तऱ्हेने हे पिढ्यान् पिढ्या त्याच घराण्यात सुरू
राहत. सुताराचा मुलगा सुतारच व लोहाराचा मुलगा लोहारच होणार हे जणू ठरून गेलं होत.
पिढ्यान् पिढ्यांच्या प्रयत्नांमुळे व संशोधनामुळे हे व्यवसाय प्रगत झाले .समाजाचं
त्यांच्यावाचून चालेनासं झालं. त्यामुळे ते प्रभावशाली बनले.
एकीकडे हस्तकौशल्यांवर आधारित व्यवसाय उत्क्रांत होत असतानाच दुसरीकडे
धर्म व राजकारण या संकल्पनांचा उदय व विकास होत होता. व्यवसायामुळे आर्थिक
समृध्दी मिळविलेल्या समाजाला नीतिमत्ता व आत्मिक विकासमूल्यांची आवश्यकता
भासू लागली होती. त्यातूनच धर्म’ या संकल्पनेची निर्मिती झाली. तर लोकांना
सामाजिक शिस्त लागावी व कोणावर बळजबरी व अन्याय होऊ नये यासाठी अनुक्रमे
राजकारण, राष्ट्र किंवा राज्य व कायदा या संकल्पना अस्तित्त्वात आल्या.
राज्य चालवायचे असेल तर प्रशासन किंवा सरकारची गरज असते. प्रशासन
चालविण्यासाठी खास पध्दतीचं प्रशिक्षण घेतलेल्या कर्मचाच्यांची आवश्यकता असते
आवश्यकतेपोटी ‘करिअर' या नव्या संकल्पनेची सुरुवात झाली. समाजातील ,
हुशार ,होतकरू व राजसत्तेशी प्रामाणिक असे तरुण हेरून त्यांना राज्यकारभार चालविण्याचं
प्रशिक्षण देण्यात येऊ लागलंं व त्यांची त्यांच्या कुवतीप्रमाणे विविध पदांवर नियुक्ती
करण्यात येऊ लागली. ही व्यवस्था सहा-साडेसहा हजार वर्षे सुरू राहिली.
‘करिअर' हाही एक व्यवसायच आहे .मात्र वर नमूद केलेल्या व्यवसायांसारखा
वंशपरंपरागत नाही. तो प्रत्येकाच्या बौध्दिक क्षमतेवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ,
न्यायाधीशांच्या मुलाला स्वतंत्रपणे योग्यता सिध्द केल्याखेरीज न्यायाधीश होता येणार
नाही. त्या पदावर तो परंपरेने अधिकार सांगू शकत नाही.
दोनशे वर्षांपूर्वी औद्योगिक क्रांतीची सुरुवात झाली. विज्ञान’ हा अल्लाउद्दीचा दिवा