पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/110

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पाणी पिऊन नारूने ग्रस्त झालेल्या गावकऱ्यांच्या रूपात ...... शिवाराला घातलेल्या कुंपणामुळे चोरून पाणी न्यायला आलेल्या रखमाने तरुण दलपतच्या विळख्यातून सुटून पळून जाताना टोचलेल्या काटेरी तारेने वाहू लागलेल्या रक्ताच्या रूपात....
 घरात चार बादल्या पाणी मिळणार, म्हणून टँकरपुढे लागलेल्या अगतिक बायांच्या रांगेच्या रूपात....

 थोडं पाणी भरून घ्यावं म्हणून अंधारात रात्री विहीरीवर गेलेल्या आणि तिच्यात पडून मेलेल्या म्हाताऱ्या बायजाच्या फुगून आलेल्या कलेवराच्या रूपात....
 नळ योजनेच्या टेंडरच्या देवाण घेवाणीच्या व्यवहाराच्या हस्तांतराच्या रूपात...
 रोजगार हमीवर उन्हातान्हात राबणाऱ्या हताश स्त्री-पुरुषांच्या गळणाऱ्या घामाच्या रूपात...
 मातीमोलाने विकल्या जाणाऱ्या गाईगुरांच्या गर्दीच्या रूपात आणि परदेशी निर्यात होणाऱ्या मांसाच्या फायदेशीर नोटांच्या चळतीच्या रूपात....!
पाणीचोरांची श्रीमंती
 ऊस तोडणीसाठी कुटुंबकबिला सोडून सहा-सहा महिने रोज नव्या गावी जायचं आणि उसाच्या ट्रकबरोबर परत यायचं, अशा दिनक्रमाला कंटाळलेल्या महादूनं कर्ज काढून स्वत:च्या बारा एकर कोरडवाहू शेतात ऊस लावला. उसाला पाहिलं पाणी धरणातून मिळालं. पुढं पाऊस नीट झाला नाही आणि पाटबंधारे खात्याकडून दुसऱ्या पाळीचे पाणी मिळालेच नाही. सगळा ऊस वाळून गेला. पाणीपट्टीसाठी काढलेले बँकेचे कर्ज अंगावर पडले. एवढेच नव्हे, तर पोटासाठी पुन्हा उसतोडणीचा कामगार बनणे भाग पडले. जेथे ऊस पाहून त्याला वाटते की, या शेताचा मालक हा पाणीचोर आहे; त्याने आमच्या वाटणीचे पाणी चोरून आपले शेत फुलवले आहे, त्या शेताच्या मालकाच्या घरचा चहा पिणेही त्याला घृणास्पद वाटते.
 'लढवय्या' या कथेतला नायकही महादेव कांबळे हा आहे, पण तो आहे सैन्यातून निवृत्त होऊन आलेला जवान. रिटायर्ड, वीरचक्रधारक माजी सैनिक म्हणून त्याला सरपंच दाजीबा पाटलाची अतिरिक्त सीलिंगची पाच एकर जमीन मिळते. तिच्यात दोन एकरांवर आंबा आणि डाळिंबाची झाडे तो लावतो. दोन फलल्गावरून पाझर तलावातून पाणी आणून फळबाग जगवतो. दाजीबा पाटील आपली जमीन गेली, त्याबद्दल अत्यंत चिडलेला असतो. तो नाना लटपटी करून पाझर तलावाच्या नव्या अलाईनमेंटमध्ये नेमकी अशी व्यवस्था करतो की, मूळ नकाशाप्रमाणे दाजीबाची जमीन बुडणार असते, आपण लावलेली फळझाडे उत्पन्न

अन्वयार्थ १११