पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/117

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणीव झाली नाही. या सर्वसामान्य जनतेला तिची ताकद जाणवून देणारी, तिच्या जलसंवेदनांना अधिक धार आणणारी वस्तुस्थिती लक्ष्मीकांत देशमुख यांच्या कथांमध्ये आपणास पाहावयास मिळते. मराठी साहित्यात पाणी प्रश्नाविषयी किती जण रस्त्यावर उतरून आंदोलनात सहभागी झाले? महाराष्ट्राच्या पाणी प्रश्नाविषयी मराठी साहित्यिकांची नेमकी भूमिका काय? या असल्या प्रश्नांच्या जंजाळात देशमुख स्वत: अडकत नाहीत. त्यांच्या कथांतून जाणवते ती त्यांची संवेदनशील साहित्यिक कार्यकर्त्याची भूमिका आणि हा साहित्यिक कार्यकर्ता तुमच्याआमच्या जलजाणिवा ढवळून काढतो इतके नक्की.










११८ अन्वयार्थ