पान:अन्वयार्थ (Anvayartha).pdf/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हिडीस म्हणावी? अर्भक कुत्र्यांनी खावे? आणि त्यासाठी डॉक्टराने वाघासारखे कुत्रे पाळावे ही केवळ कपोलकल्पित घटना म्हणावी? तर बीडमधील डॉ. मंड्याचा क्रौर्याचा इतिहास हेच सांगतो, की त्यांनी शेतामध्ये कुत्र्यांची फौजच पाळली होती. 'लंगडा बाळकृष्ण' ही कथा अत्यंत हृदयद्रावक आहे. बायकोवर अतोनात प्रेम करणारा नवरा मिळाला म्हणून स्वर्गीय सुखाने आनंदणारी पत्नी एके दिवशी नवऱ्याच्या हॉस्पिटला जाते. आणि खोलीतील दोन कुत्रे बाहेर पडतात. दुलईत लपेटलेलले बाळ कुत्रे पाहतात. कुत्र्यांना ओल्या जावळाचा वास सवयीचा झालेला असावा. ठेवलेले बाळ त्यांना सवयीने आणि तेही आपला भक्ष्यदाता विशिष्ट वेळेला समोरून जातो म्हणजे त्यांच्यासाठी ते आमंत्रणच. कुत्र्यांनी डॉक्टरच्याच बाळाच्या पायाचे लचके तोडले! रोमान्ससाठी कुतूहल, सुखी - समाधानी स्त्रीचे दर्शन आणि दुसरीकडे क्षणाक्षणाला किडा-मुग्यांना आदिवासींनी मारून खावे तशी डॉक्टरची पैशांची हाव - नाट्यपूर्ण कल्पनाविस्तार, वास्तवाचे थैमान, स्त्रीचे उद्ध्वस्त होणे, डोळ्यांदेखत कुत्र्यांना अर्भक खाऊ घालणे, प्रत्यक्ष याची देही याची डोळा हे सारे फेडण्यासाठी स्वत:च्या बाळालाच अक्षरश: कुत्र्यांना देणे ही अशी फँटसी इंग्लिश सिनेमात होत नसावी? अत्यंत खुबीने हे सर्व शब्दांकित केले आहे.
 देशमुखांचे हे काम फार मोठे आहे. महात्मा जोतिराव फुल्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रातच पुन्हा लक्ष्मीकांत देशमुखांनी स्त्रीला कात्रीतून वाचवण्याचा अक्षय प्रयत्न केला. फुल्यांनी स्त्रीला शहाणी केली, महात्मा गांधींजीनी तिला सार्वजनिक जीवन दिले तर देशमुखांनी तिच्या जन्मासाठी स्वागतशील प्रवृत्ती व मानसिकता तयार केली. या संग्रहात अविस्मरणीय अशा आठच कथा आहेत. त्यांमधून स्त्रीच्या जगण्याचा, तिच्या मोहोरून येण्याच्या प्रवृत्तीचा साक्षात्कार होतो.
 देशमुखांच्या कथावाङ्मयातील मूल्यांविषयी बोलण्यापेक्षा जीवनमूल्यांची व सामाजिक मूल्यांची समीक्षा करणे गरजेचे वाटते. कारण ही मूल्ये देशमुखांना चिंतनीय वाटतात. त्यांच्या पहिल्या संग्रहातील मूड नंतर राहिलेला नाही. भगभगीत सत्य त्यांना अस्वस्थ करीत असावे. सर्व सुखे, सर्वस्व समोर असतानाच्या बेधुंद अवस्थेत विवेक हरवलेल्या मनात प्रबोधनाची आवश्यकता यंत्रवतजीवन जगणाऱ्या माणसाला असते. आपल्या कथासाहित्यात श्री. लक्ष्मीकांत देशमुख असे मानसिक सबलीकरण व लालित्यामधून वैचारिक प्रबोधन करतात, अशी नोंद मराठी वाङ्मयतिहासात होईल.

॥७॥

 देशमुखांच्या कथावाङ्मयाचा परीघ क्षितिजासारखा आहे. कथेच्या एका पुस्तकात ते विस्तीर्ण असून कुठेतरी आकाश जमिनीला टेकल्यासारखे वाटते. पुन्हा नवीन

४२ अन्वयार्थ