पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/173

हे पान प्रमाणित केलेले आहे.






प्रादेशिक फळे व उत्पादने


 क्रिकेटसारख्या सामन्यांकरिता राष्ट्रीय संघात खेळाडूंची निवड होते त्यावेळीदेखील कोणते खेळाडू चांगले आहेत आणि कोणत्या खेळाडूंचा सुसंबद्ध संघ बनेल यापेक्षा कोणत्या राज्याला वा प्रदेशाला किती प्रतिनिधित्व मिळालेले आहे, कोणत्या खेळाडूंचे वरपर्यंत लागेबांधे आहेत याचाच विचार अधिक होतो. एकदा खेळाडूंच्या निवडीतच भ्रष्टाचार घुसला, की तेथून मॅचचे निर्णय विकणे, विकत घेणे फारसे दूर नाही. ज्या खेळाडूंना खुद्द खेळण्यात रस नाही त्यांनी जिवाची करमणूक एरव्ही करून घ्यावी कशी?
 पुढारी मंडळी खेळनियंत्रक संघटनांवर हुकूमत गाजवू लागले म्हणजे अशा गोष्टी अपरिहार्य आहेत. सिडनी येथील ऑलिम्पिक खेळांत भाग घेण्यासाठी आपला जो संघ गेला, त्याच्या निवडीतही कोण कसा काय खेळ दाखवील; जागतिक स्पर्धेत किती पदके मिळवील यापेक्षा कोणाची चिठ्ठी आली आहे याचा आधार घेतला गेला. पदक जिंकण्याची काहीही शक्यता नसताना थोरामोठ्यांशी लागेबांधे असलेली मंडळी एवढ्या वरच्या पातळीवरील खेळांत भाग घेता यावा यासाठी का धडपडतात? कुस्ती, बॉक्सिंग अशा उघडउघड टकरीच्या खेळांत बहुधा असे होत नसावे, कारण ऐरागैरा गेला तर जिवावर बेतायची शक्यता; पण धावणे, कसरती नैपुण्य (ॲथेलेटिक्स्) अशा खेळांमध्ये काही जीविताचा धोका नाही. काही पदके मिळाली नाही तरी आपण राष्ट्रीय संघातून खेळात भाग घेतला हेदेखील 'गंगेत घोडे न्हाले' असे कृतकृत्य वाटून, त्याचीच शेखी मिरवीत फिरण्यातही धन्यता मानणारे लोक आहेत; भारतीय प्रशासकीय सेवेच्या परीक्षेला नुसते बसून, काही नाही तरी, लग्नाच्या बाजारात आपला भाव वधारून घेणाऱ्या उपवधू तरुणांप्रमाणेच!

 आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाच्या वाटाघाटी होतात. भारतात या वाटाघाटींत

अन्वयार्थ – दोन / १७५