पान:अन्वयार्थ - २ (Anvayarth - 2).pdf/309

हे पान प्रमाणित केलेले आहे.

पुरविले आहे. या वाणावर सरकारी बंदी आहे याचे ज्ञान लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना असण्याचे काहीच कारण नाही. त्यांचा गुन्हा काहीच नाही. शिक्षा, हिंदुस्थानात हे वाण तस्करीने आणणाऱ्यांना करणे योग्य होईल. परंतु, उभी पिके नष्ट करण्याचा नतद्रष्टपणा कारण्याचा सरकारला काय अधिकार? पीक उखडून टाकल्याने अनेक शेतकऱ्यांचे सबंध वर्ष भाकड जाणार आहे. त्यांना, निदान, अपेक्षित पिकाच्या किमतीइतकी नुकसानभरपाईतरी देऊ करायला पाहिजे.
 देशभरच्या शेतकऱ्यांच्या संघटनांनी या सरकारी जुलुमाविरुद्ध दंड थोपटले आहेत. राज्याराज्यातील शेतकरी संघटना पिकांच्या संरक्षणासाठी सज्ज होत आहेत आणि सरकारी पोलिस व निमलष्करी दले उभी पिके उखडून जाळून टाकण्यासाठी चालून येत आहेत. जगभरच्या आतंकवादाचे आपण वीस वर्षे बळी झालो आहोत असा टाहो फोडणाऱ्या पंतप्रधानांनी भारतीय शेतकऱ्याविरुद्धच्या इंडियन सरकारी आतंकवादाची नोंदतरी घेतली आहे का?

दि. २७/१०/२००१
■ ■

अन्वयार्थ – दोन / ३११