या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


कै. कहाळेकर व रसचर्चा । ७१


आहे असे समजून निर्वाह करावा. मी म्हटले, वसंतसेना इथे भ्यालेली आहे. मग येथे भयानक रस समजावा काय ? महाराज म्हणाले, अशा वेळी भयानक रस समजण्याऐवजी शंगार समजावा. कारण लोकमत तसे आहे. मी विचारले, विदूषक कधी प्रधान पात्र असू शकेल काय ? मग हास्य रसाचे काय करावे ? कहाळेकर म्हणाले, जेव्हा आपल्याला हसण्याची इच्छा असते त्या वेळेला विदूषकाला प्रधान पात्र समजून हसून घ्यावे. जर आपल्याला हसावेसे वाटत नसेल त्या वेळी नायकाच्या प्राधान्याकडे लक्ष देऊन आपण गंभीर व्हावे. मी विचारले, एखाद्या वेळी विदूषकाच्या पांचट विनोदाला नायक हसतो, आपल्याला हसू येत नाही. कंटाळा आलेला असतो. अशा वेळी काय करावे ? कहाळेकर म्हणाले, पोथीतले नियम घेऊन कलाकृतीचा आस्वाद घेण्याच्या आपल्या वेड्या इच्छेला अशा वेळी विदूषक समजावे व हसून घ्यावे.
 एक दिवस कहाळेकर म्हणाले, आपण नायकांची चर्चा कशाकरता करतो आहोत हेच मुळात मला समजत नाही. नाटकांना नायक असेल अगर नसेल. नायिकाही असतील अगर नसतील. आपला त्याच्याशी काय संबंध? आपण रसचर्चा करताना नायकाचा विचार का करावा ? नाट्यशास्त्रात नायकाचा विचार केलेला आहे काय ? आता त्या वेळी नाट्यशास्त्रात काय आहे हे मला तरी कुठे माहिती होते. मी म्हटले, हा मुद्दा मी नाट्यशास्त्रात पाहून घेतो. ते म्हणाले, ग्रंथ उलट्या बाजने पाहा. कारण किरकोळ विषय शेवटी शेवटी सापडत असतात. मी म्हटले, हे मी करणार नाही. नाटयशास्त्रात नायकाची चर्चा आहे की नाही हे तुम्हीच मला सांगा. ते म्हणाले, याचे उत्तर नाटकाला कथानक असते की नाही यावर अवलंबून आहे. नाट्यशास्त्र याविषयी काय म्हणते, ते एकदा पाहून घ्यावे लागेल. मी म्हटले, उद्या ते तुम्ही पाहून घ्या आणि मला सांगा. ते म्हणाले, पाहून न घेता आजही मला सांगता येईल. नाट्यशास्त्रानुसार नाटकाला कथानक असते. आणि या कथानकात नायक-नायिका असतात. मी विचारले, हे जर तुम्हाला माहिती आहे तर मग तुम्ही आपण नायकाचा विचार विनाकारणच करतो आहोत, असे का म्हणता? ते म्हणाले, रसचर्चा करताना नायकाचा विचार करण्याची प्रथा आहे की नाही हे मला नक्की सांगता येणार नाही. मी विचारले, या ठिकाणी करुण रस आहे हे आपण कसे सांगणार ? ते म्हणाले, ते मला माहीत नाही. कारण आपण जर नायक-नायिकांच्या आधारे रसविचार करू लागलो तर मग काव्यगत नायकांच्या स्थायीभावांचा रसाशी संबंध जोडावा लागतो ही भूमिका लोल्लटाची आहे. आणि लोल्लटाचे मत चुकीचे आहे यावर तर सगळ्या परंपरेचे एकमत आहे.
 मी विचारले, एखाद्या प्रसंगातला रस रसिकाच्या प्रत्ययावर ठरवायला तुमची काही हरकत आहे काय ? महाराज म्हणाले, तशी माझी हरकत कोण