या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

________________


९४ । अभिवादन



लंकार आणि पौराणिक दाखले. आध्यात्मिक तत्त्वज्ञान केकावलीच्या आधारे सांगत बसणे किंवा या ग्रंथाच्या आधारे भक्तिमार्गाचे प्रतिपादन करणे यात अर्थ नाही. ज्ञानेश्वरी, दासबोध यांसारखा हा पारंपरिकांचा आधारग्रंथ नव्हे. किंवा एखादे तत्त्वज्ञानपर उपनिषदही नव्हे. श्रीधरबुवांनी या ग्रंथावर जर प्रदीर्घ भाष्य लिहिले असेल, तर तो एक हौसेचा भाग आहे. या रामदासानुदासांना अनेकांनी आपले सद्गुरू मानले. त्यांच्यांभोवती अनेक चांगली माणसे गोळा झाली. पणं. राजकारणांच्या तडाख्यात त्यांची क्रांतिकारक प्रतिमा भंग पावली. पुढे त्यांचे शिष्यही त्यांना सोडून गेले. माडखोलकरांना मात्र त्यांच्याविषयी आदरयुक्त प्रेम वाटते. त्यांच्या आशीर्वादाने आपल्याला मुलगा झाला, असे माडखोलकरांनी नमूद केले आहे. पण हा औपचारिक भाग आहे. साधुसंतांच्याविषयी इतकी भोळी भक्तिभावना मनात बाळगणारे त्यांचे मन नाही.
 रामदासानुदासांविषयी माडखोलकरांना तीन आदर वाटण्याचे कारण निराळे आहे. त्यांच्या डोक्यात अशी कल्पना आहे की, नव्या साधुसंतांनी समाजसुधारणेच्या कार्याला एक जन्मभराचे कार्य म्हणून वाहून घेतले पाहिजे. या कार्यातूनच परंपराभिमानी राष्ट्रवादी, पण रूढींचा पसारा गुंडाळून फेकून देणारा एकात्म हिंदू समाज उभा राहील, असे त्यांना वाटते. श्रीधरबुवा हे त्यांच्या या श्रद्धेचे एक प्रतीक आहेत. श्रीधरबुवांनी चालती नोकरी सोडली. एका माणसाला ख्रिस्ती होण्यापासून वाचवण्यासाठी ते ही किंमत द्यायला तयार झाले. त्यांनी रजोदर्शनाबद्दल प्रायश्चित्त न घेता आपल्या धाकटया बहिणीचा विवाह केला आणि कर्मठांचा विरोध गुंडाळून बाजूला ठेवला. एका भाविक महाराला त्यांनी आपला शिष्य केले आणि त्याचे नाव रामदास ठेवले. आपल्या वैयक्तिक जीवनातून त्यांनी अस्पृश्यता काढून टाकली. आदिवासी समाजातील अनुयायी जवळ केले; व त्यांना ब्राह्मणांच्या बरोबरीने प्रतिष्ठा दिली. नानाविध जातींच्या विधवा स्त्रिया त्यांनी समाजकार्याला लावल्या. ज्या वेळेला स्वत:ला इच्छा निर्माण झाली, तेव्हा हिमतीने जो दुसरा विवाह केला, तो मराठी समाजातील एका विधवेशी केला. स्वतःच्या मुलीचे मौंजीबंधन केले. एक रामदासी पंथाचा सत्पुरुष, आपल्या लोकप्रियतेची पर्वा न करता, झपाट्याने सुधारणा अमलात आणतो, प्रामाणिकपणे आपल्या गुणदोषांसह समाजासमोर वावरू इच्छितो, आपल्या उपदेशात व स्वतःच्या जीवनात अस्पृश्यता, जातिभेद आणि रूढी गुंडाळून ठेवून मोकळा होतो, याचे माडखोलकरांना मुख्य आकर्षण आहे. म्हणूनच, हिंदुत्ववाद्यांच्या वर्तुळात ते पचण्याजोगे नाहीत, असे त्यांच्याविषयी माझे मत झालेले आहे.
 गुणग्राहकता आणि मर्यादांची जाणीव या दोन्ही बाबी माडखोलकरांच्या मृत्युलेखात सातत्याने व्यक्त झालेल्या दिसतात. काही वेळेला एखाद्या कृतिशीलाच्या

-