पान:अस्पृश्य -विचार.pdf/96

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वतन-वेतन. ԱջԿ. योजिलें आहे. गुजरात, कोंकणमध्यें कुळकर्णीवेतनदार झाला आहे. त्याला तलाठी म्हणतात. देश व दक्षिण महाराष्ट्र ह्यांतल्या सुमारें दहा जिल्ह्यांत तो अजून वतनदार आहे, व तलाठी होण्याच्या पंथास लागला आहे. पाटील, महार,जागल्या हे सर्वत्र वतनदार आहेत. वतनदारांसंबंधानें सरकारानें मुंबईचा सन १८७४ चा अॅक्ट ३ (वतन कायदा) केला आहे. सरकारचा खेड्यांतला मुख्य प्रतिनिधि पाटील होय. बहुतेक पाटील लिहिणारे नसल्यामुळे गांवचा सर्व सरकारी पत्रव्यवहार एकट्या पाटलाच्या नांवानें न चालतां पाटील-कुळकर्णी या जोडनांवानें चालतो, आणि गांवच्या सरकारी कागदपत्रांवर दोघांनाही सह्या कराव्या लागतात. पाटील निरक्षर असला तर तो आपल्या सहीची निशाणी करतो. सरकारउपयोगी वतनदार गांवकामगारांची नेमणूक वर सांगितलेल्या वतन अॅक्टाप्रमाणें होते. पाटील-कुळकण्याँच्या वतनांच्या तक्षिमा, वडीलकी व पाळया वगैरेंची चौकशी करून सरकारनें वतन राजटर तयार केलें आहे; त्यांत जे ‘वारचे' वतनदार लागले आहेत, ते आपापल्या आणेवारीप्रमाणें स्वतः किंवा गुमास्त्यामार्फत काम करतात. गांव कितीही लहान असला तरी त्याला स्वतंत्र पाटील असावयाचाच, आणि बहुतेक खेडयांत एकाच पाटलाकडे मुलकीं व फौजदारी काम असतें. गांवें फार लहान असलीं तर एका कुळकण्र्याकडे दोन ते आठपर्यंत गांवें असतात, आणि मोठ्या गांवांत एकाहून आधक मुलकी व पोलीस पाटील आणि कुळकर्णी नेमतात. कोणत्या गांवाला किती पाटील-कुळकर्णी असावयाचे हैं सरकार ठरावितें. पाटील-कुळकण्र्याची संख्या ठरावतांना सरकार पूर्वोपार वाहवाटोपेक्षां प्रस्तुत कामाच्या मानावर जास्त भिस्त टाकतें. पाटील-कुळकण्र्याची नेमणूक मुलकी प्रांताचे अाधकारी करतात. कामावर जोपाटील किंवा कुळकर्णी नेमावयाचा तो वयांत आलेला, चांगले वर्तणुकीचा, आणि काम करण्यास लायक असा पाहिजे. तो तसा नसला तर तोवारचा वतनदार असला तरी त्याला कामावर नेमतां येत नाहीं. पाटील निरक्षर असला तरी चालतो, परंतु कुळकण्र्याला कुळकर्णाची परीक्षा द्यावी