तून ज्या यातनांस अंत नाहीं अशा यातनेंत पडणें हैं किती कठीण आहे, ह्याचा जो मनांत वारंवार विचार करील तो जग मिळविण्यासाठी देखील एक पाप करणार नाहीं. "
ज्ञानप्रकाश आणखी थोडा वेळ तुजजवळ आहे; तो आहे तोपर्यंत पुढे पाऊल टाक, नाहीं तर अज्ञानतम येईल. व जो अंधकारांत चालतो त्याला आपण कोठें जातों हें कळत नाहीं."
“तर मग जो हीं माझीं वचनें ऐकितो, व तीं पाळित नाहीं त्याची, जो मूर्ख रेतींत आपलें घर उभारतो, त्या मूर्खीबरोबर तुलना करावी. कारण पाऊस पडतो, पूर येतो, वारा वाहतो, व तो ह्या घरावर आदळतो, आणि तें पड़तें."
परंतु उलटपक्षीं, " जो हीं वचनें ऐकितो, व तीं पाळितो, त्याची तुलना खडकावर घर बांधणाऱ्या शहाण्या माणसाबरोबर मी करितों. पाऊस पडतो, पूर येतो, वारा वाहतो, व त्यावर आदळतो, व तें पडत नाहीं, कां कीं तें खडकावर बांधिलेलें असतें. "
विशेषेकरून जो इतरांस व तशांत बालांस आड मागीनें नेतो त्याचा सत्यनाश होवो.
गुन्हे घडणार नाहींत हैं अशक्य आहे. परंतु ज्यांच्या- मुळे गुन्हे घडतात त्यांचा सत्यानाश होवो. त्यानें अज्ञान बा- लांस कुमार्गी लावावें त्यापेक्षां त्यांच्या गळ्यांत दगड बांधून त्यांला समुद्रांत बुडवावें हें बेरें."
"आपला आत्मा भ्रष्ट होऊन पृथ्वीचें राज्य मिळालें तर त्याचा काय उपयोग ? अथवा आपल्या आत्म्याचा मोबदला त्यानें काय द्यावा ?
१ सेंट जान, २ ल्यूक. ३ म्यॅथ्यू.