.
पाणी ही जीवनाला अत्यंत जरुरीची वस्तु आहे. त्याशिवाय भूतला-
वरील प्राणी व वनस्पती जिवंत राहणार नाहीत. म्हणून जगांतील
प्रथमारंभीच्या वसाहती नदीवर झाल्या होत्या. गांवें व खेडीपाडी नद्यांचे,
सरोवरांचे व झऱ्यांचे काठी वसली. अलीकडल्या अर्वाचीन काळांत
स्वाभाविक रीत्या पाण्याचे ठिकाण असते त्यालगत वस्ती करण्याची जरुरी
राहिली नाही. कारण नळ व पाटबंधाऱ्यांचे कामांत हल्ली इतकी गति
झाली आहे की, मुंबईसारख्या शहरालासुमारे २० मैल लांबीच्या स्थाना-
पासून पाण्याचा पुरवठा होतो.
पाण्याचे मुख्य उपयोगः-(१) पिण्यासाठी. पाणी पिण्याने अन्नास
मऊपणा येऊन तें शोषणपात्र होते, रत्नाचे द्रवत्व कायम राहते आणि
त्याज्य पदार्थ द्रवरूप होऊन त्यांचे उत्सर्जन शरीराबाहेर होते. (२)
अन्न शिजविण्याचे कामी व धुण्यासाठी. (३) गोठे, तबेले व गाडया
वगैरे धुणे. (४) म्युनिसिपॅलिट्या, गिरण्या व कारखाने ह्यांची कामें.
(५) रुग्णालयें.
भूतलावर पडणाऱ्या पावसापासून आपणाला पाणी प्राप्त होते.
जमिनीवर पाणी पडल्यानंतर त्याची खाली लिहिल्याप्रमाणे व्यवस्था
होते:-(क) कांही भागाचे बाष्पीभवन होऊन तो उडून जातो.
(ख) दुसरा भाग जमिनीचे उताराने वाहात जातो. (ग) तिसरा
भाग जमिनीच्या रंध्रांतून झिरपून खोल जातो.