पान:एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न (Eakavisavya Shatakatil Samajik Prashna).pdf/36

हे पान प्रमाणित केलेले आहे.

मागासवर्गीय कल्याण विज्ञाननिष्ठ समाज रचना व संस्कृती संवर्धनात या कार्याचा राज्यात असा ठसा आहे. विचारवेध' संमेलनासारखा उपक्रम राज्यात रुजण्यात या जिल्ह्यातील पार्थ पोळके आदी कार्यकत्र्यांनी घेतलेले श्रम कोण विसरेल?
 रत्नागिरी, सिंधुदुर्गसारख्या दुर्गम जिल्ह्यातही कुमुदताई रेगे, डॉ.मु.ना. पानवलकरांसारखी मंडळी ‘अंधार फार झाला, पणती जपून ठेवा' या विचाराने महिलाश्रम, बालगृहासारख्या संस्था चालवताहेत. देवरुखचं मातृमंदिर म्हणजे इंदिराबाई हळबेंच्या आणि सोलापूरच्या जिव्हाळा' या मतिमंदांच्या शिक्षण व पुनर्वसन कार्य करणाच्या संस्थेने आपल्या पालवी' प्रकल्पाद्वारे महाराष्ट्रात एक वेगळी वाट चालून मतिमंदांच्या पूर्ण पुनर्वसनाचा वस्तुपाठ महाराष्ट्रापुढे ठेवला. प्राचार्य रणदिवेंनी मतिमंदेतर अपंगांच्या संगठनाचेही कार्य केले. बालगुन्हेगारांच्या संगोपन, संरक्षण, शिक्षण, पुनर्वसन कार्यात संपूर्ण समर्पित जीवनाचं स्मृतिमंदिरच! अनाथांचे संगोपन, गरीब, गरजू, रुग्णांची सेवा, ग्रामीण भागातील समूह विकास अशी ठळक कामे या भागात झाली. सावंतवाडीचे शासकीय महिला आधारगृह हे ‘उंबरठा' चित्रपटाचं जन्मस्थळ, शांता निसळ यांनी बंदिगृहातील वेदनांचं सारं लेखन टिपण इथंच केलं! टिळक, सावरकर, खांडेकर अशा कितीतरी दिग्गजांचं मानसिक व भावनिक माहेर असलेले हे जिल्हे साने गुरुजींना अभिप्रेत असलेला ‘खरा तो एकचि धर्म' इथं अजून जपताहेत. कोकणात रेल्वे आली तरी येथील सेवावृत्ती अद्याप ‘डी रेल' झाली नाही, यासारखे आश्वासक चित्र ते दुसरे कोणते?
 दक्षिण महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांच्या कार्याचे वेगळेपण हे त्यांच्या वैविध्यात जसे आहे तसेच ते त्यांच्या आगळ्या अशा कार्यपद्धतीतही सामावले आहे. या सर्व संस्था मुळात कल्याणकारी कार्य करण्याच्या इराद्यातून जन्मल्या. प्रत्येक संस्थेत स्थापनेपासून समर्पित कार्यकर्त्यांची परंपरा दिसून येते. बहुधा साच्या संस्था वंचितांच्या कल्याणासाठी झगडताना दिसतात. या सर्व संस्थांनी

आपल्या पूर्वसुरींच्या कार्याला आधुनिक परिमाणं, साधनं जोडून ती जगाशी जोडली. कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलाने 'इंटरनेटद्वारे आपली संस्था जगाच्या नकाशावर नोंदवून एक नवा कीर्तीमान स्थापित केला. ब-याच संस्था संगणकीय कार्य करताना दिसतात. या संस्थांच्या कार्यात सर्व थरातील लोकाश्रय दिसून येतो. त्या धर्मनिरपेक्ष जशा आहेत तशा विज्ञाननिष्ठही. या संस्थांच्या कार्यकत्र्यांवर राजकीय विचार प्रवाहांचे प्रभाव आहेत. पण ते त्यांनी आपल्या कामाचे ‘बॅनर' होऊ दिलेले नाहीत. ज्यांना काहीच नाही,त्यांना सर्व काही देण्याचा ध्यास घेतलेल्या दक्षिण महाराष्ट्रातील सामाजिक संस्था

एकविसाव्या शतकातील सामाजिक प्रश्न/३५