हे जितकं खरं आहे, तितकचं हेही खरं की, To set a humanity to catch a Humanity - हीच आपण गमवत, हरवत चाललोय... मला देहदंडाशी फारसं देणं-घेणं नाही... कायदा बदलत नाही तोवर पाळलाच पाहिजे. मी कायद्याचा उपासकच आहे. कायद्याचा आदर माझा प्राण आहे. पण हिंसेस हिंसा हेच उत्तर मात्र मला मान्य नाही. अलीकडे जगभर नि भारतातही जे प्रगल्भ जनमत तयार होतंय... ते आज अल्पसंख्य आहे. या शतकाअखेर ते बहुसंख्य व्हावे-होईल असा विश्वास आहे... आरोपीचे वय, त्यांच्यामागे असणारी लहान मुले, मानवतावादी दृष्टिकोन ही फाशीची मार्गदर्शक तत्त्वे मानली गेलीत. वृत्तपत्रांनी यास अपवाद प्रसिद्धी दिली. खपाच्या स्पर्धेत आपण सुपात आहोत... उद्या जात्यात जाणार नाही, कुणी सांगावे? देहदंडाचं, अपराध्याचं काय व्हायचं ते काळ ठरवेल! आपलं मन आसुरी आनंदात रमणार नाही, उद्रेकी बनणार नाही, हिंसक होणार नाही हे पाह, अन्यथा हिंसेच्या विषारी फळांचे सेवन करून करून मनुष्य क्रूर श्वापद व्हायला वेळ लागणार नाही.
■■