हरवलेला तोल सावरू शकेल. 'साधी राहणी नि उच्च विचारसरणी' असे छोटे छोटे परिपाठ घरातील प्रत्येकाच्या मनीमानसी रुजतील तर घरी पाहणे आल्याचा आनंद वाटेल.
खालील जिब्राननी ‘प्रोफेट' या आपल्या महाकाव्यात विचारलं होतं की, ‘जन हो', मला सांगा, की या घरांमध्ये तुम्ही काय साठवून ठेवलं आहे? आणि दरवाजे अगदी घट्ट लावून घेऊन तुम्ही कशाचे रक्षण करत आहात? यात शांती आहे का? त्यात हृदयाला हवं असणारं, काष्ठे-पाषाणांतून निर्माण केलेल्या वस्तूंपासून पवित्र गिरी शिखरांपर्यंत पोहोचविणारं सौंदर्य साठवले आहे का? शांतीमध्ये अशांत असणा-यांनो, तुम्ही पिंज-यात अडकविले जाणार नाही, गोठ्यात बांधले जाणार नाही याची काळजी वाहा.' आज आपण तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या यंत्रांच्या महाजालात स्वतःला ज्या पद्धतीनं गुरफटून घेतलं आहे त्यातून स्वतःचं मन निरामय करून सोडवून घ्यायला हवं. भरल्या घरातील मुलं अनाथ जीवन जगत असतील तर जगण्याला काय अर्थ? बर्टोल्ट ब्रेश्तनं म्हटलेलं लक्षात ठेवायला हवं-
हर चीज बदलती है।
अपनी हर आखिरी सांस के साथ।
तुम एक ताजा शुरुआत कर सकते हो।
■■