बदल हा कोणत्याही मनुष्य समाजाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मनुष्य समाजाच्या निर्मितीपासून ते आजवर सतत इतिहास, समाजशास्त्र, मानववंशशास्त्रांनी याची नोंद घेतली आहे. आज महाराष्ट्र या नावाने ओळखल्या जाणाच्या भूप्रदेशाची मुख्य भाषा मराठी राहिली, तरी प्रारंभीपासून इथे बहुभाषी, बहुजाती, बहुधर्मी जनसमुदाय राहात आला आहे. थोड्याफार फरकाने हे सर्व भारताचेच वैशिष्ट्य राहिले आहे. त्यामुळे इथे आंतरप्रांतीय सांस्कृतिक देवाणघेवाण ही समाजाची स्थायी प्रवृत्ती बनली आहे. हे बदल अंतर्गत व बाह्य दोन्ही पातळीवर आपणास दिसून येतात. महाराष्ट्र हा प्रगत प्रांत असल्याने नवं तत्त्वज्ञान स्वीकारण्याची व नवं तंत्रज्ञान आत्मसात करण्याची त्याची प्रवृत्ती इतिहास कालापासून राहिली आहे.
महाराष्ट्राची समाजरचना प्रारंभीपासून बहजिनसी राहिली आहे. गेल्या ४८ वर्षांत झालेल्या विविध स्थित्यंतराने बहजिनसीपण सतत वाढते आहे. प्रादेशिक अस्मितेचा आग्रह धरणारे पक्ष त्यांच्यातील विसंगतीमुळे अपयशी ठरत आहेत. महाराष्ट्रीय माणूस विकासासाठी पूर्वीच्या तुलनेने इतिहासाच्या शिकवणुकीतून अधिक स्थलांतरित होतो आहे. शिक्षण व संपर्कक्रांतीच्या विस्तारित संधीमुळे स्थलांतराची गती भविष्यकाळातही वाढणार हे निश्चित. त्यामुळे प्रादेशिकतेचा संकीर्ण नारा दिवसेंदिवस क्षीण होत जाईल. विकासाच्या गतीत टिकायचे तर हे अनिवार्यही आहे, याचे भान सुज्ञ महाराष्ट्रीय समाजास आहे.
महाराष्ट्राच्या विकासकाळात जातीय अस्मिता, आरक्षण, जातीय संघटनांचा वाढता विस्तार इत्यादीमुळे पूर्वीच्या तुलनेने संघटन पातळीवर वाढताना