या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९. धेनूंची खिल्लारें वत्सांचे कळप जाति मार्गाने । ते तद्रक्षकबाळे वाजविती वेणु गाउनी गाणे ॥ ७ ॥ कोठे प्रातःस्मरण श्रवणीं ये वेदशास्त्र पठन कुठे,। कोठे वीणावादन, सुस्वर गायन, मृदंगनाद उठे ॥ ८ ॥ कोठे मैना रावे गोड असे बोल बोलती कुतुकें,। रम्य प्रकार फारचि, होइल विस्तार, वर्णितां तितुके ॥ ९ ॥ र वाताल अनुप्रास, सरलता, व वर्णनशैली ह्यांकडे लक्ष्य दिले झणजे कवीच्या प्रसादगुणाची सहज साक्ष पटते. वीररसाचा आवेशही तसाच स्फूर्तिदायक आहे. पहा: तें वीर स्फुरणाने वदती ते गौरवून दादास । "दादासाहेब चला. सिद्धचि आहों अह्मी सदा दास" ॥१॥ ते राय तोषला बह, वीरमनोत्साह पूर्ण पाहुनियां । का न ह्मणेल जन असें "अन्य नसेलचि सुखी नृपाहुनिया" ॥ २ ॥ कटका स्वकट बिकट पथ लंघुनि रघुनाथ शत्रुपर निकट । गेला तिमोरशा तों आला भट घेउनी करूनि कट ॥ ३ ॥ वासरावाच्या पत्नीचे भाषण व त्यावर त्याचे उत्तर ही वीराला फारच शोभण्यासारखी आहेत. त्यांतील दोनचारच आयाः बोले पिकस्वरा ती, ही तनु तुमच्या वियोगगिरिखालीं । जाणार चूर होउनी. माझी स्थिति ह्मणुनि हो अशी झाली" ॥ १ ॥ मग राजपुत्र बोले, "प्रिये तुझा हाच का शहाणपणा ? । वदसी काय बरें हैं ? जाऊं नये काय मी कधीच रणा ? ॥२॥ होता आजोबांचा काय पराक्रम, कशी तरी कीर्ती, मात्र यच्चरितश्रवणाने, सामान्यातेंहि येतसे स्फूर्ती” ॥ ३ ॥ "प्या बळेंच कां तें, घ्याया स्वप्राण जें उणे न गर । युष्मद्वियोगयोगें, होइल मज शून्य हे पुणे नगर" ॥ ४॥ "ते काका, विंचुरकर विठ्ठल शिवदेव, आणि ते शिंदे,। नारोशंकर, आदिक येति यशाचे सदैव पोशिंदे ॥ ५ ॥ कौरव पांडव यांचे युद्ध पुरें ऐकलेच आहे तूं । कर्णादि वीर असतां वृषसेन धरी रणार्थ कां हेतू ॥ ६ ॥