या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मनात आण (अ) शक नजर ठेवली पाहांना त्या कालचा मुद्याकडे व HE दोष घडत मतीवरून व संवत्सर शपाची चूक जुन्या ग्रंथात फेरबदल होरीसारख्या किड्याच्या २६८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. प्रेमभावाने आह्मांवर उपकार करून जेवढे काही लिहून ठेवले आहे, तेवढेंच पुष्कळ असे समजून त्यापासून निघणारा तथ्यांश आह्मीं ग्रहण केला पाहिजे. आणि ते ग्रंथ अवलोकन करतांना त्या कालची वस्तुस्थिति मनांत आणून त्यांच्यावर मेहेर नजर ठेवली पाहिजे. आतां मूळ मुद्याकडे वळू या. (अ) शके ११९२ साली प्रभव संवत्सर येत नसेल, ११८९ मध्ये येत असेल. हस्तलिखित प्रतीवरून प्रती करतांना लेखकांच्या हातून असे अल्पस्वल्प दोष घडणे साहजिक आहे, कसरीसारख्या किड्याच्या भक्ष्यानेही काही अक्षरांत व आंकड्यांत फेरबदल होणे शक्य आहे. अशी वर्षा दोन वर्षांची चूक जुन्या ग्रंथांत असू शकेल. परंतु शेंदोनशे वर्षांचा फरक असणे अ. शक्य होय. कारण, एक तर वडाची साल पिंपळाला लावता येत नाही, जड जाते. जुन्या लोकांचे तसें ब्रीद नव्हते. व तसे करण्याचे कारणही पण नव्हते. (ब) नामदेव ८० वर्षांचा होऊन समाधिस्थ झाला. झणजे १२७२ शका मध्ये. मुसलमान दक्षिणेत घुसले शके १२१९ त. तरी, नामदेवाच्या वृद्धापकाळा मुसलमानांच्या जुलमांचे वर्णन येण्यांत कांही फारशी हरकत दिसत नाही. परंतु नामदेवाने ज्या मुसलमानांच्या प्राबल्याचे वर्णन केले आहे त्याचा संबंध बेदर शाहीशी काहीएक नसून दिल्लीपदपादशाहीस अनुलक्षून होता. कारण, न वाला छळ सोसावा लागला तो ब्राह्मणी राज्यांत नव्हे. हा उल्लेख पुढील मुद्यात सप्रमाण येईल. (क)'नामदेवापदें गाय मारली ती बेदरच्या बादशहाने मारली' हैं 'भारद्वाजां'नीं निखालस खोटे लिहिले आहे. गायीची गोष्ट हस्तनापुरी घडल्याचे 'भक्तविजयां'त स्पष्ट लिहिले आहे. खालची ओवी पहा:तंव कोणे एके दिवशीं । ज्ञानदेव आले पंढरीशी ॥ इच्छा धरिली मानसीं । नामदेवासी भेटावे ॥ १० ॥ ही भेट झाल्यानंतर उभयतांही आणखी संतमंडळ बरोबर घेऊन तीर्थयात्रेस निघाले, व मार्गामध्ये अध्यात्म विषयावर चर्चा करीत चालले. तेव्हां:-- यापरि संवाद नित्यानित्य । मार्गी करिती स्वानंदभरित । तो हस्तनापुरा अकस्मात । तीर्थ करीत पातले ॥ ६२ ॥ त्या त्यांच्या स्वारीचा थाट:गरुड टके निशाण भेरी । वा वाजती अति गजरी ॥ आनंद मांडला हस्तनापुरीं । जयजयकारी नामघोषे ॥६६॥