या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
केशवसुतांची कविता.
तथापि जर ती गेली आशा निघुनी
एका रात्रींतुनि वा दिवसामधुनी,
स्वप्नामधुनी किंवा न-कशांतुनिही,
तर ती गेली कमती का गे कांहीं ?
सर्व अम्ही जें बवतों करितों वा जें
स्वप्नांतिल तें स्वप्नच, सखये माझे !
कल्लोळांच्या क्षोभें गर्जत आहे
त्या सागरतीरीं उभा गडे ! मी आहें,
धरिले असती मी या स्वकरामाजी
स्वर्णवालुकाकण, जे नसती राजीः
किती थोडके ! परी कसे ते गळति-पहाते पळती
माझ्या बोटांमधुनि, सागरा जाती;
माझ्या नेत्रांमधुनि, आंसवें चलति -आंसवें गळती !
अहा ईश्वरा ! घट्ट मूठ ही वळुनी
पकडाया ते शक्त मी न कां म्हणुनी ?
अहह ! ईश्वरा ! शक्ति न कां राखाया
एकहि कण निर्घृण लाटेपासुन या ?
बघतों आम्ही करितों वा जें सारें
स्वप्नांतिल तें स्वप्नच व्हावें का रे ?
१५ डिसेंबर, १८९२.