वासाची शिक्षा मिळे ! " त्या मुळे त्याच्या वर्तन-
कमाबद्दल कोणी एक ब्र ही काढीत नसत. इत-
क्यावरून त्याचे वर्तनांत कांहीं वाईट प्रकार होते
असें मात्र कोणी मनांत आणूं नये; कारण ही कथा
जरी दंतप्राधान्य आहे तरी विक्रम हा कोणत्या
प्रकारचा मनुष्य होता है सर्वत्र महशूर आहेच ! अस्तु-
लीलावती असे धाडसाचें कृत्य पाहून त्यास
वाईट तर वाटलेच परंतु सेवकाच्या वचनावरच केवळ
भरंवसा ठेवणे हें योग्य नाहीं तर ' चक्षुवैसत्यं '
डोळ्यानी पाहिलेली किंवा कानानी ऐकलेली गोष्ट
तीच खरी मानावी या करितां आज रात्रौ स्वतः ह्याचा
परिचय पाहून नंतर जें करणें तें करावें. असा त्यानें
निश्चय केला व तद्वत् त्याची त्यानीं अम्मलबजाव-
णीही केली. त्या रात्री भोजनोत्तर तो स्वतः गस्तीचा
पोषाख चढवून त्या दूताबरोबर शहरांत फिरावयास
निघाला आणि थोडक्याच वेळांत सावकाराच्या वाड्या-
नजिक येऊन पोंचून एका अडोशास गुप्त रीतीनें
छपून बसला व पुढे त्या बाप मुलीचा कांहीं वेळानें
भाषण सुरू होऊन त्यांत हेराच्या बातमीचा
तथ्यांशही त्यास दिसू लागला; यास्तव तो त्यांचा
संवाद अगर्दी लक्ष लावून ऐकूं लागला. त्यांतील
सारांश असा मु०-( आश्चर्यभावदर्शक मुद्रा करून )
बाबा तुह्मी क्षत्रिय कुळांत जनन पावला असून परम-
शूर आणि सत्यभाषणप्रिय असे आहांत व हा
आपला सत्यभाषणप्रिय स्वभाव आपण चंपावतीस
व असतां घरांतील थोर लहानांस न आवडला हा-
पान:खानदेश मित्र.pdf/१६
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४
प्रति विक्रमचरित्र.