मनुष्यास हरवक्त आपल्या तंट्या बखेड्याचा निका-
ल दरवारी न्यायानुसार करून ध्यावा लागतो आणि
सांप्रत तर दरबारीन्यायावांचून कोणत्याही गोष्टी-
ची तडजोड करूं नयेच अशी सर्व लोकांत समज
झाली आहे; परंतु दरबारी न्याय मिळविण्यास अनु-
कूळ असाव्या अशा ज्या कांहीं गोष्टी आहेत त्यां-
कडे फारसे कोणाचें लक्ष्य जात नाहीं आणि ह्मणून
त्या दरबारी न्यायाचे पाय कित्येक लोक भिकेस
लागत चालले आहेत, यास्तव ज्यांस दरवारी न्याय
पाहिजे असेल त्यांनी खालीं लिहिलेल्या मुख्य चार गो-
'ष्टींची तरी निदान आपणास अनुकूलता आहे किंवा
कसें हैं पहावें व नसल्यास दरवारचें तोंड न पाहतां
अन्य तऱ्हेनें आपल्या भानगडीचा निकाल करून
घ्यावा. असें झाल्यानें हल्लीं या दरवारी न्यायाचे सं-
बंधानें होत असलेले भयंकर परिणाम पुष्कळ अंशी
टळण्याचा संभव आहे ! !
* दरबारी न्याय करून घेऊं नयेच, असें कांहीं आमचें ह्मण-
णें नाहीं परंतु तो योग्य प्रसंगाखेरीज हरवक्त मिळविण्याचे भरी
स कोणी निदान गरिबांनी तरी पडूं नये.